शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
2
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
3
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
4
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
5
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
6
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
7
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
8
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
9
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
10
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
11
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
12
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
13
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
14
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
15
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
16
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
17
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
18
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
19
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
20
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!

सार्वत्रिक निवडणुकांवर नजर, रत्नागिरीत बदलांमागे राजकीय सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 16:34 IST

राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बदलल्यानंतर शिवसेनेतही संघटनात्मक बदलांना सुरूवात झाली आहे. सेनेच्या दक्षिण रत्नागिरी जिल्हाप्रमुखपदाचा मुकुट आता विलास चाळके यांच्या डोक्यावर चढविण्यात आला आहे. तालुकास्तरावरही फेरबदलांचे संकेत मिळत आहेत.

ठळक मुद्दे शिवसेनेत संघटनात्मक बदल, तालुकास्तरावरील बदलाचेही संकेत?निवडणुकांसाठी नव्या दमाची टीम

प्रकाश वराडकर रत्नागिरी : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बदलल्यानंतर शिवसेनेतही संघटनात्मक बदलांना सुरूवात झाली आहे. सेनेच्या दक्षिण रत्नागिरी जिल्हाप्रमुखपदाचा मुकुट आता विलास चाळके यांच्या डोक्यावर चढविण्यात आला आहे. तालुकास्तरावरही फेरबदलांचे संकेत मिळत आहेत.सन २०१९ मधील सार्वत्रिक निवडणुकांवर नजर ठेवून आपल्याशी सख्य असलेल्या, मिळतेजुळते घेणाऱ्या व्यक्तींची निवड करून पक्षांतर्गत सोयीचे राजकारण करण्याची रणनीती आखली जात असल्याचे या बदलांवरून दिसत आहे. या बदलांचे परिणाम येत्या काही दिवसात दिसून येणार आहेत.सन २०१९मध्ये विधानसभा व लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. त्यामुळे सर्वच पक्ष आता या निवडणुकीच्या तयारीत दंग झाले आहेत.

रत्नागिरी जिल्हा हा सेनेचा बालेकिल्ला मानला जात असला तरी विधानसभेच्या गुहागर व दापोली मतदारसंघात गेल्या वेळी राष्ट्रवादीने बाजी मारली होती. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी पुन्हा वर्चस्व मिळवण्यासाठी शिवसेनेचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.त्याचवेळी संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा व राजापूर या दक्षिण रत्नागिरीमधील भागातील सेनेच्या वर्चस्वालाही नाणार व अन्य मुद्द्यांचा भडिमार करीत विरोधकांनी आव्हान निर्माण केले आहे. त्यामुळे संघटनात्मक बदलांवर भर देताना सेनेतील महत्त्वाच्या नेत्यांनी आपल्या विश्वासातील व्यक्तींची निवड करून २०१९च्या निवडणुकीचे राजकारण आपल्या हाती ठेवता येईल, अशी रणनीती आखल्याची चर्चा आहे.दक्षिण रत्नागिरीचे जिल्हाप्रमुख म्हणून गेल्या दहा वर्षांपासून राजेंद्र महाडिक यांनी चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे आता त्यांच्यावर जिल्हा सहसंपर्कप्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या जागी खासदार विनायक राऊत यांच्या विश्वासातील विलास चाळके यांची निवड झाली आहे.राजापूरचे सेना आमदार राजन साळवी हे डॅशिंग नेते म्हणून ओळखले जातात. नाणार प्रकल्पाच्या विरोधातही साळवी यांनी जोरकस भूमिका घेतली. मात्र, या प्रकल्पाबाबत पक्षाची धरसोड भूमिका त्यांच्यासाठी त्रासदायक ठरली आहे. तसेच पक्षातर्फे येत्या निवडणुकीत राजन साळवी यांना पुन्हा उमेदवार मिळणार की नाही, याची चर्चाही आता सुरू झाली आहे.राजन साळवी यांना विधानपरिषदेवर पाठवून राजापूर विधानसभा मतदारसंघात दुसरा दमदार उमेदवार देण्याबाबत संघटनेत चर्चा आहे. तसे झाल्यास ही संधी कोणासाठी आशेचा किरण ठरणार याकडे सर्वांचे आहे.

दक्षिण रत्नागिरी सेना पक्षसंघटनेत फेरबदलाचे वारे वाहात असतानाच तालुका व विभाग पातळीवरही संघटनात्मक फेरबदल होणार काय, याबाबत शिवसैनिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.जाधव, कदमांची बारीजिल्हा शिवसेनेतील संघटनात्मक बदलाच्या आधी जिल्हा राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्येही संघटनात्मक बदल झाले आहेत. जिल्हाध्यक्षपदाचा शेखर निकम यांनी राजीनामा दिल्यानंतर बाबाजी जाधव हे आता राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष झाले आहेत. शेखर निकम हे राष्ट्रवादीचे चिपळूणचे विधानसभा उमेदवार असतील, अशी चर्चाही आहे. जिल्हा कॉँग्रेसला तब्बल तीन वर्षांनंतर रमेश कदम यांच्या रुपाने जिल्हाध्यक्ष मिळाला आहे.दापोली, गुहागरवर सेनेचे लक्षजिल्ह्यातील विधानसभेच्या पाचही जागा जिंकण्यासाठी शिवसेनेने व्यूहरचना करताना अन्य पक्षात गेलेले नेते व कार्यकर्ते पुन्हा पक्षात कसे येतील, यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. दापोली मतदारसंघात योगेश कदम यांनी आपला राजकीय प्रभाव वाढवला आहे. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळेल, अशी चर्चा आहे. मात्र, गुहागर विधानसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी अजून कोणते संघटनात्मक फेरबदल होणार, कोणती सक्षम व्यक्ती पुन्हा शिवसेनेत परतणार, याची चर्चाही सुरू आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणRatnagiriरत्नागिरी