शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीतील मिरकरवाडातील गाळ उपसा सुरू, ड्रेझर, बार्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 12:55 IST

रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा मच्छीमारी बंदराच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू झाले आहे. या टप्प्याअंतर्गत प्रथम बंदरातील गाळ उपसण्याचे काम सुरू झाले आहे. त्यासाठी अत्याधुनिक फ्लोटिंग ड्रेझर तसेच बार्जही आणण्यात आली आहे.

ठळक मुद्देमिरकरवाडा मच्छीमारी बंदराच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू दुसऱ्या टप्प्यासाठी ७२ कोटींच्या खर्चाला मंजुरीबंदरातील २ लाख ८१ हजार क्युबिक मीटर गाळाचा उपसा केला जाणार

रत्नागिरी ,दि. ११ : शहरातील मिरकरवाडा मच्छीमारी बंदराच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू झाले आहे. या टप्प्याअंतर्गत प्रथम बंदरातील गाळ उपसण्याचे काम सुरू झाले आहे. त्यासाठी अत्याधुनिक फ्लोटिंग ड्रेझर तसेच बार्जही आणण्यात आली आहे. बंदराच्या दुसऱ्या टप्प्यातील या कामासाठी ७१ कोटी ८० लाख रुपये खर्चाला मंजुरी मिळाली आहे.जिल्ह्यातील मिरकरवाडा हे सर्वात मोठे मच्छीमारी बंदर आहे. राज्यात व केंद्रात कॉँग्रेस व घटक पक्षांचे सरकार असताना तत्कालिन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी खास दुसऱ्या टप्प्यातील कामांना व निधीलाही मंजुरी दिली होती. मात्र, गेल्या तीन वर्षात हे काम रेंगाळलेले होते. आता या कामाला गती मिळाली असून, दुसऱ्या टप्प्यातील गाळ उपसा करण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. बंदरातील २ लाख ८१ हजार क्युबिक मीटर गाळाचा उपसा केला जाणार आहे.दुसऱ्या टप्प्यातील बंदराजवळील समुद्रात ६७५ मीटर लांबीच्या ब्रेकवॉटर वॉलला मंजुरी देण्यात आली होती. त्यातील ५२५ मीटर वॉलचे काम पूर्ण झाले आहे. या बंदरात ज्या चॅनेलने मच्छीमारी नौका ये-जा करतात, त्या चॅनेलमधील गाळ काढण्याचे काम दोन दिवसांपूर्वी सुरू करण्यात आले आहे.

६०० क्युबिक मीटर गाळ उपसा क्षमता असलेली बार्ज आणि फ्लोटिंग ड्रेझरही यासाठी बंदरात कार्यरत झाला आहे. त्यामुळे आता जलदगतीने गाळ उपसा होईल, असा विश्वास मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यानी व्यक्त केला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीGovernmentसरकार