शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

शासकीय सर्व कार्यालयांमध्ये मार्च एंडिंगची धावपळ सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 15:12 IST

Government Ratnagiri-मार्चअखेर जवळ आल्याने शासकीय सर्व कार्यालयांमध्ये मार्च एंडिंगची धावपळ सुरू आहे. बिले खर्ची टाकण्यासाठी तसेच पगार मिळावेत, यासाठी जिल्हा कोषागार कार्यालयात सध्या गर्दी होऊ लागली असून या कार्यालयात बिलांची संख्या वाढू लागली आहे.

ठळक मुद्देशासकीय सर्व कार्यालयांमध्ये मार्च एंडिंगची धावपळ सुरू निवडणुकीच्या बिलांची धांदल

रत्नागिरी : मार्चअखेर जवळ आल्याने शासकीय सर्व कार्यालयांमध्ये मार्च एंडिंगची धावपळ सुरू आहे. बिले खर्ची टाकण्यासाठी तसेच पगार मिळावेत, यासाठी जिल्हा कोषागार कार्यालयात सध्या गर्दी होऊ लागली असून या कार्यालयात बिलांची संख्या वाढू लागली आहे.सध्या सर्वच कार्यालयांमध्ये मार्च एंडिंगची धावपळ सुरू आहे. त्यामुळे कामांचा निपटारा होण्यासाठी कर्मचाऱ्यांना सायंकाळी कार्यालयीन वेळेपेक्षा जास्त वेळ थांबावे लागत आहे. सर्व कामांची बिले तयार करून ती कोषागार कार्यालयाकडे पाठविण्याकामी सर्वच कर्मचारी यात अडकले आहेत. त्यामुळे सायंकाळी उशिरापर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय, भूमिअभिलेख कार्यालये सध्या गजबजलेली आहेत.जिल्हा कोषागार कार्यालयातही सध्या मार्च एंडिंगची धावपळ सुरू आहे. जिल्ह्यातील सुमारे २३५ कार्यालयांतील विविध बिले, कर्मचाऱ्यांची वैयक्तिक देयके, कार्यालयीन खर्च, वीज बिले, फोन बिल, सेवानिवृत्तांचे पगार आदी कामे या कार्यालयाकडून केली जातात. त्यामुळे या सर्व देयकांचा निपटारा करण्यात जिल्हा कोषागार कार्यालय गुंतले आहे.मार्च महिना सुरू होताच सर्वच कार्यालयांची वर्षाचा निधी खर्ची पडावा आणि त्याची बिले मिळावीत, यासाठी तारांबळ सुरू होते. कर्मचाऱ्यांची वैद्यकीय बिले, प्रवास भत्ते, स्टेशनरी बिले, पुढील वर्षासाठी खरेदी, शासकीय वाहनांवरील दुरुस्तीचा खर्च आदींची बिले कोषागार कार्यालयाकडे ३१ मार्चपूर्वी सादर करण्यासाठी ही सर्व कार्यालये धावपळ करत आहेत.नुकसान भरपाई वाटपाची धांदलजिल्ह्यात जून महिन्यात आलेले निसर्ग चक्रीवादळ तसेच पावसाळ्याच्या कालावधित निर्माण झालेली पूरपरिस्थिती यामुळे जिल्ह्याचे अतोनात नुकसान झाले आहे. भरपाईचा निधी शासनाकडून जिल्हा प्रशासनाकडे आला आहे.निवडणुकीच्या बिलांची धांदलजानेवारी महिन्यात ४७९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्याने आता मार्चअखेर निवडणुकीसाठी झालेल्या खर्चांची बिले करताना सर्व तहसील कार्यालयांच्या निवडणूक शाखेची दमछाक झाली आहे. निवडणूक कार्यासाठी नियुक्त केलेल्या अधिकारी, कर्मचारी यांच्या मानधनाची बिले करतानाच दमछाक होऊ लागली असून इतर निधी खर्चाचीही बिले सादर करावी लागत असल्याने आता शेवटच्या टप्प्यात धांदल उडाली आहे.

टॅग्स :GovernmentसरकारRatnagiriरत्नागिरी