शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
4
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
5
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
6
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
7
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
8
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
9
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
10
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
11
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
12
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
13
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
14
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
15
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
16
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
17
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
18
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
19
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
20
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!

जनकल्याण समितीमुळे आंबा बागायतदारांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 13:52 IST

कोकण जनकल्याण प्रतिष्ठानच्या या उपक्रमाला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती कोकण जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ आंबेरकर यानी दिली आहे. या उपक्रमामुळे तालुक्यातील व लगतच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील छोट्या बागायतदारांना दिलासा मिळाला आहे.

राजापूर : लॉकडाऊनमुळे कोकणातील आंबा बागायतदार अडचणीत सापडले आहेत. याचा सर्वाधिक फटका छोट्या आंबा बागायतदारांना बसला आहे. त्यामुळे त्यांना दिलासा देण्यासाठी कोकण जनकल्याण प्रतिष्ठानने त्यांचाकडील आंबा विकत घेतला आहे.

यावर्षी अवकाळी पाऊस व वादळामुळे कोकणातील आंबा बागायतदार चांगलाच मेटाकुटीला आला होता. त्यात आधीच आंबा बागायतदारांचे खूप नुकसान झाले आहे. या अस्मानी संकटातून सुटका होतानाच संपूर्ण जगावर कोरोना विषाणूचे संकट उभे राहिले आहे. अवकाळी पाउस व वादळ यातून वाचलेला थोडाफार आंबा तयार होण्याच्या मार्गावर असतानाच कोरोनाचा वेगाने प्रादुर्भाव सुरु झाल्याने केंद्र सरकारने लॉकडाऊन घोषित केले. त्यामुळे एकतर बाजारपेठा बंद झाल्या आणि झाडावर तयार होणारा आंबा काढण्यासाठी कामगारही मिळत नाहीत, अशी स्थिती ओढवली आहे.

ही स्थिती लक्षात घेऊन शासनाने आंबा वाहतूकीसाठी परवाने द्यायला सुरुवात केली. मात्र छोट्या बागायतदारांकडील आंबा कोणी उचलायला पुढे येत नव्हते. त्यामुळे राजापूर तालुक्यातील छोटे आंबा बागायतदार अधिक चिंतेत होते. त्यांना दिलासा देण्यासाठी कोकण जनकल्याण प्रतिष्ठानने त्यांचा आंबा खरेदी करण्याची तयारी दर्शवत हा आंबा बाजारात ना नफा ना तोटा या तत्वावर विक्रीसाठी उपलब्ध केला आहे.

तालुक्यातील छोट्या आंबा बागायतदारांकडील आंबा खरेदी करून पुणे, मुंबई, कोल्हापूर आदी भागामध्ये दलालांची साखळी न वापरता विक्रीसाठी आणला आहे. कोकण जनकल्याण प्रतिष्ठानच्या या उपक्रमाला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती कोकण जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ आंबेरकर यानी दिली आहे. या उपक्रमामुळे तालुक्यातील व लगतच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील छोट्या बागायतदारांना दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :konkanकोकणRatnagiriरत्नागिरीbusinessव्यवसाय