शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

रत्नागिरी : थराजापुरातील महावितरणचे कार्यालय रातोरात हलविले, ग्राहकांना रिक्षाला मोजावे लागणार पन्नास रूपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 15:13 IST

तब्बल दोन आमदार राजापूरकरांच्या हितासाठी मोठी धडपड करीत असल्याचे चित्र निर्माण केले गेले असतानाच हिवाळी अधिवेशन कालावधीतच शहरातील महावितरणचे कार्यालय गुरूवारी रातोरात हलविण्यात आले.

ठळक मुद्देकार्यालय ग्रामपंचायत हद्दीत नेल्याने तांत्रिक कर्मचाऱ्यांना कोठे शोधणार ग्राहकांना पन्नास रूपये रिक्षाला मोजावे लागणार महावितरणने ग्राहकांना जणू झिडकारले कार्यालय तातडीने राजापूर शहरात आणण्यात यावे, अशी मागणी

राजापूर : तब्बल दोन आमदार राजापूरकरांच्या हितासाठी मोठी धडपड करीत असल्याचे चित्र निर्माण केले गेले असतानाच हिवाळी अधिवेशन कालावधीतच शहरातील महावितरणचे कार्यालय गुरूवारी रातोरात हलविण्यात आले.

विशेष म्हणजे विधानपरिषद सदस्या हुस्नबानू खलिफे यांच्या इमारतीत शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हे कार्यालय होते. मात्र, आता राजापूर शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर कोदवली ग्रामपंचायत हद्दीत हे कार्यालय नेण्यात आले आहे.ज्याठिकाणी जाण्यासाठी आता ग्राहकांना पन्नास रूपये रिक्षाला मोजावे लागणार आहेत. तसेच झेरॉक्स, चहा वा परतीच्या प्रवासाची सुविधादेखील उपलब्ध नाही, अशा ठिकाणी कोदवली येथील पॉवर हाऊसच्या स्टोअर रूममध्ये हे कार्यालय महावितरणने स्थलांतरित केले आहे.

याआधी दोन वर्षांपूर्वी शहर कार्यालयही असेच हलविण्यात आले असून, आता भाग एक व भाग दोन कार्यालये हलवून महावितरणने ग्राहकांना जणू झिडकारले आहे. महावितरणचे राजापूर शहर कार्यालय तातडीने शहरात आणण्यात यावे, अशी ग्राहकांची मागणी आहे.

शहरासह तालुक्यातील वीज समस्यांबाबत माजी आमदार गणपत कदम, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष तसेच विविध पदाधिकाऱ्यांनी १३ आॅक्टोबर रोजी महावितरण कार्यालयावर धडक देत जाबही विचारला होता.

विशेष म्हणजे राजापूरमधील कोणत्याही आमदाराने या महत्त्वाच्या विषयाकडे त्यावेळी लक्ष दिले नव्हते. महावितरण कडून ग्राहकांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात असून, जीर्ण वीजवाहिन्या, कमी-अधिक दाबाचा व वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा याबाबत उपस्थित लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते.

याचवेळी महावितरणच्या मनमानी कारभारामुळे राजापूरकरांना कोणी वाली आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अखेर प्रगत राजापूर संघटनेने उठाव केल्यावर माजी आमदार गणपत कदम यांनी महावितरण कार्यालयावर धडक दिली होती.महावितरणचे अधिकारी कार्यालयात उपस्थित नसल्याची कायम ओरड होत असतानाच आता शहरापासून अडीच किलोमीटर अंतरावर हे कार्यालय नेण्यात आल्याने या अधिकाऱ्यांचे फावणार आहे. यापूर्वीच शहर कार्यालय पॉवर हाऊस येथे हलविण्यात आल्याने तांत्रिक कर्मचारी शहरातील भाग एक कार्यालयात बसत असत.

मात्र, आता हे कार्यालयदेखील ग्रामपंचायत हद्दीत नेण्यात आल्याने तांत्रिक कर्मचाऱ्यांना कोठे शोधावे, असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. महावितरणने शहर कार्यालय तातडीने राजापूर शहरात न आणल्यास वीज बिले न भरण्याबरोबरच नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

 

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणRatnagiriरत्नागिरी