शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

रत्नागिरीत सकाळची अजान आता भोंग्याविना, मुस्लिम बांधवांनी घेतला महत्त्वाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 14:33 IST

भाेंग्याबाबत सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशाचे तंताेतंत पालन करणार असल्याचेही मुस्लिम बांधवांनी सांगितले.

रत्नागिरी : राज्यात मशिदीवरील भाेंग्यावरुन वातावरण ढवळून निघाले असतानाच रत्नागिरी शहरातील मुस्लिम बांधवांनी महत्त्वाचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार रत्नागिरी शहरात सकाळच्या अजानवेळी भाेंग्याचा वापर न करण्याचा निर्णय मुस्लिम बांधवांनी घेतला आहे. तसेच भाेंग्याबाबत सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशाचे तंताेतंत पालन करणार असल्याचेही मुस्लिम बांधवांनी सांगितले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज, बुधवार ४ मे पासून मशिदीवरील भोंगे काढण्याचे आवाहन केले हाेते. मात्र, जिथे भाेंगे वाजतील तिथे हनुमान चालिसा लावा, असे आदेशही मनसे कार्यकर्त्यांना दिले आहेत. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहरातील मुस्लिम बांधवांची बैठक रत्नागिरी शहर पाेलीस स्थानकात आयाेजित करण्यात आली हाेती. या बैठकीला उपविभागीय पाेलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, शहर पाेलीस निरीक्षक विनीत चाैधरी उपस्थित हाेते. या बैठकीत भाेंग्याच्या वापराबाबत चर्चा करण्यात आली.या चर्चेवेळी सकाळची अजान ही भोंग्याचा वापर न करता केली जाईल, असे उपस्थित मुस्लिम बांधवांनी सांगितले. तसेच भोंग्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनांची अंमलबाजवणी केली जाईल, अशी स्पष्ट भूमिकाही मांडली. कोणताही अनुचित प्रकार घडला तर कायदा हातात न घेता पोलिसांना त्याची माहिती दिली जाईल, असेही सांगितले.

मनसे पदाधिकाऱ्यांना नाेटीस

जिल्ह्यातील वातावरण बिघडू नये यासाठी पोलिसांनी रत्नागिरी शहरातील मनसे कार्यकर्त्यांना फौजदारी दंड प्रक्रिया कलम १४९ नुसार नोटीस बजावली आहे. शहर अध्यक्ष सतीश राणे, उपशहर अध्यक्ष अमोल श्रीनाथ, विभाग अध्यक्ष सर्वेश जाधव, विभाग अध्यक्ष गजानन आईर, विभाग प्रमुख अजिंक्य केसरकर, विभाग अध्यक्ष अक्षय माईन, महाराष्ट्र सैनिक धनंजय पाटील यांना ही नाेटीस बजावली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMosqueमशिदMuslimमुस्लीम