शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

रत्नागिरीत आंबा, काजू बागायतदारांच्या न्याय मागण्यासाठी येत्या मंगळवारी धडक मोर्चा 

By मेहरून नाकाडे | Updated: July 21, 2023 18:02 IST

..अन्यथा शेतकऱ्यांना वेगळा विचार करावा लागेल

रत्नागिरी : कोकणातील आंबा काजू शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी व प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवार दि. २५ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर बागायतदारांनी धडक मोर्चा आयोजित केला आहे. बागायतदारांच्या सहनशीलतेचा अंत न शासनाने पाहू नये. अन्यथा येथील बागायतदारांनाही वेगळ्या पध्दतीने विचार करावा लागेल, असा इशारा पावस आंबा उत्पादन संघाचे अध्यक्ष प्रकाश साळवी यांनी बागायतदारांतर्फे दिला आहे.आंबा- काजू बागायतदारांच्या प्रश्नांबाबत आतापर्यंत निव्वळ आश्वासने देण्यात आली, ठोस कार्यवाही अद्याप केलेली नाही. यावर्षी एकूण आंबा उत्पादन अत्यल्प असल्याने बागायतदारांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.याबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन केले असल्याची माहिती साळवी यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन सकारात्मक निर्णय घेईल अशी अपेक्षा आहे. अन्यथा शेतकऱ्यांना वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा यावेळी उपस्थित बागायतदारांनीही दिला.आंबा, काजू, फळबागायतदार, शेतकरी, छोटे व्यवसायिक यांची संपूर्ण कर्ज मुक्ती विना अट, सरसकट झालीच पाहिजे. कोकणातील प्रदूषण कारखाने बंद झालेच पाहिजे. कर्जदार शेतकऱ्यांचे ७/१२ चे उतारे कर्जमुक्त झाले पाहिजे. सन २०१४-१५ या वर्षापासून २०२३-२४ पर्यंत सर्व शेतकऱ्यांचे व्याज व पुढील वर्षासाठी चार टक्के व्याजाने शासनाने कर्ज उपलब्ध करून दिले पाहिजे. शेतकऱ्यांचा कृषीपंप व घरगुती मीटरचे दर कमी करण्यात यावे. खते, आैषधांच्या किंमती भरमसाठ वाढलेल्या आहेत, त्यांचा जीएसटी माफ करावा किंवा शेतकऱ्याने खते व आैषधे खरेदी केलेल्या बिलावर शासनाने अनुदान द्यावे. आंब्याच्या तसेच कोकणातील विविध पिकांच्या संशोधनासाठी रत्नागिरी येथे सुसज्ज अशी प्रयोगशाळा करण्यात यावी.आंबा बागायतदार, शेतकरी, त्यांचे कुटूंबिय, त्यांच्या सोबतीने काम करणारे कामगार (महिला व पुरूष) यांना जीवन व आरोग्य विमा संरक्षण मिळावे. शेतांमध्ये बागांमध्ये काम करत असताना सर्पदंश, जंगली श्वापदे, झाडावरून पडणे, फवारणी करताना विषबाधा, ह्रदयविकार यामुळे मृत्यू आल्यास दोन्ही विमा संरक्षण मिळणे आवश्यक आहे. या विविध मागण्यांसाठी शेतकरी धडक मोर्चा आयोजित करण्यात आला असल्याचे प्रकाश साळवी यांनी सांगितले.यावेळी कुमार शेट्ये, नंदकुमार मोहिते, मंगेश साळवी, मनसूर काझी, सचीन आचरेकर, अमृत पोकडे, किरण तोडणकर, अशोक भाटकर, प्रल्हाद शेट्ये, ज्ञानेश्वर पोतकर उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीagitationआंदोलनcollectorजिल्हाधिकारी