शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
2
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
6
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
7
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
8
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
9
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
10
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
11
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
12
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
13
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
14
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
15
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
16
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
17
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
18
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
19
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
20
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा

खानू गावात मिश्र लागवडीचा प्रयोग यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:23 IST

रत्नागिरी : तालुक्यातील सेंद्रिय शेतीचे गाव अशी ओळख असलेल्या खानू गावातील प्रयोगशील शेतकरी संदीप कांबळे यांनी मिश्र लागवडीचा प्रयोग ...

रत्नागिरी : तालुक्यातील सेंद्रिय शेतीचे गाव अशी ओळख असलेल्या खानू गावातील प्रयोगशील शेतकरी संदीप कांबळे यांनी मिश्र लागवडीचा प्रयोग यशस्वी केला आहे. एका गुंठ्यात मेथी, ज्वारी, कुळीथ लागवड करून चांगले उत्पादन मिळविले आहे.

गतवर्षी लाॅकडाऊन काळात संदीप कांबळे यांनी ‘थ्री लेअर मल्चिंग’चा प्रयोग केला होता. यावर्षी मात्र त्यांनी मिश्र लागवड केली आहे. कोकणातील लाल मातीत ज्वारीचे पीक चांगले होते, हे सिध्द केले आहे. कांबळे यांनी एक गुंठ्यात तीन फुटाचे वाफे तयार केले. ज्वारीसाठी देशी वाण निवडताना ‘मालदांडी’ हे पारंपरिक बियाणे मिरज येथून मागविले. वाफ्यावर प्रत्येकी सहा इंचावर टोकन पध्दतीने ज्वारीचे दाणे टाकले. त्यानंतर पूर्ण क्षेत्रावर मेथी पेरली, तर बेडच्या कडेला दोन दोन कुळीथाचे दाणे पेरले. दोन वेळा पाणी दिले. अवघ्या १५ ते २० दिवसात मेथी तरारून आली. मेथी काढून विक्री केली. मेथी काढल्यानंतर जमीन तर मोकळी झाली शिवाय रानही उगवले नाही. मेथी काढल्यानंतर कुळीथ व ज्वारी राहिली. कुळीथामुळे ज्वारी चांगली वाढली शिवाय जमिनीतील नत्र स्थिर ठेवण्यास मदत झाली. ६० ते ७० दिवसात कुळीथ तयार झाला. अवघ्या क्षेत्रावर कुळीथ पसरल्याने ज्वारीची उंची चांगली वाढली. कणसेही दाण्यांनी लगडली. कुळीथाचे मल्चींग असल्याने दोन वेळा दिलेल्या पाण्यावर ज्वारीचे पीक चांगले आले.

हुरडा भाजण्यासाठी कांबळे यांनी कणसे उपलब्ध करून दिली. चवीबरोबर पिकाचा दर्जाही चांगला राखला गेला. एका गुंठ्यात वीस किलो ज्वारी व २ किलो कुळीथ उपलब्ध झाला. शिवाय मेथी विक्री चांगली झाली. एकूणच मर्यादित जागेत, कमी कष्टात व मेहनतीमध्ये मिश्र लागवडीचा प्रयोग कांबळे यांनी यशस्वी केला आहे.

ज्वारी धान्य म्हणून आहारात वापरली जाते. शिवाय जनावरांसाठी पौष्टीक व सकस चारा आहे. साठवणूक करून ठेवता तर येते. शिवाय कडबा किंवा चारा तसाच जनावरांना घातला जातो. दुभत्या जनावरांसाठी ज्वारी, मका उपयुक्त असून, दुधाची मात्रा वाढते. त्यामुळे मिश्र लागवडीचा हा प्रयोग कोकणातील प्रत्येक शेतकऱ्यासाठी उपयुक्त आहे.

------------------------

गतवर्षी लाॅकडाऊन काळात ‘थ्री लेअर मल्चिंगचा प्रयोग यशस्वी झाला होता. यावर्षी मिश्र लागवड करून एकाचवेळी दोन ते तीन प्रकारचे उत्पन्न घेण्यात आले. मेथीमुळे गवत आले नाही, तर कुळीथामुळे जमिनीतील नत्र स्थिर राहून पिकाची वाढ चांगली झाली. शेतकऱ्यांना अशाच प्रकारे उत्पन्न घेणे शक्य आहे.

- संदीप कांबळे, खानू.