शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
7
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
8
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
9
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
10
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
11
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
12
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
13
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
14
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
15
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
16
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
17
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
18
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
19
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
20
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल

तब्बल १५ महिन्यांनी तिवरेवासियांच्या पुनर्वसनाला मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 17:50 IST

chiplun, tiwre, dam, ratnagirinews चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण दुर्घटनेनंतर तब्बल १५ महिन्यांनी बाधितांच्या पुनर्वसन वसाहत कामाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. मुंबईतील सिध्दिविनायक ट्रस्टने मंजूर केलेल्या एकूण ११ कोटी रुपयांच्या निधीतून प्रथम २४ घरे बांधण्यात येत आहेत.

ठळक मुद्देतब्बल १५ महिन्यांनी तिवरेवासियांच्या पुनर्वसनाला मुहूर्त११ कोटी रुपयांच्या निधीतून प्रथम २४ घरे

चिपळूण : तालुक्यातील तिवरे धरण दुर्घटनेनंतर तब्बल १५ महिन्यांनी बाधितांच्या पुनर्वसन वसाहत कामाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. मुंबईतील सिध्दिविनायक ट्रस्टने मंजूर केलेल्या एकूण ११ कोटी रुपयांच्या निधीतून प्रथम २४ घरे बांधण्यात येत आहेत. यासाठी काढलेल्या घर बांधणीच्या दोन्ही निविदांची कामे राष्ट्रवादीच्याच दोन नेत्यांच्या कंपनीला मिळाली आहेत. सद्यस्थितीत अलोरे येथे बांधकाम विभागाच्या मार्गदर्शनाखाली जागा साफसफाईला सुरुवात झाली आहे.गतवर्षी २ जुलैच्या रात्री तिवरे धरण फुटल्यानंतर उडालेल्या हाहाकारात अपरिमित आर्थिक व जीवितहानी झाली. तब्बल २२ जणांचे बळी गेले आणि ४५ कुटुंबांच्या संसाराची राखरांगोळी झाली. या कुटुंबियांना आर्थिक स्वरूपाची मदत झाली असून, काही महिन्यांपूर्वी येथील वाहून गेलेली जॅकवेल पुन्हा उभारून पाणीपुरवठा पूर्ववत सुरु करण्यात आला आहे.त्यानंतर आता पुनर्वसनाचे काम सुरू केले आहे. पुनर्वसन, रस्ते, पूल, साकवांसह धरण पुनर्बांधणी याची कार्यवाही सुरु केली आहे. यामध्ये मुख्यत: बाधितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले जात आहेत.प्रथमत: एक मॉडेल घर तयार करण्यात येणार आहे. तपासणीनंतर उर्वरित घरांच्या कामांना सुरुवात होणार आहे. अलोरे येथे कोयना प्रकल्पाची वसाहत पडून असल्याने तेथे १.६० हेक्टर जागेवर पुनर्वसन करण्यात येत आहे. पाणी, वीज, बाजारपेठ, शाळांसह सर्व सोयी सुविधांनी युक्त ही जागा महत्वाची आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने सुमारे ३ कोटी ८० लाख रुपये खर्चाच्या २४ घरांसाठीच्या २ निविदा काढल्या होत्या. या दोन्ही निविदांची कामे राष्ट्रवादीच्या नेत्यांना मिळाली आहेत. तूर्तास २४ घरांचा प्रश्न सुटला आहे. एकूण ४० कुटुंबाचे पुनर्वसन होणार असल्याने व त्यातच काहीजणांना गावातच राहायचे असल्याने त्यांच्या जागेचा शोध सुरू आहे.

टॅग्स :DamधरणRatnagiriरत्नागिरीChiplunचिपळुण