शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

आंबा महोत्सवात हापूसला पसंती, जालनात महोत्सव सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 11:12 IST

रत्नागिरी तसेच जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी जालना येथे दिनांक १ ते ३ जून या कालावधीत आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाच्या पहिल्या दोन दिवसातच हापूसच्या दीड हजार पेट्यांची लक्षणीय विक्री झाली.

ठळक मुद्देआंबा महोत्सवात हापूसला पसंती, जालनात महोत्सव सुरूदोन दिवसांत तब्बल दीड हजार पेट्यांची विक्री

रत्नागिरी : रत्नागिरी तसेच जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी जालना येथे दिनांक १ ते ३ जून या कालावधीत आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाच्या पहिल्या दोन दिवसातच हापूसच्या दीड हजार पेट्यांची लक्षणीय विक्री झाली.

सोमवारपर्यंत असलेल्या या प्रदर्शनात जिल्ह्यातील आणखी काही शेतकरी सहभागी होणार असल्याची माहिती रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर दळवी यांनी दिली.रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील अनेक शेतकरी या महोत्सवात सहभागी झाले आहेत. याआधीही मुंबई, औरंगाबाद याठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या आंबा महोत्सवात जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सहभाग होता. औरंगाबाद येथील पाच दिवसांच्या महोत्सवात रत्नागिरीतून आणलेल्या दोन हजार पेट्यांची विक्री झाली.त्यानंतर जालना येथे जालना कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे रत्नागिरी आणि जालना या दोन्ही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी तीन दिवसांचा आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यातून आंबा उत्पादक शेतकरी हे थेट ग्राहकांपर्यंत नैसर्गिकरित्या पिकवलेला अस्सल हापूस, केसर, लालबाग, बदाम, दसेरी, पायरी आंबा घेऊन जात आहेत. याला ग्राहकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

या आंबा महोत्सवात मधुकर दळवी यांच्यासह लांजाचे संजय खानविलकर, रत्नागिरीचे नीलेश चव्हाण, उदय पेठे, मुजीब काळसेकर, शाहीन खान, विजय मोहिते, विपुल वेदरे, शरद गोणबरे, पंकज वेदरे, आदी आंबा उत्पादक शेतकरी सहभागी झाले आहेत.शनिवारी पहिल्याच दिवशी पाचशे पेट्यांतील आंबा विकला गेला तर रविवारी आणखी हजार पेट्यांची विक्री झाली. रत्नागिरी जिल्ह्यातील काही शेतकरी या प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी रवाना झाले आहेत. त्यामुळे आंब्याची अधिक उपलब्धता होणार असेल तर रमजान ईदपर्यंत याठिकाणी आंबा विक्रीसाठी ठेवला जाणार आहे, अशी माहिती मधुकर दळवी यांनी दिली.

टॅग्स :MangoआंबाRatnagiriरत्नागिरीJalanaजालना