शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
4
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
5
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
6
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
7
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
8
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
9
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
10
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
11
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?
12
71st National Awards : 'श्यामची आई' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, महाराष्ट्राची शान नऊवारी साडीत स्वीकारला पुरस्कार!
13
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
14
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
15
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
16
'तो' वाद जीवावर बेतला! अवघ्या २० रुपयांसाठी काँग्रेस नेत्याच्या भावाची गोळ्या झाडून हत्या
17
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
18
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
19
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
20
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?

वर्षभरातील रुग्णांपेक्षा एप्रिलमधील रुग्ण अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:25 IST

रत्नागिरी : गेल्या वर्षभरात काेराेनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असतानाच एप्रिल २०२१ महिना जिल्हावासियांच्या चिंतेत भर टाकणारा ठरला आहे. वर्षभरात ...

रत्नागिरी : गेल्या वर्षभरात काेराेनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असतानाच एप्रिल २०२१ महिना जिल्हावासियांच्या चिंतेत भर टाकणारा ठरला आहे. वर्षभरात आढळलेल्या पाॅझिटिव्ह रुग्णांपेक्षा अधिक रुग्ण एप्रिल महिन्यात आढळले आहेत. एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत ११,०२९ रुग्ण आढळले हाेते, तर एप्रिल २०२१ या केवळ एका महिन्यात ११,२५४ पाॅझिटिव्ह रुग्ण सापडले. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या २२,२८३ इतकी झाली झाली.

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असतानाच जनतेसाठी प्रशासनाकडून कडक निर्बंध घालण्यात आले. तरीही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाकडून चिंता व्यक्त होत आहे. लॉकडाऊनमध्ये नागरिकांनी काळजी न घेतल्याने एप्रिल महिन्यात जास्त प्रमाणात कोरोनाची लागण झाली. जिल्ह्यात महिनाभरात ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या वाढल्याने प्रशासनासह आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग राखत मास्कचा वापर करावा. लॉकडाऊनच्या कालावधीत विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर प्रशासनाने दंडात्मक कारवाई केली. तसेच कोराेनाची चाचणीही घेण्यात येत आहे. तरीही नागरिकांचे घराबाहेर पडण्याचे प्रमाण कमी झालेले नाही.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २२,२८३ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत, तर आतापर्यंत एकूण ६५६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महिनाभरातील आकडेवारीकडे पाहिले असता, जिल्ह्यात ११,२५४ पाॅझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली असून, त्यापैकी २८० रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर १४,८६४ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी साेडण्यात आले आहे. त्यामध्ये सर्वाधिक रुग्ण रत्नागिरी तालुक्यातील आहेत.

पोलीस यंत्रणेकडून गावे दत्तक

कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने आता पोलीस यंत्रणेकडून गावे दत्तक घेण्यात आली आहेत. ग्रामीण भागात कोरोनाचे प्रमाण वाढ असल्याने पोलिसांकडून या दत्तक घेण्यात आलेल्या गावांमध्ये कोरोनाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. त्यासाठी स्थानिकांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. या गावातील लाेकांचे ऑक्सिजन व तापमान तपासण्यात येणार आहे.

लसीकरण मोहीम जोरात

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच आरोग्य विभागाकडून लसीकरण मोहीम जोरात राबविण्यात येत आहे. लसीकरणामुळे कोरोनाचा मृत्यू दर कमी हाेण्यास मदत हाेणार आहे. लसीमुळे लोकांच्या प्रतिकार शक्तीमध्ये वाढ होऊन रुग्ण कोरोनावर मात करण्यात यशस्वी होतील.