शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : थराजापुरातील महावितरणचे कार्यालय रातोरात हलविले, ग्राहकांना रिक्षाला मोजावे लागणार पन्नास रूपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 15:13 IST

तब्बल दोन आमदार राजापूरकरांच्या हितासाठी मोठी धडपड करीत असल्याचे चित्र निर्माण केले गेले असतानाच हिवाळी अधिवेशन कालावधीतच शहरातील महावितरणचे कार्यालय गुरूवारी रातोरात हलविण्यात आले.

ठळक मुद्देकार्यालय ग्रामपंचायत हद्दीत नेल्याने तांत्रिक कर्मचाऱ्यांना कोठे शोधणार ग्राहकांना पन्नास रूपये रिक्षाला मोजावे लागणार महावितरणने ग्राहकांना जणू झिडकारले कार्यालय तातडीने राजापूर शहरात आणण्यात यावे, अशी मागणी

राजापूर : तब्बल दोन आमदार राजापूरकरांच्या हितासाठी मोठी धडपड करीत असल्याचे चित्र निर्माण केले गेले असतानाच हिवाळी अधिवेशन कालावधीतच शहरातील महावितरणचे कार्यालय गुरूवारी रातोरात हलविण्यात आले.

विशेष म्हणजे विधानपरिषद सदस्या हुस्नबानू खलिफे यांच्या इमारतीत शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हे कार्यालय होते. मात्र, आता राजापूर शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर कोदवली ग्रामपंचायत हद्दीत हे कार्यालय नेण्यात आले आहे.ज्याठिकाणी जाण्यासाठी आता ग्राहकांना पन्नास रूपये रिक्षाला मोजावे लागणार आहेत. तसेच झेरॉक्स, चहा वा परतीच्या प्रवासाची सुविधादेखील उपलब्ध नाही, अशा ठिकाणी कोदवली येथील पॉवर हाऊसच्या स्टोअर रूममध्ये हे कार्यालय महावितरणने स्थलांतरित केले आहे.

याआधी दोन वर्षांपूर्वी शहर कार्यालयही असेच हलविण्यात आले असून, आता भाग एक व भाग दोन कार्यालये हलवून महावितरणने ग्राहकांना जणू झिडकारले आहे. महावितरणचे राजापूर शहर कार्यालय तातडीने शहरात आणण्यात यावे, अशी ग्राहकांची मागणी आहे.

शहरासह तालुक्यातील वीज समस्यांबाबत माजी आमदार गणपत कदम, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष तसेच विविध पदाधिकाऱ्यांनी १३ आॅक्टोबर रोजी महावितरण कार्यालयावर धडक देत जाबही विचारला होता.

विशेष म्हणजे राजापूरमधील कोणत्याही आमदाराने या महत्त्वाच्या विषयाकडे त्यावेळी लक्ष दिले नव्हते. महावितरण कडून ग्राहकांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात असून, जीर्ण वीजवाहिन्या, कमी-अधिक दाबाचा व वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा याबाबत उपस्थित लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते.

याचवेळी महावितरणच्या मनमानी कारभारामुळे राजापूरकरांना कोणी वाली आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अखेर प्रगत राजापूर संघटनेने उठाव केल्यावर माजी आमदार गणपत कदम यांनी महावितरण कार्यालयावर धडक दिली होती.महावितरणचे अधिकारी कार्यालयात उपस्थित नसल्याची कायम ओरड होत असतानाच आता शहरापासून अडीच किलोमीटर अंतरावर हे कार्यालय नेण्यात आल्याने या अधिकाऱ्यांचे फावणार आहे. यापूर्वीच शहर कार्यालय पॉवर हाऊस येथे हलविण्यात आल्याने तांत्रिक कर्मचारी शहरातील भाग एक कार्यालयात बसत असत.

मात्र, आता हे कार्यालयदेखील ग्रामपंचायत हद्दीत नेण्यात आल्याने तांत्रिक कर्मचाऱ्यांना कोठे शोधावे, असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. महावितरणने शहर कार्यालय तातडीने राजापूर शहरात न आणल्यास वीज बिले न भरण्याबरोबरच नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

 

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणRatnagiriरत्नागिरी