शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोका-कोलासारखे आणखी मोठे प्रकल्प कोकणात येतील : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 11:39 IST

कोकणात केवळ निवडणुकीपुरते राजकारण करायचे आणि प्रकल्पांना विरोध करायचा एवढेच आधीच्या सरकारने केले

चिपळूण / आवाशी: कोकणच्या भूमीतील आंबा, काजू, मासेमारीसारख्या पारंपरिक उद्योगांना चालना दिली पाहिजे, ही भूमिका सरकारची आहे. मात्र, त्याच्या जोडीला औद्योगिक विकास महत्त्वाचा आहे. कोका-कोला कंपनीच्या माध्यमातून कोकणच्या आधुनिक विकासाची कास धरत असून, काेका-काेला सारखे आणखी माेठे प्रकल्प काेकणात येतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाेटे (ता. खेड) येथे केले.लोटे औद्योगिक वसाहतीच्या विस्तारित क्षेत्रात हिंदुस्थान कोकाकोला ब्रेव्हरेज कंपनीचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गुरुवारी पार पडले. यावेळी ते बाेलत हाेते. यावेळी उद्याेगमंत्री उदय सामंत, आमदार योगेश कदम, कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जे. पी. रॉड्रिक, एचसीसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जुआन पाबलो रॉड्रिग्ज, शिवसेना उपनेते सदानंद चव्हाण, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बिपिन शर्मा, एचसीसीबीचे मुख्य जनसंपर्क अधिकारी हिमांशू प्रियदर्शी उपस्थित होते. कंपनीचे सप्लाय व्यवस्थापक आलोक शर्मा यांनी प्रकल्पाविषयी माहिती दिली.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, पर्यावरणपूरक उद्याेग आले पाहिजेत. रत्नागिरी जिल्हा आता उद्याेग वाढीसाठी पुढे येत आहे. मंत्री उदय सामंत यांनी महाराष्ट्रामध्ये उद्याेग, व्यापार वाढविण्यासाठी गती दिली आहे. अवघ्या महिनाभरात काेका-काेला कंपनीला आवश्यक त्या परवानगी देण्यात आल्या. यालाच गतिमान सरकार म्हणतात. अशा उद्याेगांसाठी महाराष्ट्र ‘रेड कार्पेट’ टाकून तयार आहे, असे ते म्हणाले.ते पुढे म्हणाले की, कोका-कोला हा प्रकल्प आशियातील सगळ्यात मोठा प्रकल्प आहे. या कंपनीत २५०० काेटी रुपयांची गुंतवणूक आहे. साठ उत्पादने या कंपनीत उत्पादित हाेणार आहेत. महाराष्ट्र देशाच्या विकासाचे इंजिन असून, राज्याची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलर बनवण्याचे स्वप्न साकार करू, असे ते म्हणाले.उद्याेगमंत्री उदय सामंत म्हणाले की, प्रकल्प सुरू झाल्यावर ८० टक्के स्थानिकांना नाेकऱ्या देण्याची मागणी आहे. या मागणीला प्राधान्य देण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.

ग्रीनफिल्ड राेडमुळे उद्याेग येतीलकाेकणातील समुद्रकिनारा समृद्ध आहे. त्यामुळे पर्यटन आणि उद्याेग वाढीला चालना मिळेल. मुंबई-गाेवा ग्रीनफिल्ड रस्ता तयार हाेत आहे. त्यामुळे वेळ वाचणार असून, त्यामुळे उद्याेग येतील. कोकण विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून ६७ टीएमसी पाणी कोकणात वळविण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आधीच्या सरकारने विराेधच केलाकोकणात केवळ निवडणुकीपुरते राजकारण करायचे आणि प्रकल्पांना विरोध करायचा एवढेच आधीच्या सरकारने केले. आम्हाला बाळासाहेब किंवा दिघे साहेबांनी विकासाला विरोध करायचे शिकवले नाही. त्याउलट आपले सरकार विकास प्रकल्पांना गती देत आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीEknath Shindeएकनाथ शिंदे