शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

कामगारांना लाॅकडाऊनची; उद्योजकांना कामगार गावी जाण्याची धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 12:38 IST

CoronaVirus Ratnagiri Labour : विविध उद्योग क्षेत्रात सध्या पुन्हा लाॅकडाऊन झाले आणि हाताचे काम गेले तर काय करायचे, ही भीती आहे. त्यामुळे आता कामगारांमध्ये गावी जावे की न जावे, ही संभ्रमावस्था आहे. तर मोठ्या मिनतवाऱ्या केल्यानंतर काही कामगार कामावर आलेत. त्यामुळे पुन्हा लाॅकडाऊनने सगळं ठप्प केले तर काय करायचे, व्यवसाय, उद्योग कसा करायचा, ही धास्ती विविध व्यावसायिक आणि उद्योजक यांना सतावत आहे.

ठळक मुद्देकामगारांना लाॅकडाऊनची; उद्योजकांना कामगार गावी जाण्याची धास्तीउद्योग, व्यवसायांना मोठा फटका, कामगारांचीही उपासमार

शोभना कांबळे

रत्नागिरी : विविध उद्योग क्षेत्रात सध्या पुन्हा लाॅकडाऊन झाले आणि हाताचे काम गेले तर काय करायचे, ही भीती आहे. त्यामुळे आता कामगारांमध्ये गावी जावे की न जावे, ही संभ्रमावस्था आहे. तर मोठ्या मिनतवाऱ्या केल्यानंतर काही कामगार कामावर आलेत. त्यामुळे पुन्हा लाॅकडाऊनने सगळं ठप्प केले तर काय करायचे, व्यवसाय, उद्योग कसा करायचा, ही धास्ती विविध व्यावसायिक आणि उद्योजक यांना सतावत आहे.

गेल्या मार्च महिन्यापासून लाॅकडाऊन सुरू झाले ते सलग जून महिन्यापर्यंत सुरू होते. जून महिन्यात काही उद्योग सुरू राहिले. मात्र, हाॅटेल, बांधकामे ठप्पच राहिली. हातचे काम गेल्याने उपासमार होऊ नये, यासाठी पर राज्यातील, पर जिल्ह्यातील कामगार आपल्या गावी परतले. त्यामुळे उद्योगांना मोठा फटका बसला. तर हाॅटेल, बांधकाम व्यावसायिकांचा सुमारे दहा महिने व्यवसाय बंद होऊनही त्यांची सोय करावी लागली. त्यामुळे या सर्व उद्योग, व्यवसायांना मोठा फटका बसला तर कामगारांचीही उपासमार झाली.

हाताला काम नाही, इथे तरी काय करणार?

गेल्या वर्षी लाॅकडाऊन १५ दिवसांसाठी करण्यात आले होते. मात्र, ते पुन्हा वाढत गेले. त्यामुळे ऑगस्ट महिन्यापर्यंत उद्योग सुरू झाले नव्हते. काही कामगारांच्या हाताचे कामही गेले होते. आता पुन्हा लाॅकडाऊन झाले तर पुन्हा उपासमार होण्याची भीती वाटते. काम नसेल तर खाणार काय?- राजेशकुमार थापा, नेपाळ

गेल्या वर्षी बेळगावहून आलेले अनेक लोक काम थांबल्याने गावाला गेले. काहींना उद्योग सुरू झाल्यानंतर काम मिळाले. मात्र, आता पुन्हा लाॅकडाऊन झाले आणि काम थांबले तर मग हातात पैसे कसे येणार? पैसाच नाही आला तर कुटुंबाची गुजराण कशावर करणार?

- प्रकाश चाैहान,बेळगाव

सध्या तरी आम्हाला आम्ही ज्याठिकाणी काम करतो, तिथे रहाण्याची तसेच धान्याची उपलब्धता करून दिली जाणार आहे. त्यामुळे सध्या तरी लाॅकडाऊनची भीती वाटत नाही. पण गेल्या वर्षीसारखे अनेक महिने सर्व उद्योग बंद झाले तर हाताचे काम सुटले तर काय करायचे, ही भीती वाटत आहे.

- श्रीहरी चाैधरी , राजस्थान

कामगार गावी परतला तर...

सध्या तरी इतर राज्यातील कामगार काम करत आहेत, त्यांना लाॅकडाऊनची भीती वाटत नाही. त्यांच्यासाठी साईटवरच सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे तसा काही प्रश्न येणार नाही. मात्र, कामगार गावी गेले तर..ही भीती आहेच.- पी. एन. लाड, बांधकाम व्यावसायिक, रत्नागिरी

गेल्या लाॅकडाऊनमध्ये बहुतांशी कामगार त्यांच्या गावी परतले होते. त्यापैकी मध्यंतरी काही आले. त्यांच्यापैकी काही पुन्हा गेले. सध्या ५० टक्के कामगार कामावर आहेत. मात्र, पुन्हा लाॅकडाऊन झाल्यावर तेही परत गेले तर उद्योगांवर परिणाम होण्याची भीती आहेच.

- दिगंबर मकदूम, उद्योजक, एमआयडीसी, रत्नागिरी

गेल्या लाॅकडाऊनमध्ये गावी गेलेल्या कामगारांना मोठ्या मिनतवारीने बोलावून घेतले होते. ते जानेवारीत परत आले. आता पुन्हा लाॅकडाऊन झाले, सर्व बंद झाले तर त्यांची पूर्णत: सोय करावी लागणार. अन्यथा ते पुन्हा त्यांच्या गावी परतण्याचा धोका आहेच.

- सुनीलदत्त देसाई,हाॅटेल व्यावसायिक, हातखंबा

गेल्यावर्षीची आठवण

  • गेल्या वर्षी लाॅकडाऊनमुळे बांधकाम सप्टेंबर महिन्यापर्यंत बंद राहिले. त्यामुळे या क्षेत्राला आर्थिक फटका बसला.
  • गेल्या वर्षी लाॅकडाऊनमुळे जून महिन्यापर्यंत मोठे उद्योग बंद राहिले. कामगार गावी गेले ते परतले नाहीत.
  • गेल्या वर्षापासून हाॅटेल व्यवसायाला आर्थिक फटका बसला. कामगारांची शेवटपर्यंत सोय करावी लागली.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी