शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019 : वातावरण सांभाळण्याची जबाबदारी शिवसेनेचीच : दीपक पटवर्धन यांचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 14:55 IST

भाजपचे नेतृत्वावर टिका झाल्यास त्याचे गंभीर परिणाम प्रचारावर होतील, असा इशारा भाजपचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड़ दीपक पटवर्धन यांनी दिला आहे.

ठळक मुद्देवातावरण सांभाळण्याची जबाबदारी शिवसेनेचीच  : दीपक पटवर्धन भाजप नेत्यांवरील आरोप थांबवा, टिका झाल्यास गंभीर परिणाम

रत्नागिरी : शिवसेनेच्या नेत्यांनी बोलतांना आपण युतीने निवडणूक लढवतोय याचे भान ठेवून भाजप नेते उमेदवार यांचेवर टिका करण्याचे टाळणे आवश्यक आहे. भाजपचे कार्यकर्ते दुखावणार नाही, त्यांच्या भावनांचा अवमान होणार नाही याची दक्षता सेनेने घ्यावी. कोणतीही वाईट टिका भाजपच्या कोणत्याही नेत्यावर यापुढे खपवून घेतली जाणार नाही.

भाजपचे नेतृत्वावर टिका झाल्यास त्याचे गंभीर परिणाम प्रचारावर होतील, असा इशारा भाजपचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड़ दीपक पटवर्धन यांनी दिला आहे.शिवसेना नेत्यांकडून वारंवार होणाऱ्या टीकेला भाजप जिल्हाध्यक्ष पटवर्धन यांनी प्रत्युतर दिले आहे. त्यांनी सांगितले की, भाजपचे कार्यकर्ते निष्ठावान आहेत, प्रामाणिक आहेत. शिवसेनेने भाजप कार्यकर्ते, त्यांचे नेतृत्व याचा मान राखलाच पाहिजे. परजिल्ह्यातील वाद रत्नागिरीमध्ये आणून येथील वातावरण बिघडणार नाही याची दक्षता शिवसेनेने घ्यावी.युती असल्याने रत्नागिरीमध्ये एकही जागा न मिळताही भाजप कार्यकर्ते मोठ्या मनाने युतीच्या प्रचारात सक्रिय आहेत. मात्र, त्यांच्या भावनांचा अवमान होणार असेल तर विचार करावा लागेल, असेही त्यांनी म्हटले आहे.

भाजपचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी हे राजापूर सभेतील वक्तव्याने व्यथित असून, याची दखल शिवसेनेने घ्यावी, असा इशाराही त्यांनी दिला आहे. नारायण राणे हे भाजपचे नेते आहेत. भाजपच्या नेत्यांवर या जिल्ह्यात टीका करून चांगले वातावरण बिघडवण्यापासून शिवसेनेने स्वत:ला आवरावे. या जिल्ह्यात नसलेला विषय या प्रचार सभांमध्ये आणू नये, असे पटवर्धन यांनी परखडपणे शिवसेना नेतृत्वाला सांगितले आहे.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाBJPभाजपाRatnagiriरत्नागिरी