शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
3
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
4
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
5
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
6
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
7
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
8
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
9
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
10
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
11
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
12
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
13
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
15
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
16
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
17
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
20
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला

Lok Sabha Election 2019 रत्नागिरी, कणकवली विधानसभा मतदारसंघांचा निर्णय महत्त्वाचा ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 11:53 AM

रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात रत्नागिरी व कणकवली विधानसभा मतदारसंघातील मताधिक्य विजयी होणाºया उमेदवारासाठी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. राजापूर, चिपळूण, कुडाळ, सावंतवाडी या चार विधानसभा मतदार संघातील मताधिक्य

ठळक मुद्देलोकसभा निवडणूक : दोन विधानसभा मतदारसंघांचा निर्णय महत्त्वाचा

प्रकाश वराडकर । 

रत्नागिरी : रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात रत्नागिरी व कणकवली विधानसभा मतदारसंघातील मताधिक्य विजयी होणाºया उमेदवारासाठी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. राजापूर, चिपळूण, कुडाळ, सावंतवाडी या चार विधानसभा मतदार संघातील मताधिक्य हे निवडणुकीतील प्रमुख उमेदवारांसाठी निसटते मताधिक्य देणारे ठरू शकते, असा राजकीय अंदाज आहे. 

रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात यावेळी गतवेळच्या निवडणुकीप्रमाणे सेनेचे विनायक राऊत व तत्कालिन कॉँग्रेस उमेदवार आणि  या निवडणुकीतील स्वाभिमान पक्षाचे उमेदवार नीलेश राणे हे पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात आमने -सामने उभे ठाकले आहेत. तसेच कॉँगे्रस आघाडीतर्फे नवीनचंद्र बांदिवडेकर, वंचित आघाडीचे मारूती काका जोशी व बहुजन समाज पार्टीचे सुरेश वरक हे निवडणूक रिंगणात आहेत. मात्र, यावेळी खरी लढत ही शिवसेनेचे विनायक राऊत व स्वाभिमान पक्षाचे नीलेश राणे यांच्यातच आहे. सध्यस्थितीत तरी कॉँग्रेसचे उमेदवार बांदिवडेकर हे तिसºया क्रमांकावर आहेत.

या निवडणुकीत विनायक राऊत व नीलेश राणे अर्थात शिवसेना व नारायण राणे यांच्यात प्रतिष्ठेचा सामना होत आहे. रत्नागिरी, चिपळूण, राजापूर, कणकवली, कुडाळ व सावंतवाडी असे ६ विधानसभा मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघात आहेत. मात्र, गेल्यावेळी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उदय सामंत यांनी विक्रमी ३९ हजार ३२७ एवढे मताधिक्य मिळवले होते. उदय सामंत यांना ९३,४३६ मते मिळाली होती, तर प्रतिस्पर्धी भाजप उमेदवार बाळ माने यांना ५४,१४८ मते मिळाली होती. 

२०१४च्या विधानसभा निवडणुकीत उदय सामंत यांनी राष्टÑवादीतून ७० ते ८० टक्के कार्यकर्त्यांसह सेनेत प्रवेश केला. आधीच रत्नागिरीत तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांच्या नेतृत्त्वाखाली सेना बळकट होतीच. त्यात राष्टÑवादीतील कार्यकर्त्यांमुळे या मतदारसंघात सेनेला दुप्पट बळ मिळाले. या लोकसभा निवडणुकीत  सेना-भाजप युतीमुळे राऊत यांना भाजपचेही बळ मिळणार आहे. त्यामुळे विनायक राऊत यांना या लोकसभा मतदारसंघातील सर्वाधिक मताधिक्य हे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून मिळेल, अशी अटकळ आहे.

त्याचवेळी कॉँग्रेसचे आमदार नितेश राणे (सध्या स्वाभिमान पक्ष) यांना गेल्या विधानसभा निवडणुकीत कणकवली मतदारसंघात २५,९७९ एवढे मताधिक्य मिळाले होते. २०१४च्या लोकसभा निवडणुकीनंतर केवळ सहा महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रतिकूल राजकीय स्थिती असतानाही नितेश राणे यांनी मिळविलेले २५ हजारचे मताधिक्य हे विरोधकांसाठी त्यावेळी विक्रमीच होते. जसा रत्नागिरी मतदारसंघ सेनेचे आमदार उदय सामंत यांनी पिंजून काढला आहे, आपले राजकीय वर्चस्व स्थापित केले आहे तसेच कणकवली मतदारसंघात गेल्या साडेचार वर्षांच्या काळात आमदार नितेश राणे यांनीही आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. कणकवली मतदारसंघात त्यांचा संपर्क व काम करण्याची पध्दत पाहता गेल्यावेळच्या विधानसभा निवडणुकीतील मताधिक्यात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्ग