शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

आंबा मुंबईत स्वस्त, रत्नागिरीत मात्र महाग; कारण काय.. वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 17:21 IST

गतवर्षीपेक्षा आंबा कमी, तरी दरही पडलेला

रत्नागिरी : उष्मा वाढल्यामुळे आंबा लवकर तयार होऊ लागला आहे. त्यामुळे साहजिकच बाजारातील आंब्याची आवक वाढली आहे. वाशी (नवी मुंबई) बाजारपेठेत मंगळवारी ८६ हजार आंबा पेट्या विक्रीसाठी दाखल झाल्या. मात्र आवक वाढल्यामुळे दरात घसरण झाली आहे. मुंबईत २०० ते ५०० रुपये डझन दराने विक्री सुरू आहे. त्या तुलनेत रत्नागिरीत मात्र आंबा महाग असून, ३५० ते १००० रुपये डझन दराने विक्री सुरू आहे.या वर्षी आंबा उत्पादन एकूणच कमी आहे. मार्चपासून आवक सुरू झाली. मात्र त्याचे प्रमाण कमी होते. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस पडल्यानंतर उष्मा कमालीचा वाढला आहे. त्यामुळे आंबा लवकर तयार होत आहे. काही ठिकाणी झाडावरच आंबा पिकू लागला आहे. तयार आंबा बागायतदार विक्रीसाठी पाठवत आहेत. मुंबईतील आवक वाढल्याने लगेचच त्याचा परिणाम दरावर झाला आहे. त्यामुळे मुंबईखेरीज पुणे, अहमदाबाद, राजकोट, सांगली, कोल्हापूर बाजारपेठेत विक्रीसाठी आंबा पाठविला जात आहे.

गतवर्षीपेक्षा आंबा कमी, तरी दरही पडलेलागतवर्षी याच हंगामात मुंबई बाजारपेठेत एक ते सव्वा लाख आंबा पेटी विक्री होती. यंदापेक्षा आंबा अधिक होता. त्यावेळीही पेटीचा दर एक हजार ते २५०० रुपये (प्रतिडझन २०० ते ५००) असाच होता. या वर्षी आंबा उत्पादन कमी असतानाही दर कमी आहेत. खत व्यवस्थापनापासून आंबा बाजारात पाठवेपर्यंत येणारा खर्चही वसूल होत नसल्यामुळे बागायतदारांमध्ये नाराजी आहे.

रत्नागिरीत आंबा महागरत्नागिरी बाजारपेठेत हापूस, पायरी, रायवळ आंबा विक्रीला आहे. हापूस ३५० रुपयांपासून एक हजार रुपये डझन दराने विकण्यात येत आहे. पायरी आंबा ५०० ते १००० रुपये डझन, तर रायवळ २५० ते ३०० रुपये डझन दराने विकण्यात येत आहेत. गतवर्षीच्या तुलनेत ५० ते १०० रुपयांनी दर जास्त असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

अन्य राज्यातील आंबावाशी (नवी मुंबई) बाजारपेठेत कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा येथील हापूस, बदामी, लालबाग, बैगनपल्ली आंबा विक्रीला उपलब्ध आहे. ५० ते ९० रुपये किलो तो विकला जातो. मंगळवारी वाशी बाजारात ३६ हजार हापूस पेट्या विक्रीला होत्या. अन्य राज्यांतील आंबा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत आहे.

रत्नागिरीतील दरामुळे सर्वसामान्यांसाठी तरी सध्या आंबा महागच आहे. दर आवाक्यात येण्यासाठी अद्याप किमान एक-दोन आठवड्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. - संकेत कदम

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMangoआंबाMarketबाजारMumbaiमुंबई