शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
3
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
4
लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
5
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
6
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्याधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
7
VIDEO : अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मोठा चमत्कार...! विमानाचे धातूही वितळले, पण 'या' धर्मग्रंथाला साधा स्पर्षही करू शकली नाही आग!
8
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
9
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
10
MLC 2025: भारतीय फलंदाजाचा धुमधडाका! चार चेंडूत मारले चार षटकार, केली तुफान फटकेबाजी
11
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
12
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
13
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
14
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
15
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
16
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
17
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
18
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
19
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
20
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार

Maratha Reservation : मराठा समाजाचे शुक्रवारी रत्नागिरीत आंदोलन, अत्यावश्यक सेवा वगळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 17:32 IST

मराठा समाज गेली दोन वर्षे आरक्षणासाठी आंदोलने करीत असून, शासनाकडून केवळ दिशाभूल केली जात आहे. त्यामुळे आता येत्या शुक्रवारी, ३ रोजी आरक्षणासाठी तीव्र आंदोलन उभारून या दिवशी संपूर्ण जिल्हा बंद करण्याचा निर्धार सकल मराठा समाजाच्या बैठकीत करण्यात आला.

ठळक मुद्देमराठा समाजाचे शुक्रवारी आंदोलन, अत्यावश्यक सेवा वगळणार जिल्हा बंदच्या नियोजन सभेत निर्धार

रत्नागिरी : मराठा समाज गेली दोन वर्षे आरक्षणासाठी आंदोलने करीत असून, शासनाकडून केवळ दिशाभूल केली जात आहे. त्यामुळे आता येत्या शुक्रवारी, ३ रोजी आरक्षणासाठी तीव्र आंदोलन उभारून या दिवशी संपूर्ण जिल्हा बंद करण्याचा निर्धार सकल मराठा समाजाच्या बैठकीत करण्यात आला.रत्नागिरीतील मराठा समाजानेही तीव्र आंदोलन उभारण्याची तयारी केली आहे. त्यादृष्टीने या आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी तसेच नियोजन करण्यासाठी  येथील विवेक हॉटेलच्या मैदानावर मराठा समाजाची बैठक माजी खासदार नीलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

यावेळी व्यासपीठावर मराठा सकल समाजाच्या मंगला नलावडे, माजी उपनगराध्यक्ष संजू साळवी, सुधाकर सावंत, नित्यानंद दळवी, भाऊ देसाई, केशव इंदुलकर, संतोष तावडे, प्रताप सावंत-देसाई उपस्थित होते.या सभेत सुधाकर सावंत, प्रताप सावंत - देसाई यांनी मुख्यमंत्री आरक्षणाबाबत केवळ आश्वासनेच देत आले आहेत, त्यामुळे आता तीव्र आंदोलनाला पर्याय नसल्याचे मत व्यक्त केले. यासाठी समाजाने एकत्र यावे, असे आवाहन केले. मंगला नलावडे यांनी आंदोलन करणे काळाची गरज आहे. मात्र, जाळपोळ करून आंदोलनाला अर्र्थ येतो का, असा सवाल केला. आंदोलन करताना कोकणाला कोणताही डाग लागता कामा नये, याची काळजी घेऊया, असे मत व्यक्त केले.माजी खासदार नीलेश राणे यांनी समाज म्हणून सर्वांनी एकत्र येऊया, असे आवाहन केले. तसेच उत्स्फूर्त सहभाग असला की, आंदोलने आपोआप यशस्वी होतात, असे मत प्रदर्शित केले. या दिवशी जिल्हा बंद होणारच, त्यासाठी सर्व बाहेर पडणे गरजेचे असल्याचे सांगितले. तसेच यादिवशी इतर सर्र्व व्यावसायिकांनीही बंद पाळून सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. मात्र, यात अत्यावश्यक सेवा वगळण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले गेले.तेव्हा कुठे होते लोकप्रतिनिधी ?काही दिवसांपुर्वी पाली येथील मराठा बांधवांनी आंदोलन केले होते. त्यावेळी काही कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले होते. मात्र, त्यावेळी मराठा समाजाचे जिल्ह्यात चार आमदार असूनही तसेच लोकप्रतिनिधींपैकी कुणीही एकही केस होऊ देणार नाही, असे म्हटले नाही, अशी खंत पालीचे तात्या सावंतदेसाई यांनी व्यक्त केली. यावेळी निलेश राणे यांनी या आंदोलनात एकही गुन्हा दाखल होणार नाही, याची जबाबदारी मी घेईन, असे आश्वासन निलेश राणे यांनी दिले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणRatnagiriरत्नागिरी