शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

रत्नागिरीत पारा चढला, सतर्कतेच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 18:20 IST

गतवर्षी तब्बल तीन वादळे आणि नोव्हेंबरपर्यंत सुरू असलेल्या अतिवृष्टीचा सामना केलेल्या कोकणातील वातावरण गेल्या आठवडाभरात पूर्णपणे बदलून गेले आहे. गुरूवारी ३६ अंशांपर्यंत तापमान वाढल्याने आधीच हैराण झालेल्या रत्नागिरी जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. त्यासाठी सतर्कतेच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देरत्नागिरीत पारा चढला, सतर्कतेच्या सूचना ३६ अंशांपर्यंत तापमान वाढल्याने हैराण

मनोज मुळ्ये रत्नागिरी : गतवर्षी तब्बल तीन वादळे आणि नोव्हेंबरपर्यंत सुरू असलेल्या अतिवृष्टीचा सामना केलेल्या कोकणातील वातावरण गेल्या आठवडाभरात पूर्णपणे बदलून गेले आहे. गुरूवारी ३६ अंशांपर्यंत तापमान वाढल्याने आधीच हैराण झालेल्या रत्नागिरी जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. त्यासाठी सतर्कतेच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.गेली काही वर्षे हवामानात खूप मोठा फरक पडत आहे. किनारपट्टी भागाला या बदलांचा खूप मोठा सामना करावा लागत आहे. गतवर्षात क्यार, फनी आणि माहा अशा तीन वादळांनी किनारपट्टीला दणका दिला. या वादळांमुळे रत्नागिरी जिल्ह्यात प्रत्यक्षात खूप मोठे नुकसान झाले नसले तरी त्याचा वातावरणावर खूप मोठा परिणाम झाला. क्यार वादळामुळे पावसाने खूप मोठा धुमाकूळ घातला. त्यानंतर माहा वादळामुळेही वातावरणात मोठा बदल झाला.वातावरणातील या बदलांचा अनुभव गेली काही वर्षे सातत्याने येत असून, त्याचा आंबा, काजूच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. त्याशिवाय कोकणातील वातावरणातही मोठा बदल झाला आहे. नोव्हेंबर महिन्यापर्यंत पाऊस पडत होता. रत्नागिरी जिल्ह्यात सरासरी ३५०० मिलिमीटर इतका पाऊस पडतो. यावर्षी तो ५००० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला. जानेवारी महिन्यापर्यंत थंडीचा पत्ताच नव्हता. मधेमधे आलेल्या थंडीच्या लाटा वगळता जिल्ह्यात थंडीचा अनुभवच आला नाही.थंडीअभावी आंबा, काजूचा हंगाम पुढे गेला. जानेवारी महिन्यात तापमान कमी झाले. मात्र, अपवादात्मक दिवशीच ते १६-१७ अंशापर्यंत घसरले. अन्यवेळी ते अधिकच होते. अवघा दीड महिनाच पारा कमी होता. आता पारा अचानक उसळला असून, गुरूवारी रत्नागिरीमध्ये ३६ अंश इतके तापमान नोंदले गेले आहे.

येत्या चोवीस तासात दिवसभरात उष्णतेच्या लाटा उसळण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. दुपारी १२ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत तापमान अधिक असेल, उन्हाच्या झळा अधिक असतील, असा इशारा देण्यात आला आहे. फेब्रुवारी महिन्यात उन्हाळा सुरू होताना इतके तापमान असेल तर नजीकच्या काही दिवसात तयार होणारा आंबा करपून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :TemperatureतापमानRatnagiriरत्नागिरी