शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
2
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
3
Abhishek Sharma Record Breaking Fifty : जिथं सगळ्यांनी नांगी टाकली, तिथं अभिषेक शर्माची विक्रमी खेळी
4
प्रेयसीचा शो पाहण्यासाठी ५०० कोटी रुपयांचे सरकारी विमान वापरलं; काश पटेल वादाच्या भोवऱ्यात
5
Rohit Arya: रोहित आर्याला मी वेगळे पैसे दिलेले, सरकारी बिलाशी संबंध नाही; दीपक केसरकरांची सारवासारव
6
तेलंगणामध्ये मोंथा वादळाचा कहर, १२ जणांचा मृत्यू; मुसळधार पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी, रस्तेही बंद
7
कोणता झेंडा घेऊ हाती अशी मनसैनिकांची अवस्था, राज ठाकरे कन्फ्यूज नेते; शिंदेसेनेची बोचरी टीका
8
Lenskart IPO: महागडा आहे का लेन्सकार्टचा आयपीओ? व्हॅल्यूएशनवरुन उपस्थित होताहेत प्रश्न, एक्सपर्ट म्हणाले...
9
अँड्रॉइड की अ‍ॅपल, मोबाईल घोटाळे रोखण्यात कोणती सिस्टीम चांगली? गुगलने केला धक्कादायक खुलासा
10
टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचताच आयसीसीने धमाका करून टाकला! ऑस्ट्रेलिया संघ बघतच राहिला...
11
सौदी अरेबिया फिफा विश्वचषकासाठी बांधणार 'स्काय स्टेडियम'; व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा?
12
संजय राऊत दोन महिने राहणार सार्वजनिक जीवनापासून दूर, समोर आलं चिंताजनक कारण, निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे गटाची चिंता वाढली
13
IND vs AUS :हेजलवूडचा भेदक मारा! तिलक वर्माच्या पदरी भोपळा; ४९ धावांत भारताचा अर्धा संघ तंबूत
14
Viral Video : व्वा! काय आयडिया आहे... मित्र फिरायला गेले अन् बिझनेस सुरू करून आले! होतंय कौतुक
15
राज ठाकरेंच्या मनसेचं उद्धवसेनेत विलिनीकरण होणार?; शिंदेसेनेच्या नेत्याचा दावा, 'तो' फोटो दाखवला
16
IND W vs SA W: भारत- दक्षिण आफ्रिका यांच्यातील अंतिम सामना ठरणार 'ऐतिहासिक'!
17
PhysicsWallah IPO: पुढच्या महिन्यात येतोय फिजिक्सवालाचा आयपीओ, ₹३८२० कोटी उभारणार, काय आहेत अधिक डिटेल्स?
18
एपीआयला हिरो व्हायचं होतं म्हणून रोहित आर्याच्या छातीत गोळी झाडली; अ‍ॅडव्होकेट नितीन सातपुतेंचा आरोप
19
WhatsApp वर येणार Facebook सारखं नवं फीचर; प्रोफाईलवर लावता येणार सुंदर कव्हर फोटो
20
धक्कादायक! रोहित आर्याने उर्मिला कोठारे, गिरीश ओक यांनाही स्टुडिओत बोलवलेलं, मुलांसोबत फोटोही काढले अन्...

रत्नागिरीत आंबा, काजू बागायतदारांच्या न्याय मागण्यासाठी येत्या मंगळवारी धडक मोर्चा 

By मेहरून नाकाडे | Updated: July 21, 2023 18:02 IST

..अन्यथा शेतकऱ्यांना वेगळा विचार करावा लागेल

रत्नागिरी : कोकणातील आंबा काजू शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी व प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवार दि. २५ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर बागायतदारांनी धडक मोर्चा आयोजित केला आहे. बागायतदारांच्या सहनशीलतेचा अंत न शासनाने पाहू नये. अन्यथा येथील बागायतदारांनाही वेगळ्या पध्दतीने विचार करावा लागेल, असा इशारा पावस आंबा उत्पादन संघाचे अध्यक्ष प्रकाश साळवी यांनी बागायतदारांतर्फे दिला आहे.आंबा- काजू बागायतदारांच्या प्रश्नांबाबत आतापर्यंत निव्वळ आश्वासने देण्यात आली, ठोस कार्यवाही अद्याप केलेली नाही. यावर्षी एकूण आंबा उत्पादन अत्यल्प असल्याने बागायतदारांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.याबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन केले असल्याची माहिती साळवी यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन सकारात्मक निर्णय घेईल अशी अपेक्षा आहे. अन्यथा शेतकऱ्यांना वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा यावेळी उपस्थित बागायतदारांनीही दिला.आंबा, काजू, फळबागायतदार, शेतकरी, छोटे व्यवसायिक यांची संपूर्ण कर्ज मुक्ती विना अट, सरसकट झालीच पाहिजे. कोकणातील प्रदूषण कारखाने बंद झालेच पाहिजे. कर्जदार शेतकऱ्यांचे ७/१२ चे उतारे कर्जमुक्त झाले पाहिजे. सन २०१४-१५ या वर्षापासून २०२३-२४ पर्यंत सर्व शेतकऱ्यांचे व्याज व पुढील वर्षासाठी चार टक्के व्याजाने शासनाने कर्ज उपलब्ध करून दिले पाहिजे. शेतकऱ्यांचा कृषीपंप व घरगुती मीटरचे दर कमी करण्यात यावे. खते, आैषधांच्या किंमती भरमसाठ वाढलेल्या आहेत, त्यांचा जीएसटी माफ करावा किंवा शेतकऱ्याने खते व आैषधे खरेदी केलेल्या बिलावर शासनाने अनुदान द्यावे. आंब्याच्या तसेच कोकणातील विविध पिकांच्या संशोधनासाठी रत्नागिरी येथे सुसज्ज अशी प्रयोगशाळा करण्यात यावी.आंबा बागायतदार, शेतकरी, त्यांचे कुटूंबिय, त्यांच्या सोबतीने काम करणारे कामगार (महिला व पुरूष) यांना जीवन व आरोग्य विमा संरक्षण मिळावे. शेतांमध्ये बागांमध्ये काम करत असताना सर्पदंश, जंगली श्वापदे, झाडावरून पडणे, फवारणी करताना विषबाधा, ह्रदयविकार यामुळे मृत्यू आल्यास दोन्ही विमा संरक्षण मिळणे आवश्यक आहे. या विविध मागण्यांसाठी शेतकरी धडक मोर्चा आयोजित करण्यात आला असल्याचे प्रकाश साळवी यांनी सांगितले.यावेळी कुमार शेट्ये, नंदकुमार मोहिते, मंगेश साळवी, मनसूर काझी, सचीन आचरेकर, अमृत पोकडे, किरण तोडणकर, अशोक भाटकर, प्रल्हाद शेट्ये, ज्ञानेश्वर पोतकर उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीagitationआंदोलनcollectorजिल्हाधिकारी