शहरं
Join us  
Trending Stories
1
शाई पुसून पुन्हा मतदान शक्य नाही, कारण...; मार्कर पेन वादावर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
2
स्थानिक निवडणुकांमध्ये कधीपासून मार्करचा वापर होतोय? वादानंतर निवडणूक आयुक्तांचं स्पष्टीकरण, म्हणाले...
3
रशियाच्या रडारवर दोन युरोपियन देश; पुतीन यांच्या डोळ्यात का खुपत आहेत ब्रिटन आणि जर्मनी?
4
धुळे महापालिका निवडणूक: प्रभाग १८ मध्ये राडा, EVM ची तोडफोड, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
5
I-PAC Raid Case: सर्वोच्च न्यायालयाचा ममता बॅनर्जींना दणका; आय-पॅक प्रकरणात धाडली नोटीस!
6
ही कसली लोकशाही? निवडणूक आयुक्तांना तात्काळ निलंबित करा; उद्धव ठाकरे कडाडले
7
BSNL चा 'महाधमाका'! हाय-स्पीड WiFi प्लॅनवर २०% सवलत; ५००० GB डेटासोबत OTT देखील मोफत!
8
संसार मोडला अन् आयुष्यही संपवलं! पत्नी ४ मुलांसह गायब; संतापलेल्या पतीने सासरच्या दारातच स्वतःला पेटवले
9
'या' महाराणीनं भारत-चीन युद्धात देशासाठी दान केलेलं ६०० किलो सोनं, खासगी विमानं, विमानतळ; घराण्याकडे होती अफाट संपत्ती
10
नऊ वर्षे निवडणूक आयुक्त काय करत होते? पगार कशासाठी घेतात? उद्धव ठाकरे संतापले...
11
"मला राजकारण कळत नाही, वरचे निर्णय घेतात', मतदानाच्या दिवशीच सुभाष देशमुखांचा भाजपाला घरचा आहेर
12
Maharashtra Municipal Election 2026 Voting LIVE Updates: २०११ पासून केला जातो मार्कर पेनचा वापर, शाई पुसून पुन्हा मतदान शक्य नाही - निवडणूक आयोग
13
Palmistry: तळहातावर शंख, कमळ, मासा, धनुष्य यांसारखी चिन्ह देतात राजयोगाचे संकेत
14
बटन धनुष्यबाणाचे दाबतोय, लाईट कमळासमोरची पेटतेय...; नाशिकमध्ये शिंदेसेना बुचकळ्यात 
15
"निकाल आल्यावर कुणाला दोष द्यायचा याची काहींची तयारी सुरु..."; मार्कर मुद्द्यावर CM चा टोला
16
Nota Rules for Re Election : 'नोटा' जिंकला तर पुन्हा निवडणूक, काय आहे संपूर्ण प्रक्रिया?
17
Vaibhav Suryavanshi Record : U19 वर्ल्ड कपमध्ये वैभव सूर्यवंशीचा ऐतिहासिक पराक्रम; इथंही विक्रमांची ‘वैभवशाही’ परंपरा कायम
18
आयटी कंपन्यांवर 'नव्या लेबर कोड'ची संक्रांत! TCS, इन्फोसिसच्या नफ्यात मोठी घट; काय आहे कारण?
19
निवेदिता सराफ मतदार यादीत तासभर नाव शोधत होत्या...; वैतागल्या, एकाच कुटुंबातील तीन ठिकाणी नावे...
20
...तर भगवा ब्रिगेडला पोलीस ठोकून काढतील; देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे बंधूंना थेट इशारा
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरातील रुग्णांपेक्षा एप्रिलमधील रुग्ण अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:25 IST

रत्नागिरी : गेल्या वर्षभरात काेराेनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असतानाच एप्रिल २०२१ महिना जिल्हावासियांच्या चिंतेत भर टाकणारा ठरला आहे. वर्षभरात ...

रत्नागिरी : गेल्या वर्षभरात काेराेनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असतानाच एप्रिल २०२१ महिना जिल्हावासियांच्या चिंतेत भर टाकणारा ठरला आहे. वर्षभरात आढळलेल्या पाॅझिटिव्ह रुग्णांपेक्षा अधिक रुग्ण एप्रिल महिन्यात आढळले आहेत. एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत ११,०२९ रुग्ण आढळले हाेते, तर एप्रिल २०२१ या केवळ एका महिन्यात ११,२५४ पाॅझिटिव्ह रुग्ण सापडले. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या २२,२८३ इतकी झाली झाली.

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असतानाच जनतेसाठी प्रशासनाकडून कडक निर्बंध घालण्यात आले. तरीही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाकडून चिंता व्यक्त होत आहे. लॉकडाऊनमध्ये नागरिकांनी काळजी न घेतल्याने एप्रिल महिन्यात जास्त प्रमाणात कोरोनाची लागण झाली. जिल्ह्यात महिनाभरात ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या वाढल्याने प्रशासनासह आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग राखत मास्कचा वापर करावा. लॉकडाऊनच्या कालावधीत विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर प्रशासनाने दंडात्मक कारवाई केली. तसेच कोराेनाची चाचणीही घेण्यात येत आहे. तरीही नागरिकांचे घराबाहेर पडण्याचे प्रमाण कमी झालेले नाही.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २२,२८३ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत, तर आतापर्यंत एकूण ६५६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महिनाभरातील आकडेवारीकडे पाहिले असता, जिल्ह्यात ११,२५४ पाॅझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली असून, त्यापैकी २८० रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर १४,८६४ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी साेडण्यात आले आहे. त्यामध्ये सर्वाधिक रुग्ण रत्नागिरी तालुक्यातील आहेत.

पोलीस यंत्रणेकडून गावे दत्तक

कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने आता पोलीस यंत्रणेकडून गावे दत्तक घेण्यात आली आहेत. ग्रामीण भागात कोरोनाचे प्रमाण वाढ असल्याने पोलिसांकडून या दत्तक घेण्यात आलेल्या गावांमध्ये कोरोनाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. त्यासाठी स्थानिकांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. या गावातील लाेकांचे ऑक्सिजन व तापमान तपासण्यात येणार आहे.

लसीकरण मोहीम जोरात

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच आरोग्य विभागाकडून लसीकरण मोहीम जोरात राबविण्यात येत आहे. लसीकरणामुळे कोरोनाचा मृत्यू दर कमी हाेण्यास मदत हाेणार आहे. लसीमुळे लोकांच्या प्रतिकार शक्तीमध्ये वाढ होऊन रुग्ण कोरोनावर मात करण्यात यशस्वी होतील.