शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मंडणगडवर लाखो रूपयांची खैरात

By admin | Updated: September 26, 2015 00:21 IST

चाहुल निवडणुकीची : श्रेय घेण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष सरसावले

मंडणगड : तालुक्याची ग्रामपंचायत कुठल्याही निकषात बसत नसतानाही केवळ शासनाच्या धोरणात्मक निर्णयामुळे नगरपंचायत होत आहे. त्यामुळे नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहराच्या विकासासाठी निधीची खैरात केली जात आहे. सत्तेसाठी निधीची खैरात वाटणाऱ्या राजकीय पक्षांकडून शहराव्यतिरिक्त तालुका मात्र उपेक्षित राहिला आहे.मंडणगड तालुका विकासकामांसाठी अनुकूल होता, असे असले तरी नगरपंचायत अस्तित्त्वात येईपर्यंत याकडे कोणत्याही राजकीय पक्षांचे लक्ष नव्हते. शहरातील स्वच्छता, नालेसफाई, पाखाड्या, अनधिकृत खोके, पाणी प्रश्न यांसारखे अनेक विषय न सुटणारे कोडे बनले होते़ मात्र, नगरपंचायतीची निवडणूक जाहीर होताच शहरातील विकासकामांसाठी विविध पक्ष सत्तर लाखाहूनही अधिक निधी देण्यास तयार झाले आहेत़ आमदार संजय कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून शहरात नुकतेच चाळीस लाखांच्या विकासकामाचे नारळ फोडले आहेत. भारतीय जनता पार्टीनेही शहरासाठी पंचवीस लाखांची विकासकामे देण्याचे जाहीर करुन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली ताकद आजमावण्याचा प्रयत्न केला आहे.शहर बसस्थानक आवारातील प्रसाधनगृहाचे उद्घाटन याचवेळी झाले. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणुकांपूर्वीच विकासकामे होत आहेत़ दुसरीकडे मंडणगड पाटपन्हळे रस्ता, मंडणगड स्टॅण्ड परिसरातील प्रसाधनगृह अशा अनेक विकासकामांचे श्रेय लाटण्याचा प्रयत्नही विविध राजकीय पक्षांकडून होत असल्याचे दिसत आहे़ आजवर शहरातील ग्रामपंचायतीत येथील नागरिकांनी विविध पक्षांना संधी दिली होती. मात्र, येथील समस्या दिसूनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या व आता त्यासाठी लाखो रुपयांच्या निधीची खैरात ओतून सत्तेत येण्याची स्वप्न पाहात आहेत़ दुसरीकडे पंचायत समिती ते खासदारकीपर्यंतची सत्तेतील सर्व पायऱ्या सोबत असून, केवळ नाकर्तेपणामुळे शहराला विकासापासून दूर ठेवू पाहणाऱ्यांना तसेच आजवर आमच्या हातात काही नाही, असे म्हणवणाऱ्यांना अचानक शहर विकासाचा कसा पुळका आला आणि निधी कसा उभा केला? आजवर शहरातील या समस्या दिसत नव्हत्या का? असा सवाल केला जात आहे. (प्रतिनिधी)नजीकच्या काही महिन्यातच नगरपंचायतीच्या निवडणुकीनंतर शहराच्या विकासासाठी आवश्यक असणारा हक्काचा निधी नगरपंचायतीला मिळणार आहे़ त्यावेळी नगरपंचायत स्वत:चा विकास स्वत: करू शकणार आहे़, असे असताना केवळ नगरपंचायतीत आपले राजकीय अस्तित्व राखण्यासाठी विविध पक्ष सरसावले आहेत.