शहरं
Join us  
Trending Stories
1
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
2
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
3
देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी
4
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
5
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
6
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
7
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
8
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
9
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
10
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
11
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
12
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
13
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
14
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
15
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
16
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
17
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
18
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
19
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
20
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!

वर्षभरातील रुग्णांपेक्षा एप्रिलमधील रुग्ण अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:25 IST

रत्नागिरी : गेल्या वर्षभरात काेराेनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असतानाच एप्रिल २०२१ महिना जिल्हावासियांच्या चिंतेत भर टाकणारा ठरला आहे. वर्षभरात ...

रत्नागिरी : गेल्या वर्षभरात काेराेनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असतानाच एप्रिल २०२१ महिना जिल्हावासियांच्या चिंतेत भर टाकणारा ठरला आहे. वर्षभरात आढळलेल्या पाॅझिटिव्ह रुग्णांपेक्षा अधिक रुग्ण एप्रिल महिन्यात आढळले आहेत. एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत ११,०२९ रुग्ण आढळले हाेते, तर एप्रिल २०२१ या केवळ एका महिन्यात ११,२५४ पाॅझिटिव्ह रुग्ण सापडले. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या २२,२८३ इतकी झाली झाली.

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असतानाच जनतेसाठी प्रशासनाकडून कडक निर्बंध घालण्यात आले. तरीही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाकडून चिंता व्यक्त होत आहे. लॉकडाऊनमध्ये नागरिकांनी काळजी न घेतल्याने एप्रिल महिन्यात जास्त प्रमाणात कोरोनाची लागण झाली. जिल्ह्यात महिनाभरात ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या वाढल्याने प्रशासनासह आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग राखत मास्कचा वापर करावा. लॉकडाऊनच्या कालावधीत विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर प्रशासनाने दंडात्मक कारवाई केली. तसेच कोराेनाची चाचणीही घेण्यात येत आहे. तरीही नागरिकांचे घराबाहेर पडण्याचे प्रमाण कमी झालेले नाही.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २२,२८३ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत, तर आतापर्यंत एकूण ६५६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महिनाभरातील आकडेवारीकडे पाहिले असता, जिल्ह्यात ११,२५४ पाॅझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली असून, त्यापैकी २८० रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर १४,८६४ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी साेडण्यात आले आहे. त्यामध्ये सर्वाधिक रुग्ण रत्नागिरी तालुक्यातील आहेत.

पोलीस यंत्रणेकडून गावे दत्तक

कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने आता पोलीस यंत्रणेकडून गावे दत्तक घेण्यात आली आहेत. ग्रामीण भागात कोरोनाचे प्रमाण वाढ असल्याने पोलिसांकडून या दत्तक घेण्यात आलेल्या गावांमध्ये कोरोनाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. त्यासाठी स्थानिकांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. या गावातील लाेकांचे ऑक्सिजन व तापमान तपासण्यात येणार आहे.

लसीकरण मोहीम जोरात

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच आरोग्य विभागाकडून लसीकरण मोहीम जोरात राबविण्यात येत आहे. लसीकरणामुळे कोरोनाचा मृत्यू दर कमी हाेण्यास मदत हाेणार आहे. लसीमुळे लोकांच्या प्रतिकार शक्तीमध्ये वाढ होऊन रुग्ण कोरोनावर मात करण्यात यशस्वी होतील.