शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

मल्टिस्टेट कंपनीचा मास्टरमाइंड चिपळूण, खेडमधील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:34 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : दामदुप्पट परताव्याचे आमिष दाखवीत कोट्यवधींची गुंतवणूक करून घेत लाखो गुंतवणूकदारांना ठेंगा दाखविणाऱ्या मल्टिस्टेट कंपनीची ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

चिपळूण : दामदुप्पट परताव्याचे आमिष दाखवीत कोट्यवधींची गुंतवणूक करून घेत लाखो गुंतवणूकदारांना ठेंगा दाखविणाऱ्या मल्टिस्टेट कंपनीची दखल स्थानिक पोलीस यंत्रणेने घेतली आहे. रत्नागिरी, तसेच चिपळूण पोलिसांनी याबाबत कालिकाई संपर्क सेवा समितीचे सचिव राजेश सावंत यांच्याकडून माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. या मल्टिस्टेट कंपनीचे मास्टरमाइंड चिपळूण आणि खेड तालुक्यातील असल्याने खळबळ उडाली आहे.

मल्टिस्टेट कंपनीच्या सूत्रधारांनी थेट ठाणे येथे मल्टिस्टेट कंपनीची स्थापना करून त्याला प्रथम एका प्रसिद्ध देवीचे नाव दिले. त्यानंतर राष्ट्रीय स्तरावरील एका कृषिजन्य विभागाचे नाव देऊन वर्गीकरण करण्यात आले. त्यामुळे लोकांचा विश्वास अधिक दृढ झाला. हजारो नव्हे, तर लाखो लोकांनी या मल्टिस्टेट कंपनीमध्ये गुंतवणूक केली. ठाणे येथे मुख्य कार्यालय, तर वडाळा येथे काॅर्पोरेट कार्यालय थाटून कंपनीचा भपकेदार कारभार सुरू करण्यात आला होता. सुरुवातीला काही काळ गुंतवणूकदारांना ठरल्याप्रमाणे पैसे मिळाले, नंतर मात्र मास्टरमाइंड असलेले सूत्रधार एकेक करून गायब झाले आणि लाखो गुंतवणूकदारांनी डोक्याला हात लावला.

गुंतवणूकदारांना न्याय मिळवून देण्यासाठी कालिकाई संपर्क सेवा समितीची स्थापना करण्यात आली. त्या माध्यमातून थेट आर्थिक गुन्हे शाखा मुंबई येथे तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीची दखल घेत हे प्रकरण चौकशीसाठी पोलीस उपायुक्तांकडे पाठविण्यात आले; परंतु मल्टिस्टेट कंपनीचे मुख्य कार्यालय ठाणे येथे असल्याने आर्थिक गुन्हे शाखेनेच या प्रकरणाची चौकशी करावी, अशी कालिकाई संपर्क सेवा समितीची मागणी आहे. त्याला अद्याप यश आलेले नसल्याने संपर्क सेवा समितीने आता थेट गृहमंत्र्यांची भेट आणि आझाद मैदानात धरणे आंदोलनाची भूमिका घेतली आहे.