शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

जनकल्याण समितीमुळे आंबा बागायतदारांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 13:52 IST

कोकण जनकल्याण प्रतिष्ठानच्या या उपक्रमाला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती कोकण जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ आंबेरकर यानी दिली आहे. या उपक्रमामुळे तालुक्यातील व लगतच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील छोट्या बागायतदारांना दिलासा मिळाला आहे.

राजापूर : लॉकडाऊनमुळे कोकणातील आंबा बागायतदार अडचणीत सापडले आहेत. याचा सर्वाधिक फटका छोट्या आंबा बागायतदारांना बसला आहे. त्यामुळे त्यांना दिलासा देण्यासाठी कोकण जनकल्याण प्रतिष्ठानने त्यांचाकडील आंबा विकत घेतला आहे.

यावर्षी अवकाळी पाऊस व वादळामुळे कोकणातील आंबा बागायतदार चांगलाच मेटाकुटीला आला होता. त्यात आधीच आंबा बागायतदारांचे खूप नुकसान झाले आहे. या अस्मानी संकटातून सुटका होतानाच संपूर्ण जगावर कोरोना विषाणूचे संकट उभे राहिले आहे. अवकाळी पाउस व वादळ यातून वाचलेला थोडाफार आंबा तयार होण्याच्या मार्गावर असतानाच कोरोनाचा वेगाने प्रादुर्भाव सुरु झाल्याने केंद्र सरकारने लॉकडाऊन घोषित केले. त्यामुळे एकतर बाजारपेठा बंद झाल्या आणि झाडावर तयार होणारा आंबा काढण्यासाठी कामगारही मिळत नाहीत, अशी स्थिती ओढवली आहे.

ही स्थिती लक्षात घेऊन शासनाने आंबा वाहतूकीसाठी परवाने द्यायला सुरुवात केली. मात्र छोट्या बागायतदारांकडील आंबा कोणी उचलायला पुढे येत नव्हते. त्यामुळे राजापूर तालुक्यातील छोटे आंबा बागायतदार अधिक चिंतेत होते. त्यांना दिलासा देण्यासाठी कोकण जनकल्याण प्रतिष्ठानने त्यांचा आंबा खरेदी करण्याची तयारी दर्शवत हा आंबा बाजारात ना नफा ना तोटा या तत्वावर विक्रीसाठी उपलब्ध केला आहे.

तालुक्यातील छोट्या आंबा बागायतदारांकडील आंबा खरेदी करून पुणे, मुंबई, कोल्हापूर आदी भागामध्ये दलालांची साखळी न वापरता विक्रीसाठी आणला आहे. कोकण जनकल्याण प्रतिष्ठानच्या या उपक्रमाला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती कोकण जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ आंबेरकर यानी दिली आहे. या उपक्रमामुळे तालुक्यातील व लगतच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील छोट्या बागायतदारांना दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :konkanकोकणRatnagiriरत्नागिरीbusinessव्यवसाय