शहरं
Join us  
Trending Stories
1
'नोबेल समितीने शांती निवडण्याऐवजी राजकारण केलं', ट्रम्प यांना डावलताच 'व्हाईट हाऊस'चा थयथयाट
2
'भोसले घराण्यामुळे शिवरायांची प्रेरणा रुजली, म्हणूनच नागपुरच्या मातीतून संघाचा जन्म झाला', सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान
3
चीनचं अमेरिकेला जशास तसं प्रत्युत्तर; चिनी जहाजांवर शुल्क लादताच उचललं मोठं पाऊल!
4
NZ W vs BAN W: अखेर वर्ल्ड चॅम्पियन न्यूझीलंडनं भोपळा फोडला! बांगलादेशचा १०० धावांनी उडवला धुव्वा
5
केबिनमध्ये बोलावलं अन्...; दारूच्या नशेत डॉक्टराचे नात्यातील महिलेसोबत संतापजनक कृत्य
6
आशिया कपची ट्रॉफी भारताला मिळूच देणार नाही, मोहसीन नक्वींनी आता खेळली अशी चाल 
7
‘मला तुझ्याकडे बोलावून घे’, विरहाने व्याकूळ झालेल्या शेफाली जरीवालाच्या पतीची भावूक पोस्ट, चाहते चिंतित  
8
नवी मुंबई विमानतळाला आरएसएसच्या नेत्याचे नाव देण्याची तयारी; रोहित पवारांचा भाजपवर आरोप
9
आरोग्य सचिवांच्या दौऱ्यापूर्वीच दहा डॉक्टरांचे राजीनामास्त्र, सावंतवाडीतील आरोग्य क्षेत्रात खळबळ
10
Royal Enfield: आता घरबसल्या बूक करा रॉयल एनफील्ड, 'हे' मॉडेल्स ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध!
11
'बगराम हवाई तळ देणार नाही, जर तुम्हाला आमच्यासोबत...'; अफगाणिस्तानच्या मंत्र्याचा ट्रम्प यांना 'मेसेज', पाकिस्तानलाही इशारा
12
प्रेमासाठी काय पण! पाकिस्तानी कपलने सीमा ओलांडून भारतात केला प्रवेश, 'अशी' झाली पोलखोल
13
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
14
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!
15
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?
16
आठ युद्धं थांबवली तरी पुरस्कार समितीने डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल का नाकारला? समोर येताहेत ही कारणं
17
"मुंबईतील भूखंड उद्योगपतींना कवडीमोल दराने देण्याचा महायुती सरकारचा सपाटा, तर सर्वसामन्यांच्या घरांकडे दुर्लक्ष’’, काँग्रेसचा आरोप
18
सात युद्धं थांबवल्याच्या 'बढाया' मारणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना ठेंगा; 'शांततेचं नोबेल' लोकशाहीवादी मारिया मचाडो यांना
19
IND vs WI 2nd Test Day 1 Stumps: 'ओपनिंग डे'ला टीम इंडियाचा 'यशस्वी' शो! साई सुदर्शनही चमकला; पण...
20
'बदला घेणारच'; भैय्या गायकवाडची शिवीगाळ करत धमकी, टोलनाक्यावर बेदम मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल

मंडणगडवर लाखो रूपयांची खैरात

By admin | Updated: September 26, 2015 00:21 IST

चाहुल निवडणुकीची : श्रेय घेण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष सरसावले

मंडणगड : तालुक्याची ग्रामपंचायत कुठल्याही निकषात बसत नसतानाही केवळ शासनाच्या धोरणात्मक निर्णयामुळे नगरपंचायत होत आहे. त्यामुळे नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहराच्या विकासासाठी निधीची खैरात केली जात आहे. सत्तेसाठी निधीची खैरात वाटणाऱ्या राजकीय पक्षांकडून शहराव्यतिरिक्त तालुका मात्र उपेक्षित राहिला आहे.मंडणगड तालुका विकासकामांसाठी अनुकूल होता, असे असले तरी नगरपंचायत अस्तित्त्वात येईपर्यंत याकडे कोणत्याही राजकीय पक्षांचे लक्ष नव्हते. शहरातील स्वच्छता, नालेसफाई, पाखाड्या, अनधिकृत खोके, पाणी प्रश्न यांसारखे अनेक विषय न सुटणारे कोडे बनले होते़ मात्र, नगरपंचायतीची निवडणूक जाहीर होताच शहरातील विकासकामांसाठी विविध पक्ष सत्तर लाखाहूनही अधिक निधी देण्यास तयार झाले आहेत़ आमदार संजय कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून शहरात नुकतेच चाळीस लाखांच्या विकासकामाचे नारळ फोडले आहेत. भारतीय जनता पार्टीनेही शहरासाठी पंचवीस लाखांची विकासकामे देण्याचे जाहीर करुन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली ताकद आजमावण्याचा प्रयत्न केला आहे.शहर बसस्थानक आवारातील प्रसाधनगृहाचे उद्घाटन याचवेळी झाले. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणुकांपूर्वीच विकासकामे होत आहेत़ दुसरीकडे मंडणगड पाटपन्हळे रस्ता, मंडणगड स्टॅण्ड परिसरातील प्रसाधनगृह अशा अनेक विकासकामांचे श्रेय लाटण्याचा प्रयत्नही विविध राजकीय पक्षांकडून होत असल्याचे दिसत आहे़ आजवर शहरातील ग्रामपंचायतीत येथील नागरिकांनी विविध पक्षांना संधी दिली होती. मात्र, येथील समस्या दिसूनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या व आता त्यासाठी लाखो रुपयांच्या निधीची खैरात ओतून सत्तेत येण्याची स्वप्न पाहात आहेत़ दुसरीकडे पंचायत समिती ते खासदारकीपर्यंतची सत्तेतील सर्व पायऱ्या सोबत असून, केवळ नाकर्तेपणामुळे शहराला विकासापासून दूर ठेवू पाहणाऱ्यांना तसेच आजवर आमच्या हातात काही नाही, असे म्हणवणाऱ्यांना अचानक शहर विकासाचा कसा पुळका आला आणि निधी कसा उभा केला? आजवर शहरातील या समस्या दिसत नव्हत्या का? असा सवाल केला जात आहे. (प्रतिनिधी)नजीकच्या काही महिन्यातच नगरपंचायतीच्या निवडणुकीनंतर शहराच्या विकासासाठी आवश्यक असणारा हक्काचा निधी नगरपंचायतीला मिळणार आहे़ त्यावेळी नगरपंचायत स्वत:चा विकास स्वत: करू शकणार आहे़, असे असताना केवळ नगरपंचायतीत आपले राजकीय अस्तित्व राखण्यासाठी विविध पक्ष सरसावले आहेत.