शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

Ratnagiri: मुंबई - गोवा महामार्गाची डेडलाइन पुन्हा एकदा हुकलीच; बरेच काम बाकी, पूल अर्धवट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 12:59 IST

परशुराम ते वाकेड मार्ग पूर्णत्त्वासाठी आता ३० नोव्हेंबरची प्रतीक्षा

रत्नागिरी : मुंबई - गाेवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे रखडलेले काम डिसेंबर २०२३पर्यंत पूर्ण करण्याची डेडलाइन देण्यात आली होती. मात्र, आरवली (ता. संगमेश्वर) ते वाकेड (ता. लांजा) दरम्यानचे काम दोन ठेकेदारांनी अचानक सोडल्याने काम रखडले. या कामाच्या पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी डिसेंबर २०२४अखेर काम पूर्ण होईल, अशी घोषणा केली होती. मात्र, ३१ डिसेंबरचाही मुहूर्त आता हुकला आहे.रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांमधून ३६६.१७ किलोमीटरच्या महामार्गाच्या चाैपदरीकरणाला २०१३मध्ये प्रारंभ झाला आहे. माणगाव ते परशुराम घाट या ७० किलोमीटरच्या चार भागांचे काम राष्ट्रीय महामार्ग विभाग, पेण (जि. रायगड) यांच्याकडे आहे. परशुराम घाट ते तळगाव (ता. राजापूर) हे ५ ते ८ भागांपर्यंतचे २१३ किलोमीटरचे आणि तळगाव ते झाराप हे ८२.८७ किलोमीटरचे काम राष्ट्रीय महामार्ग विभाग, रत्नागिरी यांच्याकडे आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील आरवली ते कांटे हे ३९.२४ किलोमीटर आणि कांटे ते वाकेड हे ४९.१५ किलोमीटरचे काम रखडले आहे. महामार्गाचे रखडलेले काम डिसेंबर २०२३ मध्ये पूर्ण हाेईल, असे सांगण्यात आले हाेते. त्यानंतर मार्च महिन्यात रत्नागिरी दाैऱ्यावर आलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी डिसेंबर २०२४ पर्यंत काम पूर्ण करण्याची घोषणा केली होती. मात्र, हा मुहूर्तही हुकला आहे.

परशुराम घाट ते आरवली ९३ टक्के तळगाव ते कळमठ हे ३८.३८ किलाेमीटरचे आणि कळमठ ते झाराप हे ४३.९० किलोमीटरचे काम पूर्णत्त्वाला गेले आहे. परशुराम घाट ते आरवली या रस्त्याचे कामही ९३ टक्के झाले आहे. कामासाठी आता ३१ मार्च २०२५ची डेडलाइन देण्यात आली आहे.

आरवली ते वाकेड काम रखडलेआरवली ते कांटे या ३९.२४ किलोमीटरपैकी २४.५० किलाेमीटर (६० टक्के) आणि कांटे ते वाकेड या ४९.१५ पैकी ४१.३० किलोमीटरचे (७४ टक्के) काम झाले आहे. उर्वरित कामासाठी आता ३० नोव्हेंबर २०२५ची डेडलाइन दिली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीhighwayमहामार्गMumbaiमुंबईgoaगोवा