शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

सार्वत्रिक निवडणुकांवर नजर, रत्नागिरीत बदलांमागे राजकीय सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 16:34 IST

राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बदलल्यानंतर शिवसेनेतही संघटनात्मक बदलांना सुरूवात झाली आहे. सेनेच्या दक्षिण रत्नागिरी जिल्हाप्रमुखपदाचा मुकुट आता विलास चाळके यांच्या डोक्यावर चढविण्यात आला आहे. तालुकास्तरावरही फेरबदलांचे संकेत मिळत आहेत.

ठळक मुद्दे शिवसेनेत संघटनात्मक बदल, तालुकास्तरावरील बदलाचेही संकेत?निवडणुकांसाठी नव्या दमाची टीम

प्रकाश वराडकर रत्नागिरी : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बदलल्यानंतर शिवसेनेतही संघटनात्मक बदलांना सुरूवात झाली आहे. सेनेच्या दक्षिण रत्नागिरी जिल्हाप्रमुखपदाचा मुकुट आता विलास चाळके यांच्या डोक्यावर चढविण्यात आला आहे. तालुकास्तरावरही फेरबदलांचे संकेत मिळत आहेत.सन २०१९ मधील सार्वत्रिक निवडणुकांवर नजर ठेवून आपल्याशी सख्य असलेल्या, मिळतेजुळते घेणाऱ्या व्यक्तींची निवड करून पक्षांतर्गत सोयीचे राजकारण करण्याची रणनीती आखली जात असल्याचे या बदलांवरून दिसत आहे. या बदलांचे परिणाम येत्या काही दिवसात दिसून येणार आहेत.सन २०१९मध्ये विधानसभा व लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. त्यामुळे सर्वच पक्ष आता या निवडणुकीच्या तयारीत दंग झाले आहेत.

रत्नागिरी जिल्हा हा सेनेचा बालेकिल्ला मानला जात असला तरी विधानसभेच्या गुहागर व दापोली मतदारसंघात गेल्या वेळी राष्ट्रवादीने बाजी मारली होती. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी पुन्हा वर्चस्व मिळवण्यासाठी शिवसेनेचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.त्याचवेळी संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा व राजापूर या दक्षिण रत्नागिरीमधील भागातील सेनेच्या वर्चस्वालाही नाणार व अन्य मुद्द्यांचा भडिमार करीत विरोधकांनी आव्हान निर्माण केले आहे. त्यामुळे संघटनात्मक बदलांवर भर देताना सेनेतील महत्त्वाच्या नेत्यांनी आपल्या विश्वासातील व्यक्तींची निवड करून २०१९च्या निवडणुकीचे राजकारण आपल्या हाती ठेवता येईल, अशी रणनीती आखल्याची चर्चा आहे.दक्षिण रत्नागिरीचे जिल्हाप्रमुख म्हणून गेल्या दहा वर्षांपासून राजेंद्र महाडिक यांनी चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे आता त्यांच्यावर जिल्हा सहसंपर्कप्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या जागी खासदार विनायक राऊत यांच्या विश्वासातील विलास चाळके यांची निवड झाली आहे.राजापूरचे सेना आमदार राजन साळवी हे डॅशिंग नेते म्हणून ओळखले जातात. नाणार प्रकल्पाच्या विरोधातही साळवी यांनी जोरकस भूमिका घेतली. मात्र, या प्रकल्पाबाबत पक्षाची धरसोड भूमिका त्यांच्यासाठी त्रासदायक ठरली आहे. तसेच पक्षातर्फे येत्या निवडणुकीत राजन साळवी यांना पुन्हा उमेदवार मिळणार की नाही, याची चर्चाही आता सुरू झाली आहे.राजन साळवी यांना विधानपरिषदेवर पाठवून राजापूर विधानसभा मतदारसंघात दुसरा दमदार उमेदवार देण्याबाबत संघटनेत चर्चा आहे. तसे झाल्यास ही संधी कोणासाठी आशेचा किरण ठरणार याकडे सर्वांचे आहे.

दक्षिण रत्नागिरी सेना पक्षसंघटनेत फेरबदलाचे वारे वाहात असतानाच तालुका व विभाग पातळीवरही संघटनात्मक फेरबदल होणार काय, याबाबत शिवसैनिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.जाधव, कदमांची बारीजिल्हा शिवसेनेतील संघटनात्मक बदलाच्या आधी जिल्हा राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्येही संघटनात्मक बदल झाले आहेत. जिल्हाध्यक्षपदाचा शेखर निकम यांनी राजीनामा दिल्यानंतर बाबाजी जाधव हे आता राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष झाले आहेत. शेखर निकम हे राष्ट्रवादीचे चिपळूणचे विधानसभा उमेदवार असतील, अशी चर्चाही आहे. जिल्हा कॉँग्रेसला तब्बल तीन वर्षांनंतर रमेश कदम यांच्या रुपाने जिल्हाध्यक्ष मिळाला आहे.दापोली, गुहागरवर सेनेचे लक्षजिल्ह्यातील विधानसभेच्या पाचही जागा जिंकण्यासाठी शिवसेनेने व्यूहरचना करताना अन्य पक्षात गेलेले नेते व कार्यकर्ते पुन्हा पक्षात कसे येतील, यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. दापोली मतदारसंघात योगेश कदम यांनी आपला राजकीय प्रभाव वाढवला आहे. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळेल, अशी चर्चा आहे. मात्र, गुहागर विधानसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी अजून कोणते संघटनात्मक फेरबदल होणार, कोणती सक्षम व्यक्ती पुन्हा शिवसेनेत परतणार, याची चर्चाही सुरू आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणRatnagiriरत्नागिरी