शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

कोकणातील वडिलोपार्जित जमिनीत आधुनिक शेतीची कास धरून मिळवले लाखोंचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 12:14 IST

यशकथा : शेतीमध्ये अर्धशतकी आयुष्य घालवताना त्यांनी आधुनिक शेतीची कास धरून यश मिळविले आहे.

- मेहरून नाकाडे (रत्नागिरी) 

कोकणी बांधवांप्रमाणे अर्थार्जनासाठी मुंबईची वाट न चोखळता वडिलोपार्जित जमिनीतच शेती करण्याचा निर्णय लांजा तालुक्यातील माजळ गावचे सुपुत्र सुधीर माजळकर-चव्हाण यांनी घेतला आणि आपल्या कष्टाने हा निर्णय सार्थही ठरवला. शेतीमध्ये अर्धशतकी आयुष्य घालवताना त्यांनी आधुनिक शेतीची कास धरून यश मिळविले आहे. आज वयाच्या सत्तरीच्या आसपास असतानाही त्यांचा शेतीचा ध्यास तरुणांनाही लाजवेल असाच आहे. वेगवेगळे प्रयोग व सेंद्रीय शेती करून ते  दरवर्षी लाखोंचे उत्पन्न मिळवित आहेत.

दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर सुधीर माजळकर यांनी मित्रांबरोबर नोकरीसाठी मुंबईकडे न जाण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे आई- वडिल आनंदीत झाले. शेतीबाबतचे धडे त्यांना वडिलांनी दिले. स्वत:च्याच वडिलोपार्जित २० ते २२ एकर जमिनीमध्ये ते विविध प्रकारची पिके फुलवीत आहेत. सहा एकर क्षेत्रावर त्यांनी १,५०० काजूलागवड केली असून, त्यासाठी विद्यापीठ मान्यताप्राप्त वेंगुर्ला ४ जातीची व गावठी काजूची लागवड केली आहे. दरवर्षी तीन ते साडेतीन टन काजूचे उत्पन्न त्यांना प्राप्त होत आहे. संकलित केलेला सर्व काजू व्यापाऱ्याला विकत असल्याने पांढऱ्या सोन्याचे रोखीने उत्पन्न मिळत आहे. अडीच एकर क्षेत्रावर आंबा लागवड केली असून, हापूस तसेच विविध जातींची १५० कलमे लावली आहेत. ते आंबा बागेचे वर्षभर संगोपन करीत असले तरी हंगामातील फळे काढण्यासाठी व्यापाऱ्याला देत आहेत. त्यामुळे आंबा पिकातूनही दरवर्षी त्यांना रोख रक्कम प्राप्त होते. पाच एकर क्षेत्रावर ३५० नारळ लावला आहे. बाणवली, टीडीसारखी रोपे लावली असून, हजारोपेक्षा अधिक नारळ विक्रीतून उत्पन्न मिळवीत आहेत. नारळाची विक्री करण्यासाठी कोठेही बाहेर जावे लागत नाही. स्थानिक बाजारपेठेतच नारळ विक्री होते.

माजळकर यांनी पडीक जागेत सागाची एक हजार झाडे लावली असून, सागाची झाडेदेखील नगदी उत्पन्न देणारी आहेत.  दरवर्षी खरीप हंगामात एक एकर शेतीत ते भात लागवड करतात. यातून दोन टन तांदळाचे उत्पन्न ते घेतात. आंबा कलम बागेत त्यांनी २० वर्षांपासून गांडूळ खताची निर्मिती करीत असून दरवर्षी तयार झालेले तीन टन खत ते शेतीसाठी वापरतात यामुळे त्यांची शेती सुपिक झालेली असून उत्पन्नही चांगले मिळत आहे. अतिरिक्त झालेले गांडूळखत ते विक्री करून त्यामाध्यमातूनही पैसे कमवितात.पत्नी व पदवीधर असलेले दोन मुले त्यांच्याबरोबर शेतीमध्य्ो कार्यरत आहेत.

सुधीर माजळकर यांच्या शेतीतील कार्याची दखल घेऊन जिल्हा परिषदेतर्फे शेतीनिष्ठ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. भात पिकाचे विक्रमी उत्पन्न घेतल्याबद्दल कृषी पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. वयाच्या ६९ वर्षीदेखील ते शेतीच्या कामात नित्य व्यग्र असतात. कृषिसेवक, कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वत:च्या शेतात नवनवीन प्रयोग ते करीत असतात.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी