शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
2
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
3
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
4
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
5
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
6
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
7
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
8
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
9
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
10
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
11
"कांगारूंना कसं हरवायचं? ते शास्त्र फक्त शास्त्रींकडेच! इंग्लंडने त्यांनाच कोच करावं"
12
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
13
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
14
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
15
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
16
Astrology: २०२६ आधी 'या' ३ गोष्टी केल्याने होईल मोठा लाभ; ज्योतिषांनी दिला नवीन वर्षाचा कानमंत्र!
17
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
18
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
19
"कोणालाच सत्य माहित नव्हतं...", ९ वर्षांनंतर शिल्पा शिंदेने 'भाबीजी घर पर हैं' सोडण्यामागचं सांगितलं कारण
20
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
Daily Top 2Weekly Top 5

माॅर्निंग वाॅक आराेग्यासाठी की काेराेना घरात आणण्यासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:30 IST

अरुण आडिवरेकर लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : काेराेनाचा संसर्ग वाढत असल्याने लाॅकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. काेराेना नियंत्रणात आणण्यासाठी ...

अरुण आडिवरेकर

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : काेराेनाचा संसर्ग वाढत असल्याने लाॅकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. काेराेना नियंत्रणात आणण्यासाठी निर्बंध लादण्यात आले असले तरी माॅर्निग वाॅकसाठी बाहेर पडणाऱ्यांची संख्या काही कमी झालेली नाही. रत्नागिरी शहरासह आजूबाजूच्या परिसरात अनेकजण माॅर्निंग वाॅकसाठी बाहेर पडत आहेत. मात्र, त्यांच्यावर कारवाई हाेत नसल्याने तेही बिनधास्त झाले आहेत.

काेराेनाचा संसर्ग अजूनही कमी झालेला नाही. हवेतून वेगाने पसरणाऱ्या या संसर्गापासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी संचारबंदी जाहीर करण्यात आली असून, नागरिकांना घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे. केवळ सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेतील दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र, माॅर्निंग वाॅकची सवय पडलेले अनेकजण अजूनही घराबाहेर पडत आहेत. शहरातील मांडवी, थिबा पॅलेस, साळवी स्टाॅप, हिंद काॅलनी याबराेबरच नाचणे, शिरगाव, उद्यमनगर या भागात माॅर्निंग वाॅकसाठी बाहेर पडणाऱ्यांची संख्या अधिक आहे. तरुणांसह ज्येष्ठ, महिलांही फिरायला बाहेर पडत आहेत. अनेकजण ताेंडाला मास्क न लावता तर काहीजण हनुवटीला मास्क लावून फिरत असतात. त्यामुळे काेराेनाचा संसर्ग वाढण्याची भीती अधिक आहे.

पाेलिसांकडूनही सूट

काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. संचारबंदीच्या काळात अनावश्यक फिरणाऱ्यांवर पाेलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. पण, ही कारवाई मर्यादित वेळेतच केली जात आहे, तर दुकानांसाठी ठरवून दिलेल्या वेळेत केवळ दुकानांची पाहणी करण्यात येते. पण माॅर्निंग वाॅकसाठी बाहेर पडणारे पाेलिसांच्या कारवाईतून सुटत आहेत. अनेकजण अंतर्गत मार्गाचा वापर करत असल्याने तेही वाचतात.

सकाळच्या प्रसन्न वातावरणात शुद्ध हवा घेण्यासाठी अनेकजण माॅर्निंग वाॅकसाठी बाहेर पडतात. सध्या काेराेनाचा संसर्ग इतका वाढला आहे की, हवेबराेबर काेराेनाचा विषाणू शरीरात जाण्याचा धाेका अधिक आहे. त्यामुळे खुली हवेपेक्षा विषाणूच शरीरात जाऊ शकताे.

काेराेनाची भीती तर आहेच. पण, घरात बसून सांधे जखडतात. दिवसभर घरात बसून कंटाळाही येताे. सकाळच्या वेळेत गर्दीचे प्रमाण कमी असते. त्यामुळे पाय माेकळे करण्यासाठी घराबाहेर पडताे. ताेंडाला मास्क लावूनच बाहेर पडताे आणि घरात जाण्यापूर्वी स्वच्छ हातपाय धुवूनच जाताे.

- ज्येष्ठ नागरिक

काेराेनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे भीतीही आहेच. आपण बाधित झालाे तर घरातील मंडळींचे काय हाेईल, याची चिंता असतेच. पण, सकाळी फिरायला येणाऱ्यांची खूपच कमी असते. त्यामुळे संसर्ग हाेण्याचा धाेका कमी आहे. त्यातही घरापासून जास्त दूर जाणे टाळताे. याेग्यती खबरदारी घेऊनच आपण घराबाहेर पडताे.

- नागरिक