शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

आंबा महोत्सवात हापूसला पसंती, जालनात महोत्सव सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 11:12 IST

रत्नागिरी तसेच जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी जालना येथे दिनांक १ ते ३ जून या कालावधीत आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाच्या पहिल्या दोन दिवसातच हापूसच्या दीड हजार पेट्यांची लक्षणीय विक्री झाली.

ठळक मुद्देआंबा महोत्सवात हापूसला पसंती, जालनात महोत्सव सुरूदोन दिवसांत तब्बल दीड हजार पेट्यांची विक्री

रत्नागिरी : रत्नागिरी तसेच जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी जालना येथे दिनांक १ ते ३ जून या कालावधीत आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाच्या पहिल्या दोन दिवसातच हापूसच्या दीड हजार पेट्यांची लक्षणीय विक्री झाली.

सोमवारपर्यंत असलेल्या या प्रदर्शनात जिल्ह्यातील आणखी काही शेतकरी सहभागी होणार असल्याची माहिती रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर दळवी यांनी दिली.रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील अनेक शेतकरी या महोत्सवात सहभागी झाले आहेत. याआधीही मुंबई, औरंगाबाद याठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या आंबा महोत्सवात जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सहभाग होता. औरंगाबाद येथील पाच दिवसांच्या महोत्सवात रत्नागिरीतून आणलेल्या दोन हजार पेट्यांची विक्री झाली.त्यानंतर जालना येथे जालना कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे रत्नागिरी आणि जालना या दोन्ही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी तीन दिवसांचा आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यातून आंबा उत्पादक शेतकरी हे थेट ग्राहकांपर्यंत नैसर्गिकरित्या पिकवलेला अस्सल हापूस, केसर, लालबाग, बदाम, दसेरी, पायरी आंबा घेऊन जात आहेत. याला ग्राहकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

या आंबा महोत्सवात मधुकर दळवी यांच्यासह लांजाचे संजय खानविलकर, रत्नागिरीचे नीलेश चव्हाण, उदय पेठे, मुजीब काळसेकर, शाहीन खान, विजय मोहिते, विपुल वेदरे, शरद गोणबरे, पंकज वेदरे, आदी आंबा उत्पादक शेतकरी सहभागी झाले आहेत.शनिवारी पहिल्याच दिवशी पाचशे पेट्यांतील आंबा विकला गेला तर रविवारी आणखी हजार पेट्यांची विक्री झाली. रत्नागिरी जिल्ह्यातील काही शेतकरी या प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी रवाना झाले आहेत. त्यामुळे आंब्याची अधिक उपलब्धता होणार असेल तर रमजान ईदपर्यंत याठिकाणी आंबा विक्रीसाठी ठेवला जाणार आहे, अशी माहिती मधुकर दळवी यांनी दिली.

टॅग्स :MangoआंबाRatnagiriरत्नागिरीJalanaजालना