शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

रत्नागिरीत पारा चढला, सतर्कतेच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 18:20 IST

गतवर्षी तब्बल तीन वादळे आणि नोव्हेंबरपर्यंत सुरू असलेल्या अतिवृष्टीचा सामना केलेल्या कोकणातील वातावरण गेल्या आठवडाभरात पूर्णपणे बदलून गेले आहे. गुरूवारी ३६ अंशांपर्यंत तापमान वाढल्याने आधीच हैराण झालेल्या रत्नागिरी जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. त्यासाठी सतर्कतेच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देरत्नागिरीत पारा चढला, सतर्कतेच्या सूचना ३६ अंशांपर्यंत तापमान वाढल्याने हैराण

मनोज मुळ्ये रत्नागिरी : गतवर्षी तब्बल तीन वादळे आणि नोव्हेंबरपर्यंत सुरू असलेल्या अतिवृष्टीचा सामना केलेल्या कोकणातील वातावरण गेल्या आठवडाभरात पूर्णपणे बदलून गेले आहे. गुरूवारी ३६ अंशांपर्यंत तापमान वाढल्याने आधीच हैराण झालेल्या रत्नागिरी जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. त्यासाठी सतर्कतेच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.गेली काही वर्षे हवामानात खूप मोठा फरक पडत आहे. किनारपट्टी भागाला या बदलांचा खूप मोठा सामना करावा लागत आहे. गतवर्षात क्यार, फनी आणि माहा अशा तीन वादळांनी किनारपट्टीला दणका दिला. या वादळांमुळे रत्नागिरी जिल्ह्यात प्रत्यक्षात खूप मोठे नुकसान झाले नसले तरी त्याचा वातावरणावर खूप मोठा परिणाम झाला. क्यार वादळामुळे पावसाने खूप मोठा धुमाकूळ घातला. त्यानंतर माहा वादळामुळेही वातावरणात मोठा बदल झाला.वातावरणातील या बदलांचा अनुभव गेली काही वर्षे सातत्याने येत असून, त्याचा आंबा, काजूच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. त्याशिवाय कोकणातील वातावरणातही मोठा बदल झाला आहे. नोव्हेंबर महिन्यापर्यंत पाऊस पडत होता. रत्नागिरी जिल्ह्यात सरासरी ३५०० मिलिमीटर इतका पाऊस पडतो. यावर्षी तो ५००० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला. जानेवारी महिन्यापर्यंत थंडीचा पत्ताच नव्हता. मधेमधे आलेल्या थंडीच्या लाटा वगळता जिल्ह्यात थंडीचा अनुभवच आला नाही.थंडीअभावी आंबा, काजूचा हंगाम पुढे गेला. जानेवारी महिन्यात तापमान कमी झाले. मात्र, अपवादात्मक दिवशीच ते १६-१७ अंशापर्यंत घसरले. अन्यवेळी ते अधिकच होते. अवघा दीड महिनाच पारा कमी होता. आता पारा अचानक उसळला असून, गुरूवारी रत्नागिरीमध्ये ३६ अंश इतके तापमान नोंदले गेले आहे.

येत्या चोवीस तासात दिवसभरात उष्णतेच्या लाटा उसळण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. दुपारी १२ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत तापमान अधिक असेल, उन्हाच्या झळा अधिक असतील, असा इशारा देण्यात आला आहे. फेब्रुवारी महिन्यात उन्हाळा सुरू होताना इतके तापमान असेल तर नजीकच्या काही दिवसात तयार होणारा आंबा करपून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :TemperatureतापमानRatnagiriरत्नागिरी