शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणचे ‘शट डाऊन’ रत्नागिरीकर झाले घामाघूम, तब्बल ९ तासांनी वीजपुरवठा सुरळीत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 17:51 IST

रत्नागिरी : दिवसेंदिवस उष्णतेचा पारा वाढत आहे. साेमवारी ३२ अंश सेल्सिअस इतके तापमान हाेते तर आर्द्रता ६८ टक्क्यापर्यंत हाेती. ...

रत्नागिरी : दिवसेंदिवस उष्णतेचा पारा वाढत आहे. साेमवारी ३२ अंश सेल्सिअस इतके तापमान हाेते तर आर्द्रता ६८ टक्क्यापर्यंत हाेती. त्यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. उकाड्याचा हा दाह साेसवत नसतानाच सोमवारी महावितरणने देखभाल दुरुस्तीसाठी शहरी व ग्रामीण भागातील वीजपुरवठा बंद ठेवल्याने उकाड्याचा दाह अधिक जाणवला. शहरी भागात ५ तासाने तर ग्रामीण भागातील तब्बल ९ तासांनी वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.महावितरणने मान्सूनपूर्व तयारी सुरू केली आहे. त्यामध्ये वीजवाहिन्यांना स्पर्श करणाऱ्या झाडाच्या फांद्या, माडाच्या झावळा तोडण्यात येत आहेत. तसेच दोन खांबावरील विजेच्या वाहिन्या घट्ट केल्या जात आहेत, तारेला गार्डनिंग, डीपी दुरुस्तीसह ऑइल बदलण्यात येत आहे. ही सर्व कामे सोमवारीच केली जात असल्याने वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला होता.उन्हाळ्यामुळे पंखे, वातानुकूलित यंत्रणा यांचा वापर वाढला आहे. त्यामुळे विजेची मागणीही वाढली आहे. त्यातच शीतपेयांचाही वापर वाढल्याने नागरिकांसाठी वीज आवश्यक आहे. गेल्या काही दिवसांत सकाळच्या वेळेत अधूनमधून वीज गायब हाेण्याचे प्रकार घडत आहेत. त्यातच साेमवारी देखभाल दुरुस्तीसाठी सकाळी ९ वाजण्याच्या दरम्यान वीज पुरवठा बंद करण्यात आला. त्यानंतर काही भागात दुपारी तर काही भागात सायंकाळी वीज पुरवठा सुरू करण्यात आला. मात्र, ५ ते ९ तास वीज पुरवठा खंडित राहिल्याने नागरिकांना घरात राहणे असह्य झाले हाेते.दुपारपर्यंत वीजपुरवठा नसल्यामुळे काही कार्यालयातून जनरेटर सुरू करण्यात आले होते. मात्र, ही सुविधा नसलेल्या कार्यालयात कर्मचाऱ्यांचे हाल झाले. विजेअभावी संगणक बंद होते. काही ठिकाणी सर्व्हरही बंद असल्यामुळे शासकीय तसेच बँका व खासगी कार्यालयातील कामकाज ठप्प झाले होते.

पावसाळ्याची तयारी, नागरिकांना फटकाशहरातील विविध प्रभागांत, तसेच ग्रामीण भागात महावितरणचे कर्मचारी काम करत होते. पावसाळ्याची तयारी सुरू असली तरी याचा वीज पुरवठा खंडित ठेवल्याने नागरिकांना त्याचा फटका बसला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीelectricityवीजmahavitaranमहावितरण