शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

कोकणातील वडिलोपार्जित जमिनीत आधुनिक शेतीची कास धरून मिळवले लाखोंचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 12:14 IST

यशकथा : शेतीमध्ये अर्धशतकी आयुष्य घालवताना त्यांनी आधुनिक शेतीची कास धरून यश मिळविले आहे.

- मेहरून नाकाडे (रत्नागिरी) 

कोकणी बांधवांप्रमाणे अर्थार्जनासाठी मुंबईची वाट न चोखळता वडिलोपार्जित जमिनीतच शेती करण्याचा निर्णय लांजा तालुक्यातील माजळ गावचे सुपुत्र सुधीर माजळकर-चव्हाण यांनी घेतला आणि आपल्या कष्टाने हा निर्णय सार्थही ठरवला. शेतीमध्ये अर्धशतकी आयुष्य घालवताना त्यांनी आधुनिक शेतीची कास धरून यश मिळविले आहे. आज वयाच्या सत्तरीच्या आसपास असतानाही त्यांचा शेतीचा ध्यास तरुणांनाही लाजवेल असाच आहे. वेगवेगळे प्रयोग व सेंद्रीय शेती करून ते  दरवर्षी लाखोंचे उत्पन्न मिळवित आहेत.

दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर सुधीर माजळकर यांनी मित्रांबरोबर नोकरीसाठी मुंबईकडे न जाण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे आई- वडिल आनंदीत झाले. शेतीबाबतचे धडे त्यांना वडिलांनी दिले. स्वत:च्याच वडिलोपार्जित २० ते २२ एकर जमिनीमध्ये ते विविध प्रकारची पिके फुलवीत आहेत. सहा एकर क्षेत्रावर त्यांनी १,५०० काजूलागवड केली असून, त्यासाठी विद्यापीठ मान्यताप्राप्त वेंगुर्ला ४ जातीची व गावठी काजूची लागवड केली आहे. दरवर्षी तीन ते साडेतीन टन काजूचे उत्पन्न त्यांना प्राप्त होत आहे. संकलित केलेला सर्व काजू व्यापाऱ्याला विकत असल्याने पांढऱ्या सोन्याचे रोखीने उत्पन्न मिळत आहे. अडीच एकर क्षेत्रावर आंबा लागवड केली असून, हापूस तसेच विविध जातींची १५० कलमे लावली आहेत. ते आंबा बागेचे वर्षभर संगोपन करीत असले तरी हंगामातील फळे काढण्यासाठी व्यापाऱ्याला देत आहेत. त्यामुळे आंबा पिकातूनही दरवर्षी त्यांना रोख रक्कम प्राप्त होते. पाच एकर क्षेत्रावर ३५० नारळ लावला आहे. बाणवली, टीडीसारखी रोपे लावली असून, हजारोपेक्षा अधिक नारळ विक्रीतून उत्पन्न मिळवीत आहेत. नारळाची विक्री करण्यासाठी कोठेही बाहेर जावे लागत नाही. स्थानिक बाजारपेठेतच नारळ विक्री होते.

माजळकर यांनी पडीक जागेत सागाची एक हजार झाडे लावली असून, सागाची झाडेदेखील नगदी उत्पन्न देणारी आहेत.  दरवर्षी खरीप हंगामात एक एकर शेतीत ते भात लागवड करतात. यातून दोन टन तांदळाचे उत्पन्न ते घेतात. आंबा कलम बागेत त्यांनी २० वर्षांपासून गांडूळ खताची निर्मिती करीत असून दरवर्षी तयार झालेले तीन टन खत ते शेतीसाठी वापरतात यामुळे त्यांची शेती सुपिक झालेली असून उत्पन्नही चांगले मिळत आहे. अतिरिक्त झालेले गांडूळखत ते विक्री करून त्यामाध्यमातूनही पैसे कमवितात.पत्नी व पदवीधर असलेले दोन मुले त्यांच्याबरोबर शेतीमध्य्ो कार्यरत आहेत.

सुधीर माजळकर यांच्या शेतीतील कार्याची दखल घेऊन जिल्हा परिषदेतर्फे शेतीनिष्ठ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. भात पिकाचे विक्रमी उत्पन्न घेतल्याबद्दल कृषी पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. वयाच्या ६९ वर्षीदेखील ते शेतीच्या कामात नित्य व्यग्र असतात. कृषिसेवक, कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वत:च्या शेतात नवनवीन प्रयोग ते करीत असतात.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी