शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
2
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
3
पेटीएम, जीपे, फोनपेवरील ऑटो पे कसे बंद कराल? आपोआप जातायत सबस्क्रीप्शन, पेमेंटचे पैसे... 
4
Aadhaar Card New Rules 1st Nov: महत्त्वाची बातमी! १ नोव्हेंबरपासून बदलणार आधार कार्डाशी निगडीत ३ मोठे नियम, जाणून घ्या
5
वनप्लस १५ येतोय...! पण १४ क्रमांक का वगळला? चिनी संस्कृतीत असे काय आहे...
6
Bank Holidays November 2025: नोव्हेंबरमध्ये किती दिवस बँका राहणार बंद? पाहा RBI ची हॉलिडे लिस्ट, पटापट आटपा काम
7
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
8
शंकर महाराज प्रकट दिन: म्हणा अकरा कवनांचे स्तोत्र, विजयी होईल सर्वत्र; कामना होतील पूर्ण
9
Tulasi Vivah 2025: विष्णू हे लक्ष्मीपती असूनही दरवर्षी तुळशीशी का लावला जातो विवाह?
10
LIC ची ‘ही’ स्कीम गुंतवणूकदारांना बनवेल कोट्यधीश!; ४ वर्षापर्यंत भरा प्रीमिअम, मिळतील १ कोटी
11
१०० वर्षांनी महालक्ष्मीसह ४ राजयोग: ७ राशींना सुबत्ता, कल्याण; बक्कळ लाभ, यशाचा मंगलमय काळ!
12
"मी तुला कच्च खाऊन टाकेन"; बायकोने नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, चपलेने धू-धू धुतलं
13
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२५: ‘मौनं सर्वार्थ साधनम्’, येणी वसूल होतील; सरकारी लाभ
14
तेव्हा गरजेपेक्षा जास्त कर्मचारी भरले, आता त्यांना बेरोजगार करणार; ॲमेझॉनमध्ये ३०,००० नोकऱ्या धोक्यात
15
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक
16
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
17
Shani Gochar 2025: शनिचा फेरा आपल्या राशीसाठी नेहमीच तापदायक ठरतो का? पाहूया भावानुसार फळ
18
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
19
मतदाराचे आणि त्याच्या वडिलाचे आडनाव वेगवेगळे, २० हजार मतदारांची नावे संशयास्पद: आदित्य ठाकरे
20
शाळेची नव्हे, धोक्याची घंटा! सरकारी अनास्था आणि 'विनाअनुदानित' इंग्रजी शाळांचा वाढता बाजार

तुमच्या जमिनींचा व्यापार होतोय, जागे राहा; राज ठाकरे यांनी टोचले कोकणवासीयांचे कान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2023 22:56 IST

ते कवडीमोलाने तुमच्या जमिनी घेतात आणि हजारपट दराने विकतात. तुम्हाला कळतच नाही का? राज ठाकरेंचा सवाल

रत्नागिरी : तुमचे लोकप्रतिनिधी व्यापारी आहेत. कोकणात कोणत्या भागात प्रकल्प येणार आहे, हे त्यांना माहिती असते. ते कवडीमोलाने तुमच्या जमिनी घेतात आणि हजारपट दराने विकतात. तुम्हाला कळतच नाही का ? अशा कोणालाही जमिनी विकू नका, जागे राहा, अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोकणवासीयांचे कान टोचले.

रत्नागिरीतील स्व. प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे शनिवारी (६ मे) झालेल्या जाहीर सभेत राज ठाकरे यांनी कोकण विकासाच्या मुद्द्यावरून सध्याच्या आणि आधीच्या सरकारवर चांगलेच ताशेरे ओढले. पर्यटन, कोकणातील गडकिल्ले, कोकणात येणारे उद्योग आणि त्याच्या जमिनींच्या व्यवहारातील घोटाळा या साऱ्यांवर राज यांनी आपल्या ‘ठाकरी’ शैलीत सणसणीत प्रहार केले.४० मिनिटांच्या मोजक्या, पण थेट भाषणात ठाकरे यांनी सुरुवातीलाच जमिनींच्या विक्रीबाबत कोकणी माणसाचे कान टोचले. याआधी एन्रॉन, अणुऊर्जा यांसारखे प्रकल्प येण्याआधीच कोकणी लोकांनी व्यापाऱ्यांना आपल्या जागा विकल्या. आता नाणार, बारसूबाबतही तेच होत आहे. जमिनी पायाखालून जात आहेत, तरीही कोकणी माणसाला कळत कसे नाही, असा थेट प्रश्नच त्यांनी केला. इथले लोकप्रतिनिधी व्यापारी आहेत आणि लोकांच्या जमिनींचे मोठमोठे व्यवहार करत आहेत. हेच कोकणी माणसाशी बोलण्यासाठी आपण आलो असल्याचे ते म्हणाले.

प्रकल्पांबाबत बोलताना ते म्हणाले की, नाणारमध्ये होणारा प्रकल्प अचानक बारसूत कसा गेला ? कुठून आले हे नाव ? या बारसूमध्ये कातळशिल्पे आहेत, जी युनेस्कोच्या यादीत समाविष्ट होत आहेत. अंतिम यादीत या कातळशिल्पांचे नाव आल्यानंतर आसपासच्या तीन किलोमीटर परिसरात कसलेही बांधकाम करता येणार नाही. मग तिथे प्रकल्प कसा होणार ? लोकांना सतत अंधारात ठेवले जात आहे. म्हणूनच जमिनी विकू नका, काेकण वाचवा, अशी विनंती त्यांनी हात जोडून केली. पर्यटनाच्या क्षेत्रात कोकणात इतकी उपलब्धता आहे की, कोकण राज्याला पोसू शकतो. मात्र, त्याकडे राज्य सरकारने लक्ष द्यायला हवे, असे ते म्हणाले.

पक्ष नसलेल्या पक्षाचे अध्यक्षउद्धव ठाकरे यांचे नाव न घेता राज ठाकरे यांनी त्यांना टोला हाणला. पक्ष नसलेल्या पक्षाचे अध्यक्ष आज येऊन गेले. म्हणाले, लोकांची भावना असेल तीच आमची भावना. म्हणजे काय ? बाळासाहेबांचे नाव घेऊन महापौरांचा बंगला ढापताना लोकांना त्यांची भावना विचारली होती का, असा थेट प्रश्नच राज ठाकरे यांनी विचारला. जनतेचे हित कशात आहे, हे बघण्याची जबाबदारी राज्यकर्त्यांची आहे. पण, तेच म्हणतात, लोकांची भावना तीच आमची भावना. अशाने विकास कसा होणार, असा प्रश्नही त्यांनी केला.

पवार यांच्यावरही कडाडून टीका

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकाला मी विरोध करत असल्याचे शरद पवार यांनी पसरवले. मात्र या पवार यांनी आजपर्यंत एकदाही आपल्या भाषणात शिवछत्रपतींचे नाव घेतलेले नाही. आपला विरोध शिवछत्रपतींच्या स्मारकाला असूच शकत नाही. पण पुढच्या पिढीला इतिहास कळायला हवा असेल तर आधी महाराजांचे गडकिल्ले चांगले ठेवा, ती खरी स्मारक आहेत, असे ठाकरे यांनी सांगितले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेRatnagiriरत्नागिरी