शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

मंडणगडवर लाखो रूपयांची खैरात

By admin | Updated: September 26, 2015 00:21 IST

चाहुल निवडणुकीची : श्रेय घेण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष सरसावले

मंडणगड : तालुक्याची ग्रामपंचायत कुठल्याही निकषात बसत नसतानाही केवळ शासनाच्या धोरणात्मक निर्णयामुळे नगरपंचायत होत आहे. त्यामुळे नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहराच्या विकासासाठी निधीची खैरात केली जात आहे. सत्तेसाठी निधीची खैरात वाटणाऱ्या राजकीय पक्षांकडून शहराव्यतिरिक्त तालुका मात्र उपेक्षित राहिला आहे.मंडणगड तालुका विकासकामांसाठी अनुकूल होता, असे असले तरी नगरपंचायत अस्तित्त्वात येईपर्यंत याकडे कोणत्याही राजकीय पक्षांचे लक्ष नव्हते. शहरातील स्वच्छता, नालेसफाई, पाखाड्या, अनधिकृत खोके, पाणी प्रश्न यांसारखे अनेक विषय न सुटणारे कोडे बनले होते़ मात्र, नगरपंचायतीची निवडणूक जाहीर होताच शहरातील विकासकामांसाठी विविध पक्ष सत्तर लाखाहूनही अधिक निधी देण्यास तयार झाले आहेत़ आमदार संजय कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून शहरात नुकतेच चाळीस लाखांच्या विकासकामाचे नारळ फोडले आहेत. भारतीय जनता पार्टीनेही शहरासाठी पंचवीस लाखांची विकासकामे देण्याचे जाहीर करुन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली ताकद आजमावण्याचा प्रयत्न केला आहे.शहर बसस्थानक आवारातील प्रसाधनगृहाचे उद्घाटन याचवेळी झाले. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणुकांपूर्वीच विकासकामे होत आहेत़ दुसरीकडे मंडणगड पाटपन्हळे रस्ता, मंडणगड स्टॅण्ड परिसरातील प्रसाधनगृह अशा अनेक विकासकामांचे श्रेय लाटण्याचा प्रयत्नही विविध राजकीय पक्षांकडून होत असल्याचे दिसत आहे़ आजवर शहरातील ग्रामपंचायतीत येथील नागरिकांनी विविध पक्षांना संधी दिली होती. मात्र, येथील समस्या दिसूनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या व आता त्यासाठी लाखो रुपयांच्या निधीची खैरात ओतून सत्तेत येण्याची स्वप्न पाहात आहेत़ दुसरीकडे पंचायत समिती ते खासदारकीपर्यंतची सत्तेतील सर्व पायऱ्या सोबत असून, केवळ नाकर्तेपणामुळे शहराला विकासापासून दूर ठेवू पाहणाऱ्यांना तसेच आजवर आमच्या हातात काही नाही, असे म्हणवणाऱ्यांना अचानक शहर विकासाचा कसा पुळका आला आणि निधी कसा उभा केला? आजवर शहरातील या समस्या दिसत नव्हत्या का? असा सवाल केला जात आहे. (प्रतिनिधी)नजीकच्या काही महिन्यातच नगरपंचायतीच्या निवडणुकीनंतर शहराच्या विकासासाठी आवश्यक असणारा हक्काचा निधी नगरपंचायतीला मिळणार आहे़ त्यावेळी नगरपंचायत स्वत:चा विकास स्वत: करू शकणार आहे़, असे असताना केवळ नगरपंचायतीत आपले राजकीय अस्तित्व राखण्यासाठी विविध पक्ष सरसावले आहेत.