शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
3
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
4
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
5
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
6
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
7
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
8
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
9
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
10
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
11
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
12
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
13
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
14
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
15
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
16
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
17
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
18
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
19
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
20
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला

Maharashtra Assembly Election 2019 : वातावरण सांभाळण्याची जबाबदारी शिवसेनेचीच : दीपक पटवर्धन यांचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 14:55 IST

भाजपचे नेतृत्वावर टिका झाल्यास त्याचे गंभीर परिणाम प्रचारावर होतील, असा इशारा भाजपचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड़ दीपक पटवर्धन यांनी दिला आहे.

ठळक मुद्देवातावरण सांभाळण्याची जबाबदारी शिवसेनेचीच  : दीपक पटवर्धन भाजप नेत्यांवरील आरोप थांबवा, टिका झाल्यास गंभीर परिणाम

रत्नागिरी : शिवसेनेच्या नेत्यांनी बोलतांना आपण युतीने निवडणूक लढवतोय याचे भान ठेवून भाजप नेते उमेदवार यांचेवर टिका करण्याचे टाळणे आवश्यक आहे. भाजपचे कार्यकर्ते दुखावणार नाही, त्यांच्या भावनांचा अवमान होणार नाही याची दक्षता सेनेने घ्यावी. कोणतीही वाईट टिका भाजपच्या कोणत्याही नेत्यावर यापुढे खपवून घेतली जाणार नाही.

भाजपचे नेतृत्वावर टिका झाल्यास त्याचे गंभीर परिणाम प्रचारावर होतील, असा इशारा भाजपचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड़ दीपक पटवर्धन यांनी दिला आहे.शिवसेना नेत्यांकडून वारंवार होणाऱ्या टीकेला भाजप जिल्हाध्यक्ष पटवर्धन यांनी प्रत्युतर दिले आहे. त्यांनी सांगितले की, भाजपचे कार्यकर्ते निष्ठावान आहेत, प्रामाणिक आहेत. शिवसेनेने भाजप कार्यकर्ते, त्यांचे नेतृत्व याचा मान राखलाच पाहिजे. परजिल्ह्यातील वाद रत्नागिरीमध्ये आणून येथील वातावरण बिघडणार नाही याची दक्षता शिवसेनेने घ्यावी.युती असल्याने रत्नागिरीमध्ये एकही जागा न मिळताही भाजप कार्यकर्ते मोठ्या मनाने युतीच्या प्रचारात सक्रिय आहेत. मात्र, त्यांच्या भावनांचा अवमान होणार असेल तर विचार करावा लागेल, असेही त्यांनी म्हटले आहे.

भाजपचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी हे राजापूर सभेतील वक्तव्याने व्यथित असून, याची दखल शिवसेनेने घ्यावी, असा इशाराही त्यांनी दिला आहे. नारायण राणे हे भाजपचे नेते आहेत. भाजपच्या नेत्यांवर या जिल्ह्यात टीका करून चांगले वातावरण बिघडवण्यापासून शिवसेनेने स्वत:ला आवरावे. या जिल्ह्यात नसलेला विषय या प्रचार सभांमध्ये आणू नये, असे पटवर्धन यांनी परखडपणे शिवसेना नेतृत्वाला सांगितले आहे.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाBJPभाजपाRatnagiriरत्नागिरी