शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

मुंबई - गोवा महामार्गावर बर्निंग कारचा थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 18:45 IST

मुंबई - गोवा महामार्गावरील कशेडी घाटात बुधवारी रात्री बर्निग कारचा थरार पाहावयास मिळाला. धावत्या कारने पेट घेतल्यानंतर कारचे दरवाजे लॉक झाल्याने कारमधील प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. मात्र, वेळेत मिळालेली मदत आणि प्रवाशांचे दैव बलवत्तर म्हणून या दुर्घटनेतून तिघेही प्रवासी सुखरुप बचावले.

ठळक मुद्देमुंबई - गोवा महामार्गावर बर्निंग कारचा थरारकशेडी घाटातील घटना, सुदैवाने तिघेही प्रवासी बचावले

खेड : मुंबई - गोवा महामार्गावरील कशेडी घाटात बुधवारी रात्री बर्निग कारचा थरार पाहावयास मिळाला. धावत्या कारने पेट घेतल्यानंतर कारचे दरवाजे लॉक झाल्याने कारमधील प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. मात्र, वेळेत मिळालेली मदत आणि प्रवाशांचे दैव बलवत्तर म्हणून या दुर्घटनेतून तिघेही प्रवासी सुखरुप बचावले.मालेगाव येथील भंगार व्यवसायिक इस्माईलशेख शब्बीर हे आपले सहकारी रमझान इब्राहीम शहा आणि सरोज निजामुद्दीन खान यांच्यासोबत चिपळूण तालुक्यातील खेर्डी औद्योगिक वसाहतीत भंगार घेण्यासाठी आले होते. बुधवारी रात्री ते परतीच्या मार्गावर असताना महामार्गावरील कशेडी घाटात त्यांच्या वॅक्स व्हॅगन एमएच ०४, एफएफ-११६२ कारने अचानक पेट घेतला.कारमधून धूर यायला लागताच चालक इस्माईल यांनी कार रस्त्याच्या कडेला उभी करून कारमधून उतरण्याचा प्रयत्न केला. मात्र, कारचे चारही दरवाजे लॉक झाल्याने ते सर्वजण कारमध्येच अडकून पडले. आता आपले पुढे काय होणार याची कल्पना आलेल्या या तिघांनीही आरडा-ओरडा सुरु केल्यानंतर महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी प्रसंगावधान राखत त्यांना कारचा मागील दरवाजातून बाहेर काढले. हे तिन्ही प्रवासी कारच्या बाहेर पडताच संपूर्ण कार आगीच्या भक्षस्थानी पडली.कारमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे कशेडी घाटातील हा बर्निंग कारचा थरार कारमधून प्रवास करणाऱ्या तिघांच्याही जीवावर बेतणारा होता. मात्र, त्यांचे दैव बलवत्तर म्हणून हे तिघेही प्रवासी या जीवघेण्या अपघातातून वाचले. खेड पोलिसांनी या अपघाताची नोंद केली असून, पोलीस प्रकाश मोरे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातRatnagiriरत्नागिरी