शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

रत्नागिरीत सकाळची अजान आता भोंग्याविना, मुस्लिम बांधवांनी घेतला महत्त्वाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 14:33 IST

भाेंग्याबाबत सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशाचे तंताेतंत पालन करणार असल्याचेही मुस्लिम बांधवांनी सांगितले.

रत्नागिरी : राज्यात मशिदीवरील भाेंग्यावरुन वातावरण ढवळून निघाले असतानाच रत्नागिरी शहरातील मुस्लिम बांधवांनी महत्त्वाचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार रत्नागिरी शहरात सकाळच्या अजानवेळी भाेंग्याचा वापर न करण्याचा निर्णय मुस्लिम बांधवांनी घेतला आहे. तसेच भाेंग्याबाबत सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशाचे तंताेतंत पालन करणार असल्याचेही मुस्लिम बांधवांनी सांगितले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज, बुधवार ४ मे पासून मशिदीवरील भोंगे काढण्याचे आवाहन केले हाेते. मात्र, जिथे भाेंगे वाजतील तिथे हनुमान चालिसा लावा, असे आदेशही मनसे कार्यकर्त्यांना दिले आहेत. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहरातील मुस्लिम बांधवांची बैठक रत्नागिरी शहर पाेलीस स्थानकात आयाेजित करण्यात आली हाेती. या बैठकीला उपविभागीय पाेलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, शहर पाेलीस निरीक्षक विनीत चाैधरी उपस्थित हाेते. या बैठकीत भाेंग्याच्या वापराबाबत चर्चा करण्यात आली.या चर्चेवेळी सकाळची अजान ही भोंग्याचा वापर न करता केली जाईल, असे उपस्थित मुस्लिम बांधवांनी सांगितले. तसेच भोंग्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनांची अंमलबाजवणी केली जाईल, अशी स्पष्ट भूमिकाही मांडली. कोणताही अनुचित प्रकार घडला तर कायदा हातात न घेता पोलिसांना त्याची माहिती दिली जाईल, असेही सांगितले.

मनसे पदाधिकाऱ्यांना नाेटीस

जिल्ह्यातील वातावरण बिघडू नये यासाठी पोलिसांनी रत्नागिरी शहरातील मनसे कार्यकर्त्यांना फौजदारी दंड प्रक्रिया कलम १४९ नुसार नोटीस बजावली आहे. शहर अध्यक्ष सतीश राणे, उपशहर अध्यक्ष अमोल श्रीनाथ, विभाग अध्यक्ष सर्वेश जाधव, विभाग अध्यक्ष गजानन आईर, विभाग प्रमुख अजिंक्य केसरकर, विभाग अध्यक्ष अक्षय माईन, महाराष्ट्र सैनिक धनंजय पाटील यांना ही नाेटीस बजावली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMosqueमशिदMuslimमुस्लीम