शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
2
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
3
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
4
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
5
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
6
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
7
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
8
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
9
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
10
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
11
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
12
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
13
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
14
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
15
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
16
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
17
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
18
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
20
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन

महावितरणचे ‘शट डाऊन’ रत्नागिरीकर झाले घामाघूम, तब्बल ९ तासांनी वीजपुरवठा सुरळीत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 17:51 IST

रत्नागिरी : दिवसेंदिवस उष्णतेचा पारा वाढत आहे. साेमवारी ३२ अंश सेल्सिअस इतके तापमान हाेते तर आर्द्रता ६८ टक्क्यापर्यंत हाेती. ...

रत्नागिरी : दिवसेंदिवस उष्णतेचा पारा वाढत आहे. साेमवारी ३२ अंश सेल्सिअस इतके तापमान हाेते तर आर्द्रता ६८ टक्क्यापर्यंत हाेती. त्यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. उकाड्याचा हा दाह साेसवत नसतानाच सोमवारी महावितरणने देखभाल दुरुस्तीसाठी शहरी व ग्रामीण भागातील वीजपुरवठा बंद ठेवल्याने उकाड्याचा दाह अधिक जाणवला. शहरी भागात ५ तासाने तर ग्रामीण भागातील तब्बल ९ तासांनी वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.महावितरणने मान्सूनपूर्व तयारी सुरू केली आहे. त्यामध्ये वीजवाहिन्यांना स्पर्श करणाऱ्या झाडाच्या फांद्या, माडाच्या झावळा तोडण्यात येत आहेत. तसेच दोन खांबावरील विजेच्या वाहिन्या घट्ट केल्या जात आहेत, तारेला गार्डनिंग, डीपी दुरुस्तीसह ऑइल बदलण्यात येत आहे. ही सर्व कामे सोमवारीच केली जात असल्याने वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला होता.उन्हाळ्यामुळे पंखे, वातानुकूलित यंत्रणा यांचा वापर वाढला आहे. त्यामुळे विजेची मागणीही वाढली आहे. त्यातच शीतपेयांचाही वापर वाढल्याने नागरिकांसाठी वीज आवश्यक आहे. गेल्या काही दिवसांत सकाळच्या वेळेत अधूनमधून वीज गायब हाेण्याचे प्रकार घडत आहेत. त्यातच साेमवारी देखभाल दुरुस्तीसाठी सकाळी ९ वाजण्याच्या दरम्यान वीज पुरवठा बंद करण्यात आला. त्यानंतर काही भागात दुपारी तर काही भागात सायंकाळी वीज पुरवठा सुरू करण्यात आला. मात्र, ५ ते ९ तास वीज पुरवठा खंडित राहिल्याने नागरिकांना घरात राहणे असह्य झाले हाेते.दुपारपर्यंत वीजपुरवठा नसल्यामुळे काही कार्यालयातून जनरेटर सुरू करण्यात आले होते. मात्र, ही सुविधा नसलेल्या कार्यालयात कर्मचाऱ्यांचे हाल झाले. विजेअभावी संगणक बंद होते. काही ठिकाणी सर्व्हरही बंद असल्यामुळे शासकीय तसेच बँका व खासगी कार्यालयातील कामकाज ठप्प झाले होते.

पावसाळ्याची तयारी, नागरिकांना फटकाशहरातील विविध प्रभागांत, तसेच ग्रामीण भागात महावितरणचे कर्मचारी काम करत होते. पावसाळ्याची तयारी सुरू असली तरी याचा वीज पुरवठा खंडित ठेवल्याने नागरिकांना त्याचा फटका बसला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीelectricityवीजmahavitaranमहावितरण