शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

कोका-कोलासारखे आणखी मोठे प्रकल्प कोकणात येतील : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 11:39 IST

कोकणात केवळ निवडणुकीपुरते राजकारण करायचे आणि प्रकल्पांना विरोध करायचा एवढेच आधीच्या सरकारने केले

चिपळूण / आवाशी: कोकणच्या भूमीतील आंबा, काजू, मासेमारीसारख्या पारंपरिक उद्योगांना चालना दिली पाहिजे, ही भूमिका सरकारची आहे. मात्र, त्याच्या जोडीला औद्योगिक विकास महत्त्वाचा आहे. कोका-कोला कंपनीच्या माध्यमातून कोकणच्या आधुनिक विकासाची कास धरत असून, काेका-काेला सारखे आणखी माेठे प्रकल्प काेकणात येतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाेटे (ता. खेड) येथे केले.लोटे औद्योगिक वसाहतीच्या विस्तारित क्षेत्रात हिंदुस्थान कोकाकोला ब्रेव्हरेज कंपनीचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गुरुवारी पार पडले. यावेळी ते बाेलत हाेते. यावेळी उद्याेगमंत्री उदय सामंत, आमदार योगेश कदम, कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जे. पी. रॉड्रिक, एचसीसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जुआन पाबलो रॉड्रिग्ज, शिवसेना उपनेते सदानंद चव्हाण, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बिपिन शर्मा, एचसीसीबीचे मुख्य जनसंपर्क अधिकारी हिमांशू प्रियदर्शी उपस्थित होते. कंपनीचे सप्लाय व्यवस्थापक आलोक शर्मा यांनी प्रकल्पाविषयी माहिती दिली.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, पर्यावरणपूरक उद्याेग आले पाहिजेत. रत्नागिरी जिल्हा आता उद्याेग वाढीसाठी पुढे येत आहे. मंत्री उदय सामंत यांनी महाराष्ट्रामध्ये उद्याेग, व्यापार वाढविण्यासाठी गती दिली आहे. अवघ्या महिनाभरात काेका-काेला कंपनीला आवश्यक त्या परवानगी देण्यात आल्या. यालाच गतिमान सरकार म्हणतात. अशा उद्याेगांसाठी महाराष्ट्र ‘रेड कार्पेट’ टाकून तयार आहे, असे ते म्हणाले.ते पुढे म्हणाले की, कोका-कोला हा प्रकल्प आशियातील सगळ्यात मोठा प्रकल्प आहे. या कंपनीत २५०० काेटी रुपयांची गुंतवणूक आहे. साठ उत्पादने या कंपनीत उत्पादित हाेणार आहेत. महाराष्ट्र देशाच्या विकासाचे इंजिन असून, राज्याची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलर बनवण्याचे स्वप्न साकार करू, असे ते म्हणाले.उद्याेगमंत्री उदय सामंत म्हणाले की, प्रकल्प सुरू झाल्यावर ८० टक्के स्थानिकांना नाेकऱ्या देण्याची मागणी आहे. या मागणीला प्राधान्य देण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.

ग्रीनफिल्ड राेडमुळे उद्याेग येतीलकाेकणातील समुद्रकिनारा समृद्ध आहे. त्यामुळे पर्यटन आणि उद्याेग वाढीला चालना मिळेल. मुंबई-गाेवा ग्रीनफिल्ड रस्ता तयार हाेत आहे. त्यामुळे वेळ वाचणार असून, त्यामुळे उद्याेग येतील. कोकण विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून ६७ टीएमसी पाणी कोकणात वळविण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आधीच्या सरकारने विराेधच केलाकोकणात केवळ निवडणुकीपुरते राजकारण करायचे आणि प्रकल्पांना विरोध करायचा एवढेच आधीच्या सरकारने केले. आम्हाला बाळासाहेब किंवा दिघे साहेबांनी विकासाला विरोध करायचे शिकवले नाही. त्याउलट आपले सरकार विकास प्रकल्पांना गती देत आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीEknath Shindeएकनाथ शिंदे