शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
3
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
4
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
5
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
6
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
7
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
8
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
9
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
10
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
11
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
12
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
13
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
14
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
15
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
16
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
17
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
18
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
19
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
20
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...

कोका-कोलासारखे आणखी मोठे प्रकल्प कोकणात येतील : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 11:39 IST

कोकणात केवळ निवडणुकीपुरते राजकारण करायचे आणि प्रकल्पांना विरोध करायचा एवढेच आधीच्या सरकारने केले

चिपळूण / आवाशी: कोकणच्या भूमीतील आंबा, काजू, मासेमारीसारख्या पारंपरिक उद्योगांना चालना दिली पाहिजे, ही भूमिका सरकारची आहे. मात्र, त्याच्या जोडीला औद्योगिक विकास महत्त्वाचा आहे. कोका-कोला कंपनीच्या माध्यमातून कोकणच्या आधुनिक विकासाची कास धरत असून, काेका-काेला सारखे आणखी माेठे प्रकल्प काेकणात येतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाेटे (ता. खेड) येथे केले.लोटे औद्योगिक वसाहतीच्या विस्तारित क्षेत्रात हिंदुस्थान कोकाकोला ब्रेव्हरेज कंपनीचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गुरुवारी पार पडले. यावेळी ते बाेलत हाेते. यावेळी उद्याेगमंत्री उदय सामंत, आमदार योगेश कदम, कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जे. पी. रॉड्रिक, एचसीसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जुआन पाबलो रॉड्रिग्ज, शिवसेना उपनेते सदानंद चव्हाण, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बिपिन शर्मा, एचसीसीबीचे मुख्य जनसंपर्क अधिकारी हिमांशू प्रियदर्शी उपस्थित होते. कंपनीचे सप्लाय व्यवस्थापक आलोक शर्मा यांनी प्रकल्पाविषयी माहिती दिली.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, पर्यावरणपूरक उद्याेग आले पाहिजेत. रत्नागिरी जिल्हा आता उद्याेग वाढीसाठी पुढे येत आहे. मंत्री उदय सामंत यांनी महाराष्ट्रामध्ये उद्याेग, व्यापार वाढविण्यासाठी गती दिली आहे. अवघ्या महिनाभरात काेका-काेला कंपनीला आवश्यक त्या परवानगी देण्यात आल्या. यालाच गतिमान सरकार म्हणतात. अशा उद्याेगांसाठी महाराष्ट्र ‘रेड कार्पेट’ टाकून तयार आहे, असे ते म्हणाले.ते पुढे म्हणाले की, कोका-कोला हा प्रकल्प आशियातील सगळ्यात मोठा प्रकल्प आहे. या कंपनीत २५०० काेटी रुपयांची गुंतवणूक आहे. साठ उत्पादने या कंपनीत उत्पादित हाेणार आहेत. महाराष्ट्र देशाच्या विकासाचे इंजिन असून, राज्याची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलर बनवण्याचे स्वप्न साकार करू, असे ते म्हणाले.उद्याेगमंत्री उदय सामंत म्हणाले की, प्रकल्प सुरू झाल्यावर ८० टक्के स्थानिकांना नाेकऱ्या देण्याची मागणी आहे. या मागणीला प्राधान्य देण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.

ग्रीनफिल्ड राेडमुळे उद्याेग येतीलकाेकणातील समुद्रकिनारा समृद्ध आहे. त्यामुळे पर्यटन आणि उद्याेग वाढीला चालना मिळेल. मुंबई-गाेवा ग्रीनफिल्ड रस्ता तयार हाेत आहे. त्यामुळे वेळ वाचणार असून, त्यामुळे उद्याेग येतील. कोकण विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून ६७ टीएमसी पाणी कोकणात वळविण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आधीच्या सरकारने विराेधच केलाकोकणात केवळ निवडणुकीपुरते राजकारण करायचे आणि प्रकल्पांना विरोध करायचा एवढेच आधीच्या सरकारने केले. आम्हाला बाळासाहेब किंवा दिघे साहेबांनी विकासाला विरोध करायचे शिकवले नाही. त्याउलट आपले सरकार विकास प्रकल्पांना गती देत आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीEknath Shindeएकनाथ शिंदे