शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
6
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
7
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
8
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
9
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
10
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
11
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
12
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
13
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
14
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
15
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
16
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
17
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
18
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
19
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
20
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे

महावितरणचे ‘शट डाऊन’ रत्नागिरीकर झाले घामाघूम, तब्बल ९ तासांनी वीजपुरवठा सुरळीत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 17:51 IST

रत्नागिरी : दिवसेंदिवस उष्णतेचा पारा वाढत आहे. साेमवारी ३२ अंश सेल्सिअस इतके तापमान हाेते तर आर्द्रता ६८ टक्क्यापर्यंत हाेती. ...

रत्नागिरी : दिवसेंदिवस उष्णतेचा पारा वाढत आहे. साेमवारी ३२ अंश सेल्सिअस इतके तापमान हाेते तर आर्द्रता ६८ टक्क्यापर्यंत हाेती. त्यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. उकाड्याचा हा दाह साेसवत नसतानाच सोमवारी महावितरणने देखभाल दुरुस्तीसाठी शहरी व ग्रामीण भागातील वीजपुरवठा बंद ठेवल्याने उकाड्याचा दाह अधिक जाणवला. शहरी भागात ५ तासाने तर ग्रामीण भागातील तब्बल ९ तासांनी वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.महावितरणने मान्सूनपूर्व तयारी सुरू केली आहे. त्यामध्ये वीजवाहिन्यांना स्पर्श करणाऱ्या झाडाच्या फांद्या, माडाच्या झावळा तोडण्यात येत आहेत. तसेच दोन खांबावरील विजेच्या वाहिन्या घट्ट केल्या जात आहेत, तारेला गार्डनिंग, डीपी दुरुस्तीसह ऑइल बदलण्यात येत आहे. ही सर्व कामे सोमवारीच केली जात असल्याने वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला होता.उन्हाळ्यामुळे पंखे, वातानुकूलित यंत्रणा यांचा वापर वाढला आहे. त्यामुळे विजेची मागणीही वाढली आहे. त्यातच शीतपेयांचाही वापर वाढल्याने नागरिकांसाठी वीज आवश्यक आहे. गेल्या काही दिवसांत सकाळच्या वेळेत अधूनमधून वीज गायब हाेण्याचे प्रकार घडत आहेत. त्यातच साेमवारी देखभाल दुरुस्तीसाठी सकाळी ९ वाजण्याच्या दरम्यान वीज पुरवठा बंद करण्यात आला. त्यानंतर काही भागात दुपारी तर काही भागात सायंकाळी वीज पुरवठा सुरू करण्यात आला. मात्र, ५ ते ९ तास वीज पुरवठा खंडित राहिल्याने नागरिकांना घरात राहणे असह्य झाले हाेते.दुपारपर्यंत वीजपुरवठा नसल्यामुळे काही कार्यालयातून जनरेटर सुरू करण्यात आले होते. मात्र, ही सुविधा नसलेल्या कार्यालयात कर्मचाऱ्यांचे हाल झाले. विजेअभावी संगणक बंद होते. काही ठिकाणी सर्व्हरही बंद असल्यामुळे शासकीय तसेच बँका व खासगी कार्यालयातील कामकाज ठप्प झाले होते.

पावसाळ्याची तयारी, नागरिकांना फटकाशहरातील विविध प्रभागांत, तसेच ग्रामीण भागात महावितरणचे कर्मचारी काम करत होते. पावसाळ्याची तयारी सुरू असली तरी याचा वीज पुरवठा खंडित ठेवल्याने नागरिकांना त्याचा फटका बसला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीelectricityवीजmahavitaranमहावितरण