शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
2
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
3
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
4
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
5
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
6
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
7
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
8
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
9
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
10
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
11
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
12
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
13
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
14
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
15
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
16
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
17
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
18
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
19
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
20
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
Daily Top 2Weekly Top 5

आंबा मुंबईत स्वस्त, रत्नागिरीत मात्र महाग; कारण काय.. वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 17:21 IST

गतवर्षीपेक्षा आंबा कमी, तरी दरही पडलेला

रत्नागिरी : उष्मा वाढल्यामुळे आंबा लवकर तयार होऊ लागला आहे. त्यामुळे साहजिकच बाजारातील आंब्याची आवक वाढली आहे. वाशी (नवी मुंबई) बाजारपेठेत मंगळवारी ८६ हजार आंबा पेट्या विक्रीसाठी दाखल झाल्या. मात्र आवक वाढल्यामुळे दरात घसरण झाली आहे. मुंबईत २०० ते ५०० रुपये डझन दराने विक्री सुरू आहे. त्या तुलनेत रत्नागिरीत मात्र आंबा महाग असून, ३५० ते १००० रुपये डझन दराने विक्री सुरू आहे.या वर्षी आंबा उत्पादन एकूणच कमी आहे. मार्चपासून आवक सुरू झाली. मात्र त्याचे प्रमाण कमी होते. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस पडल्यानंतर उष्मा कमालीचा वाढला आहे. त्यामुळे आंबा लवकर तयार होत आहे. काही ठिकाणी झाडावरच आंबा पिकू लागला आहे. तयार आंबा बागायतदार विक्रीसाठी पाठवत आहेत. मुंबईतील आवक वाढल्याने लगेचच त्याचा परिणाम दरावर झाला आहे. त्यामुळे मुंबईखेरीज पुणे, अहमदाबाद, राजकोट, सांगली, कोल्हापूर बाजारपेठेत विक्रीसाठी आंबा पाठविला जात आहे.

गतवर्षीपेक्षा आंबा कमी, तरी दरही पडलेलागतवर्षी याच हंगामात मुंबई बाजारपेठेत एक ते सव्वा लाख आंबा पेटी विक्री होती. यंदापेक्षा आंबा अधिक होता. त्यावेळीही पेटीचा दर एक हजार ते २५०० रुपये (प्रतिडझन २०० ते ५००) असाच होता. या वर्षी आंबा उत्पादन कमी असतानाही दर कमी आहेत. खत व्यवस्थापनापासून आंबा बाजारात पाठवेपर्यंत येणारा खर्चही वसूल होत नसल्यामुळे बागायतदारांमध्ये नाराजी आहे.

रत्नागिरीत आंबा महागरत्नागिरी बाजारपेठेत हापूस, पायरी, रायवळ आंबा विक्रीला आहे. हापूस ३५० रुपयांपासून एक हजार रुपये डझन दराने विकण्यात येत आहे. पायरी आंबा ५०० ते १००० रुपये डझन, तर रायवळ २५० ते ३०० रुपये डझन दराने विकण्यात येत आहेत. गतवर्षीच्या तुलनेत ५० ते १०० रुपयांनी दर जास्त असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

अन्य राज्यातील आंबावाशी (नवी मुंबई) बाजारपेठेत कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा येथील हापूस, बदामी, लालबाग, बैगनपल्ली आंबा विक्रीला उपलब्ध आहे. ५० ते ९० रुपये किलो तो विकला जातो. मंगळवारी वाशी बाजारात ३६ हजार हापूस पेट्या विक्रीला होत्या. अन्य राज्यांतील आंबा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत आहे.

रत्नागिरीतील दरामुळे सर्वसामान्यांसाठी तरी सध्या आंबा महागच आहे. दर आवाक्यात येण्यासाठी अद्याप किमान एक-दोन आठवड्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. - संकेत कदम

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMangoआंबाMarketबाजारMumbaiमुंबई