शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

मराठी शाळा सलाईनवर

By admin | Updated: April 2, 2016 00:11 IST

शिक्षणमंत्र्यांना निवेदन : शाळा बंदचा बसणार फटका

रत्नागिरी : राज्यात २८ आॅगस्ट २०१५ व ८ जानेवारी २०१६ च्या शासन निर्णयाने खळबळ उडाली आहे. ज्या प्राथमिक शाळांची विद्यार्थी संख्या १३५ तसेच उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी संख्या ९० पेक्षा कमी आहे. अशा शाळांमध्ये मुख्याध्यापकपद अनुज्ञेय राहणार नाही. त्यामुळे हजारो मुख्याध्यापक पदे रद्द होणार आहेत. याबाबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शिक्षक सेलचे उपाध्यक्ष महादेव सुळे यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना निवेदन सादर केले आहे.शासनाने २०पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या बंद केलेल्या शाळा त्या भागातील अन्य शाळांशी जोडण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. त्याचबरोबर शाळा बंद केल्यास तेथील शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत. त्यामुळे शासनाच्या या निर्णयाविरोधात नाराजीचा सूर उमटत आहे. हा निर्णय रद्द करण्याची मागणी शिक्षकांकडून करण्यात येत आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शिक्षक सेलचे उपाध्यक्ष महादेव सुळे यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेत हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली. तसेच शालेय शिक्षण सचिव यांना शहरी, दुर्गम डोंगराळ तसेच ग्रामीण भागातील मुख्याध्यापक मान्यता निकष वेगवेगळे करण्याचीही मागणी त्यांनी केली आहे.विद्यार्थी संख्या कमी असलेल्या शाळांना बहुवर्ग अध्यापन पध्दतीचा वापर करण्याचा शासन निर्णय २८ आॅगस्ट रोजी काढल्याने वर्ग संख्येपेक्षा शिक्षक संख्या कमी असणार आहे. तसेच मुख्याध्यापकपदही अनुज्ञेय नसल्याने याच शिक्षकांना शालेय पोषण आहार, कलचाचणी, शाळाबाह्य मुले, बीएलओ, निवडणुकीची कामे, सरल, शासकीय अहवाल, पालक-शिक्षक संघ, माता-बालक संघ, शालेय व्यवस्थापन समिती, इत्यादी कामे व शालेय व्यवस्थापन करण्याची मोठी जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. त्यामुळे मुलांना पूर्णवेळ शिक्षक उपलब्ध होणार नसल्याने शैक्षणिक दर्जा सोबतच मराठी शाळांचे अस्तित्व धोक्यात येणार असल्याचे महादेव सुळे यांनी या भेटीदरम्याने शिक्षणमंत्र्यांना सांगितले. (प्रतिनिधी)मोफत शिक्षण : हक्क मिळाले पाहिजेतग्रामीण आणि शहरी भागातील संच मान्यतेचे निकष वेगवेगळे असावेत, सर्वांना एकाच तराजूत तोलून चालणार नाही. भौगोलिक परिस्थितीचा सुध्दा विचार करणे आवश्यक आहे. आरटीईनुसार बालकांना मोफत शिक्षण मिळणे हा त्यांचा हक्क आहे. त्यापासून त्यांना वंचित ठेवता येणार नाही.निर्णय मागे घ्या...शासनाच्या शाळा बंद निर्णयाचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागात बसणार आहे. त्यामुळे हा निर्णय मागे घेण्याची मागणी जोर धरत आहे.