शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

ठाकरे सरकारने चिपळूणकरांच्या तोंडाला पाने पुसली, प्रसाद लाड यांचे टीकास्त्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2021 19:46 IST

ज्या-ज्या भागात शिवसेनेचे प्राबल्य आहे, तिथे तिथे जनतेवर अन्यायच होत आहे, असा टोला आमदार प्रसाद लाड यांनी लगावला.

चिपळूण :  चिपळूणच्या पुरमुक्तीबाबत उपाययोजना राबविण्यात शासनाला रस नाही. वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्यासाठी केवळ १० कोटी रुपयांचे गाजर दाखवून चिपळूणकरांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. महाविकास आघाडी सरकारने केवळ फसविण्याचा धंदाच सुरू ठेवला आहे. गाळाविषयी सरकार गंभीरतेने दखल घेत नाही. ज्या-ज्या भागात शिवसेनेचे प्राबल्य आहे, तिथे तिथे जनतेवर अन्यायच होत आहे, असा टोला आमदार प्रसाद लाड यांनी शुक्रवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत राज्य सरकारला लगावला.चिपळूण बचाव समितीच्या माध्यमातून सुरू असलेल्या साखळी उपोषणाच्या ११ व्या दिवशी आमदार प्रसाद लाड यांनी भेट दिली. उपोषणाकर्त्यांचे म्हणणे एैकून घेतल्यानंतर यविरोधात आवाज उठविण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर कापसाळ विश्रामगृह येथे आमदार लाड यांनी पत्रकारांशी संवाद साधला.लाड म्हणाले, वाशिष्ठी आणि शिवनदीतील गाळ काढण्याची चिपळूणवासीयांची मागणी रास्त आहे. वाशिष्ठी नदीत ३ लाख ३० हजार घनमिटर गाळ काढण्याची आवश्यकता आहे. मात्र प्रशासकीय अधिकारी कागदोपत्री ७० हजार घनमिटर गाळ असल्याचे सांगतात. शासकीय विभागात एकमेकांच्यात ताळमेळ नाही. कोणाचा कोणाला पत्ता नाही. गाळ काढण्यासाठी ३०० कोटींची मागणी असताना केवळ १० कोटीचा निधी मंजूर होतो. ही लच्छनास्पद बाब आहे. जिथे जिथे शिवसेनेचे प्राबल्य आहे, तिथे तिथे लोकांवर अन्याय होत आहे. येत्या ५ महिन्यात दोन्ही नद्यातील गाळ न काढल्यास पुन्हा चिपळूणात पुरपरिस्थिती निर्माण होण्यास वेळ लागणार नाही.पालकमंत्री रत्नागिरी जिल्ह्यात येतात, देवदर्शन घेतात. मात्र त्यांना उपोषणाचे काही देणे घेणे नाही. दोन दिवस जिल्ह्यात असतानाही त्यांनी चिपळूणकरांच्या उपोषणाला भेट देण्याचे टाळले आहे. खासदारांना तर गाळातलं काय कळतच नाही. उपोषणापर्यंत आमदार भास्कर जाधवांचे नेटवर्क पोहोचत नाही. यामुळेच चिपळूणकरांना न्याय मिळण्यासाठी अधिवेशनात भाजपच्या वतीने आवाज उठवून न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करू. चिपळूणकरांच्या आंदोलनात भाजपाने उडी घेतली आहे. आता चिपळूणकरांना न्याय मिळवून दिल्याशिवाय गप्प राहणार नाही, असे आश्वासन लाड यांनी दिले. यावेळी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, तालुकाध्यक्ष विनोद बोभसकर, शहराध्यक्ष आशिष खातू, नगरेसवक विजय चितळे, माजी तालुकाध्यक्ष सतीश मोरे आदी उपस्थित होते.फडणवीस, दरेकर चिपळूणच्या आंदोलनात उतरतीलआमदार म्हणून नव्हे, तर कोकणचा सुपुत्र म्हणून आपण या आंदोलनाकडे पाहत आहे. विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस व विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनीही या आंदोलनाची दखल घेतली आहे. लवकरच ते या आंदोलनाला भेट देण्यासाठी येणार आहेत. तत्पूर्वी दोघेही येत्या हिवाळी अधिवेशनात चिपळूणच्या प्रश्नावरून सरकारला सळो की पळो करून सोडतील. त्याची प्रक्रिया त्यांनी सुरूही केली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीchiplun floodचिपळूणला महापुराचा वेढाPrasad Ladप्रसाद लाड