शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

आंबा महोत्सवात हापूसला पसंती, जालनात महोत्सव सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 11:12 IST

रत्नागिरी तसेच जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी जालना येथे दिनांक १ ते ३ जून या कालावधीत आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाच्या पहिल्या दोन दिवसातच हापूसच्या दीड हजार पेट्यांची लक्षणीय विक्री झाली.

ठळक मुद्देआंबा महोत्सवात हापूसला पसंती, जालनात महोत्सव सुरूदोन दिवसांत तब्बल दीड हजार पेट्यांची विक्री

रत्नागिरी : रत्नागिरी तसेच जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी जालना येथे दिनांक १ ते ३ जून या कालावधीत आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाच्या पहिल्या दोन दिवसातच हापूसच्या दीड हजार पेट्यांची लक्षणीय विक्री झाली.

सोमवारपर्यंत असलेल्या या प्रदर्शनात जिल्ह्यातील आणखी काही शेतकरी सहभागी होणार असल्याची माहिती रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर दळवी यांनी दिली.रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील अनेक शेतकरी या महोत्सवात सहभागी झाले आहेत. याआधीही मुंबई, औरंगाबाद याठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या आंबा महोत्सवात जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सहभाग होता. औरंगाबाद येथील पाच दिवसांच्या महोत्सवात रत्नागिरीतून आणलेल्या दोन हजार पेट्यांची विक्री झाली.त्यानंतर जालना येथे जालना कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे रत्नागिरी आणि जालना या दोन्ही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी तीन दिवसांचा आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यातून आंबा उत्पादक शेतकरी हे थेट ग्राहकांपर्यंत नैसर्गिकरित्या पिकवलेला अस्सल हापूस, केसर, लालबाग, बदाम, दसेरी, पायरी आंबा घेऊन जात आहेत. याला ग्राहकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

या आंबा महोत्सवात मधुकर दळवी यांच्यासह लांजाचे संजय खानविलकर, रत्नागिरीचे नीलेश चव्हाण, उदय पेठे, मुजीब काळसेकर, शाहीन खान, विजय मोहिते, विपुल वेदरे, शरद गोणबरे, पंकज वेदरे, आदी आंबा उत्पादक शेतकरी सहभागी झाले आहेत.शनिवारी पहिल्याच दिवशी पाचशे पेट्यांतील आंबा विकला गेला तर रविवारी आणखी हजार पेट्यांची विक्री झाली. रत्नागिरी जिल्ह्यातील काही शेतकरी या प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी रवाना झाले आहेत. त्यामुळे आंब्याची अधिक उपलब्धता होणार असेल तर रमजान ईदपर्यंत याठिकाणी आंबा विक्रीसाठी ठेवला जाणार आहे, अशी माहिती मधुकर दळवी यांनी दिली.

टॅग्स :MangoआंबाRatnagiriरत्नागिरीJalanaजालना