शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

तुमच्या जमिनींचा व्यापार होतोय, जागे राहा; राज ठाकरे यांनी टोचले कोकणवासीयांचे कान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2023 22:56 IST

ते कवडीमोलाने तुमच्या जमिनी घेतात आणि हजारपट दराने विकतात. तुम्हाला कळतच नाही का? राज ठाकरेंचा सवाल

रत्नागिरी : तुमचे लोकप्रतिनिधी व्यापारी आहेत. कोकणात कोणत्या भागात प्रकल्प येणार आहे, हे त्यांना माहिती असते. ते कवडीमोलाने तुमच्या जमिनी घेतात आणि हजारपट दराने विकतात. तुम्हाला कळतच नाही का ? अशा कोणालाही जमिनी विकू नका, जागे राहा, अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोकणवासीयांचे कान टोचले.

रत्नागिरीतील स्व. प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे शनिवारी (६ मे) झालेल्या जाहीर सभेत राज ठाकरे यांनी कोकण विकासाच्या मुद्द्यावरून सध्याच्या आणि आधीच्या सरकारवर चांगलेच ताशेरे ओढले. पर्यटन, कोकणातील गडकिल्ले, कोकणात येणारे उद्योग आणि त्याच्या जमिनींच्या व्यवहारातील घोटाळा या साऱ्यांवर राज यांनी आपल्या ‘ठाकरी’ शैलीत सणसणीत प्रहार केले.४० मिनिटांच्या मोजक्या, पण थेट भाषणात ठाकरे यांनी सुरुवातीलाच जमिनींच्या विक्रीबाबत कोकणी माणसाचे कान टोचले. याआधी एन्रॉन, अणुऊर्जा यांसारखे प्रकल्प येण्याआधीच कोकणी लोकांनी व्यापाऱ्यांना आपल्या जागा विकल्या. आता नाणार, बारसूबाबतही तेच होत आहे. जमिनी पायाखालून जात आहेत, तरीही कोकणी माणसाला कळत कसे नाही, असा थेट प्रश्नच त्यांनी केला. इथले लोकप्रतिनिधी व्यापारी आहेत आणि लोकांच्या जमिनींचे मोठमोठे व्यवहार करत आहेत. हेच कोकणी माणसाशी बोलण्यासाठी आपण आलो असल्याचे ते म्हणाले.

प्रकल्पांबाबत बोलताना ते म्हणाले की, नाणारमध्ये होणारा प्रकल्प अचानक बारसूत कसा गेला ? कुठून आले हे नाव ? या बारसूमध्ये कातळशिल्पे आहेत, जी युनेस्कोच्या यादीत समाविष्ट होत आहेत. अंतिम यादीत या कातळशिल्पांचे नाव आल्यानंतर आसपासच्या तीन किलोमीटर परिसरात कसलेही बांधकाम करता येणार नाही. मग तिथे प्रकल्प कसा होणार ? लोकांना सतत अंधारात ठेवले जात आहे. म्हणूनच जमिनी विकू नका, काेकण वाचवा, अशी विनंती त्यांनी हात जोडून केली. पर्यटनाच्या क्षेत्रात कोकणात इतकी उपलब्धता आहे की, कोकण राज्याला पोसू शकतो. मात्र, त्याकडे राज्य सरकारने लक्ष द्यायला हवे, असे ते म्हणाले.

पक्ष नसलेल्या पक्षाचे अध्यक्षउद्धव ठाकरे यांचे नाव न घेता राज ठाकरे यांनी त्यांना टोला हाणला. पक्ष नसलेल्या पक्षाचे अध्यक्ष आज येऊन गेले. म्हणाले, लोकांची भावना असेल तीच आमची भावना. म्हणजे काय ? बाळासाहेबांचे नाव घेऊन महापौरांचा बंगला ढापताना लोकांना त्यांची भावना विचारली होती का, असा थेट प्रश्नच राज ठाकरे यांनी विचारला. जनतेचे हित कशात आहे, हे बघण्याची जबाबदारी राज्यकर्त्यांची आहे. पण, तेच म्हणतात, लोकांची भावना तीच आमची भावना. अशाने विकास कसा होणार, असा प्रश्नही त्यांनी केला.

पवार यांच्यावरही कडाडून टीका

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकाला मी विरोध करत असल्याचे शरद पवार यांनी पसरवले. मात्र या पवार यांनी आजपर्यंत एकदाही आपल्या भाषणात शिवछत्रपतींचे नाव घेतलेले नाही. आपला विरोध शिवछत्रपतींच्या स्मारकाला असूच शकत नाही. पण पुढच्या पिढीला इतिहास कळायला हवा असेल तर आधी महाराजांचे गडकिल्ले चांगले ठेवा, ती खरी स्मारक आहेत, असे ठाकरे यांनी सांगितले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेRatnagiriरत्नागिरी