शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

ठाकरे सरकारने चिपळूणकरांच्या तोंडाला पाने पुसली, प्रसाद लाड यांचे टीकास्त्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2021 19:46 IST

ज्या-ज्या भागात शिवसेनेचे प्राबल्य आहे, तिथे तिथे जनतेवर अन्यायच होत आहे, असा टोला आमदार प्रसाद लाड यांनी लगावला.

चिपळूण :  चिपळूणच्या पुरमुक्तीबाबत उपाययोजना राबविण्यात शासनाला रस नाही. वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्यासाठी केवळ १० कोटी रुपयांचे गाजर दाखवून चिपळूणकरांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. महाविकास आघाडी सरकारने केवळ फसविण्याचा धंदाच सुरू ठेवला आहे. गाळाविषयी सरकार गंभीरतेने दखल घेत नाही. ज्या-ज्या भागात शिवसेनेचे प्राबल्य आहे, तिथे तिथे जनतेवर अन्यायच होत आहे, असा टोला आमदार प्रसाद लाड यांनी शुक्रवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत राज्य सरकारला लगावला.चिपळूण बचाव समितीच्या माध्यमातून सुरू असलेल्या साखळी उपोषणाच्या ११ व्या दिवशी आमदार प्रसाद लाड यांनी भेट दिली. उपोषणाकर्त्यांचे म्हणणे एैकून घेतल्यानंतर यविरोधात आवाज उठविण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर कापसाळ विश्रामगृह येथे आमदार लाड यांनी पत्रकारांशी संवाद साधला.लाड म्हणाले, वाशिष्ठी आणि शिवनदीतील गाळ काढण्याची चिपळूणवासीयांची मागणी रास्त आहे. वाशिष्ठी नदीत ३ लाख ३० हजार घनमिटर गाळ काढण्याची आवश्यकता आहे. मात्र प्रशासकीय अधिकारी कागदोपत्री ७० हजार घनमिटर गाळ असल्याचे सांगतात. शासकीय विभागात एकमेकांच्यात ताळमेळ नाही. कोणाचा कोणाला पत्ता नाही. गाळ काढण्यासाठी ३०० कोटींची मागणी असताना केवळ १० कोटीचा निधी मंजूर होतो. ही लच्छनास्पद बाब आहे. जिथे जिथे शिवसेनेचे प्राबल्य आहे, तिथे तिथे लोकांवर अन्याय होत आहे. येत्या ५ महिन्यात दोन्ही नद्यातील गाळ न काढल्यास पुन्हा चिपळूणात पुरपरिस्थिती निर्माण होण्यास वेळ लागणार नाही.पालकमंत्री रत्नागिरी जिल्ह्यात येतात, देवदर्शन घेतात. मात्र त्यांना उपोषणाचे काही देणे घेणे नाही. दोन दिवस जिल्ह्यात असतानाही त्यांनी चिपळूणकरांच्या उपोषणाला भेट देण्याचे टाळले आहे. खासदारांना तर गाळातलं काय कळतच नाही. उपोषणापर्यंत आमदार भास्कर जाधवांचे नेटवर्क पोहोचत नाही. यामुळेच चिपळूणकरांना न्याय मिळण्यासाठी अधिवेशनात भाजपच्या वतीने आवाज उठवून न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करू. चिपळूणकरांच्या आंदोलनात भाजपाने उडी घेतली आहे. आता चिपळूणकरांना न्याय मिळवून दिल्याशिवाय गप्प राहणार नाही, असे आश्वासन लाड यांनी दिले. यावेळी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, तालुकाध्यक्ष विनोद बोभसकर, शहराध्यक्ष आशिष खातू, नगरेसवक विजय चितळे, माजी तालुकाध्यक्ष सतीश मोरे आदी उपस्थित होते.फडणवीस, दरेकर चिपळूणच्या आंदोलनात उतरतीलआमदार म्हणून नव्हे, तर कोकणचा सुपुत्र म्हणून आपण या आंदोलनाकडे पाहत आहे. विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस व विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनीही या आंदोलनाची दखल घेतली आहे. लवकरच ते या आंदोलनाला भेट देण्यासाठी येणार आहेत. तत्पूर्वी दोघेही येत्या हिवाळी अधिवेशनात चिपळूणच्या प्रश्नावरून सरकारला सळो की पळो करून सोडतील. त्याची प्रक्रिया त्यांनी सुरूही केली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीchiplun floodचिपळूणला महापुराचा वेढाPrasad Ladप्रसाद लाड