शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
12
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
13
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
14
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
15
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
16
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
17
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
18
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
19
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

वानरे, माकडे पकडून अभयारण्यात सोडणार, १५ दिवसात मोहीम सुरू होणार 

By मनोज मुळ्ये | Updated: February 14, 2024 18:09 IST

वानरे, माकडांमुळे दरवर्षी शेती, बागायतीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान

पावस : शेतीबागायतीसाठी उपद्रव ठरत असलेली वानरे, माकडे पकडून अभयारण्यात सोडण्याच्या योजनेसाठी निधी मंजूर झाला असून, येत्या पंधरा दिवसात या कामाला गोळपमधून सुरुवात केली जाणार आहे, अशी माहिती शेतकरी अविनाश काळे यांनी दिली.रत्नागिरी तालुक्यातील गोळप येथील अविनाश काळे यांनी वानरे, माकडांच्या उपद्रवाबाबत सातत्याने आवाज उठवला आहे. त्यासाठी उपोषणही केले आहे. पंतप्रधान सडक योजनेच्या रस्ता भूमिपूजन कार्यक्रमासाठी पालकमंत्री उदय सामंत आलेले असताना काळे यांनी त्यांची भेट घेतली. वानरे, माकडे पकडून अभयारण्यात सोडण्यासाठी लागणाऱ्या निधीचा प्रस्ताव वनविभागाने दिला असल्याचे मंत्री सामंत यांनी त्यांना सांगितले. प्रायोगिक तत्त्वावर रत्नागिरी तालुक्यासाठी लागणारा निधी जिल्हा नियोजनमधून मंजूर केला असल्याचे आणि गोळपमधूनच काम सुरू होणार असल्याचे मंत्री सामंत यांनी त्यांना सांगितले. रत्नागिरी तालुक्याचा खर्च पाहून उर्वरित तालुक्यांसाठी निधी देण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.सातत्याने उठवला आवाजवानरे, माकडांमुळे दरवर्षी शेती, बागायतीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. माकडे फळांची नासधूस करत असल्याने अनेक बागायतदथारांनी केवळ याच कारणामुळे बागायत सोडली आहे. त्यामुळे काळे यांनी सातत्याने याबाबत आवाज उठवला आहे. उपाय करा नाहीतर आत्महत्या करायला परवानगी द्या, असे आंदोलनही त्यांनी केले आहे. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीfarmingशेतीMonkeyमाकड