शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

जनकल्याण समितीमुळे आंबा बागायतदारांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 13:52 IST

कोकण जनकल्याण प्रतिष्ठानच्या या उपक्रमाला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती कोकण जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ आंबेरकर यानी दिली आहे. या उपक्रमामुळे तालुक्यातील व लगतच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील छोट्या बागायतदारांना दिलासा मिळाला आहे.

राजापूर : लॉकडाऊनमुळे कोकणातील आंबा बागायतदार अडचणीत सापडले आहेत. याचा सर्वाधिक फटका छोट्या आंबा बागायतदारांना बसला आहे. त्यामुळे त्यांना दिलासा देण्यासाठी कोकण जनकल्याण प्रतिष्ठानने त्यांचाकडील आंबा विकत घेतला आहे.

यावर्षी अवकाळी पाऊस व वादळामुळे कोकणातील आंबा बागायतदार चांगलाच मेटाकुटीला आला होता. त्यात आधीच आंबा बागायतदारांचे खूप नुकसान झाले आहे. या अस्मानी संकटातून सुटका होतानाच संपूर्ण जगावर कोरोना विषाणूचे संकट उभे राहिले आहे. अवकाळी पाउस व वादळ यातून वाचलेला थोडाफार आंबा तयार होण्याच्या मार्गावर असतानाच कोरोनाचा वेगाने प्रादुर्भाव सुरु झाल्याने केंद्र सरकारने लॉकडाऊन घोषित केले. त्यामुळे एकतर बाजारपेठा बंद झाल्या आणि झाडावर तयार होणारा आंबा काढण्यासाठी कामगारही मिळत नाहीत, अशी स्थिती ओढवली आहे.

ही स्थिती लक्षात घेऊन शासनाने आंबा वाहतूकीसाठी परवाने द्यायला सुरुवात केली. मात्र छोट्या बागायतदारांकडील आंबा कोणी उचलायला पुढे येत नव्हते. त्यामुळे राजापूर तालुक्यातील छोटे आंबा बागायतदार अधिक चिंतेत होते. त्यांना दिलासा देण्यासाठी कोकण जनकल्याण प्रतिष्ठानने त्यांचा आंबा खरेदी करण्याची तयारी दर्शवत हा आंबा बाजारात ना नफा ना तोटा या तत्वावर विक्रीसाठी उपलब्ध केला आहे.

तालुक्यातील छोट्या आंबा बागायतदारांकडील आंबा खरेदी करून पुणे, मुंबई, कोल्हापूर आदी भागामध्ये दलालांची साखळी न वापरता विक्रीसाठी आणला आहे. कोकण जनकल्याण प्रतिष्ठानच्या या उपक्रमाला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती कोकण जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ आंबेरकर यानी दिली आहे. या उपक्रमामुळे तालुक्यातील व लगतच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील छोट्या बागायतदारांना दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :konkanकोकणRatnagiriरत्नागिरीbusinessव्यवसाय