शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

मुंबई-गोवा महामार्गावर १००पेक्षा अधिक बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 23:49 IST

रत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्गावर गेल्या चार वर्षांमध्ये झालेल्या अपघातांपेक्षा गेल्या वर्षभरात अपघातांची संख्या कमी असली तरी १००पेक्षा अधिक प्रवाशांना प्राण गमवावा लागला आहे. दीड हजारपेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले असून, त्यातील अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. या महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण होत नाही, तोपर्यंत अपघातांची व त्यामध्ये मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या कमी होणार नाही. त्यामुळे चौपदरीकरणाचे काम अधिक वेगाने व्हावे, ही कोकणवासीयांची मागणी आहे.

ठळक मुद्देदीड हजार जखमी : ‘डेड ट्रॅक’ची प्रतिमा पुसण्यात अद्याप अपयशचौपदरीकरण : काम लवकर होणे अपेक्षित

रत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्गावर गेल्या चार वर्षांमध्ये झालेल्या अपघातांपेक्षा गेल्या वर्षभरात अपघातांची संख्या कमी असली तरी १००पेक्षा अधिक प्रवाशांना प्राण गमवावा लागला आहे. दीड हजारपेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले असून, त्यातील अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. या महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण होत नाही, तोपर्यंत अपघातांची व त्यामध्ये मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या कमी होणार नाही. त्यामुळे चौपदरीकरणाचे काम अधिक वेगाने व्हावे, ही कोकणवासीयांची मागणी आहे.गेल्या चार वर्षांच्या काळात मुंबई - गोवा महामार्गावर दरवर्षी एक हजारपेक्षा अधिक अपघात झाले, त्यामध्ये दीडशेपेक्षा अधिक प्रवाशांचे बळी गेले होते. त्या तुलनेत जानेवारी २०१७ ते जानेवारी २०१८ या कालावधीत पनवेल ते कसाल या ४५० किलोमीटर अंतराच्या महामार्गावर ८९१ अपघात घडले. त्यामध्ये १११पेक्षा अधिक जणांना आपले प्राण गमवावे लागले, तर या अपघातांमध्ये दीड हजार प्रवासी जखमी झाले. त्यातील अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे.मुंबई - गोवा महामार्गावर २०१०पासून २०१६ सालापर्यंत अपघातांची संख्या एक हजार ते दीड हजारच्या दरम्याने कायम राहिली आहे. त्यामध्ये प्रतिवर्षी सरासरी दीडशे ते दोनशे प्रवासी प्राणाला मुकले आहेत. ही स्थिती बदलावी व या महामार्गाची मृत्यूचा सापळा अशी बनलेली प्रतिमा बदलावी, म्हणून दोन दशकांपासून चौपदरीकरणाची मागणी सुरू होती. २०१३मध्ये मंजूर झालेल्या महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाचे दीड वर्षापूर्वी निवळी येथे उद्घाटन झाले होते. परंतु २०१८ मध्ये खºया अर्थाने चौपदरीकरणाच्या कामाला सुरूवात झाली आहे. मात्र, २०१३ व त्याआधीपासूनही चौपदरीकरण होणार आहे म्हणून अस्तित्त्वात असलेल्या महामार्गाच्या दुरुस्तीकडे सातत्याने दुर्लक्ष झाले. त्यामुळे गेल्या पाच ते सात वर्षांमध्ये महामार्गाची स्थिती अत्यंत नाजूक बनली आहे. ही स्थिती अजूनही कायम आहे.महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी रुंदीकरणाची जागा मोकळी करून घेतली जात आहे. संपूर्ण महामार्गावर रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये चौपदरीकरणाच्य कामाने वेग घेतला आहे. तरीही चौपदरीकरणाचे काम पूर्ण होण्यास अजून दीड ते दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. मात्र, या काळात जुन्या रस्त्यावरील खड्डे, खराब रस्त्याच्या ठिकाणी पॅचवर्क करणे आवश्यक आहे. चौपदरीकरणानंतर अपघात कमी होतील, अशी अपेक्षा अन्य महामार्गांच्या झालेल्या चौपदरीकरणानंतर व्यक्त झाली होती. परंतु ७० ते ८० प्रतितास वेगामुळे तेथेही अपघातांचे प्रमाण वाढले आहे.चौपदरीकरण : काम लवकर होणे अपेक्षितमागील चार वर्षात महामार्गावर दरवर्षी हजारपेक्षा अधिक अपघात.दरवर्षी महामार्गावरील अपघातात दीडशे ते २००च्या दरम्याने प्रवासी मृत्यूमुखी.जानेवारी २०१७ ते जानेवारी २०१८ या वर्षभरात पनवेल ते कसाल मार्गावर ८९१ अपघात; १११पेक्षा अधिक बळी.२०१३ ते २०१६ या वर्षीपेक्षा गतवर्षी अपघातांच्या प्रमाणात झाली घट.महामार्गाचे चौपदरीकरण काम पूर्ण झाल्यानंतर अपघातांचे प्रमाण कमी होण्याची अपेक्षा.वाहतूक नियम पाळावेतमहामार्गावरील अपघातांचे प्रमाण पाहता रस्ते खराब झाल्याने अपघात होण्याचे प्रमाण अधिक आहे. परंतु मानवी चुकांमुळेही अपघात वाढले आहेत. वाहनांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. वाहतूक नियमांचा सतत भंग होत असल्याने हे नियम पाळणे अत्यावश्यक झाले आहे.