शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

मुंबई - गोवा महामार्ग अखेर सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 15:37 IST

चिपळूण : अतिवृष्टीमुळे चिपळूण तालुक्यातील परशुराम घाटातील हॉटेल ओमेगा इनजवळ शनिवारी दुपारी ३ वाजता दरड कोसळून मुंबई - गोवा ...

ठळक मुद्देमुंबई - गोवा महामार्ग अखेर सुरुअतिवृष्टीमुळे वाहतूक ठप्प झाली होती

चिपळूण : अतिवृष्टीमुळे चिपळूण तालुक्यातील परशुराम घाटातील हॉटेल ओमेगा इनजवळ शनिवारी दुपारी ३ वाजता दरड कोसळून मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. १३ तासांनंतर रविवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास दरड पूर्णपणे बाजूला करण्यात यंत्रणेला यश आल्याने वाहतूक पूर्ववत सुरु झाली. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, आमदार भास्कर जाधव यांनी या भागाची पाहणी केली.चिपळूण शहरात शनिवारी पुराचे पाणी घुसले होते. संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते. त्यामुळे बहादूरशेख पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. शनिवारी दुपारी ३.३० च्या सुमारास परशुराम घाटातील एका वळणावर डोंगरातील मातीचा एक भाग रस्त्यावर आला. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत दरड हटविण्याचे काम सुरू होते. त्यामध्ये पाच जेसीबी, पाच पोकलेन, रोलर या यंत्राच्या सहाय्याने दरड हटविण्यात आली.राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी, चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या कंपनीचे ठेकेदार आदींनी दरड हटविण्यासाठी प्रयत्न केले. तहसीलदार जीवन देसाई, प्रांताधिकारी कल्पना जगताप-भोसले, इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दरडग्रस्त भागाची पाहणी केली. तब्बल १३ तासांनी महामार्गावरील वाहतूक सुरु झाली. एस. टी.च्या गाड्याही बंद होत्या. यावेळी जिल्हाधिकारी चव्हाण यांनी दरडीची पाहणी करुन प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

टॅग्स :highwayमहामार्गRatnagiriरत्नागिरी