शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
2
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
3
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
4
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
5
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
6
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
7
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
8
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
9
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
10
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
11
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
12
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
13
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
14
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
15
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसेतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
16
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
17
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
18
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
19
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
20
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्ह्यात कडक लॉकडाऊन, 3 ते 9 जूनपर्यंत अंमलबजावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 16:51 IST

CoronaVirus Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्यातील लॉकडाऊन एक दिवसांने पुढे गेला आहे. 3 ते 9 जूनपर्यंत जिल्ह्यात कडक लॉकडाऊन होणार आहे. २ जून रोजी रात्री १२ वाजातपासून ते ९ जून रोजी रात्री १२ वाजेपर्यंत हे लॉकडाऊन असेल. या काळात सर्व प्रकारची दुकानं बंद राहणार आहेत. केवळ दुधाची होम डिलिव्हरी 11 वाजेपर्यंत करता येणार आहे. जिल्ह्याच्या सीमा बंद राहणार असून प्रवेशासाठी आरटीपीसीआर टेस्ट अनिवार्य करण्यात आली आहे. जिल्ह्यात प्रवेशासाठी आता ई पास अनिवार्य करण्यात आला आहे.

ठळक मुद्देरत्नागिरी जिल्ह्यातील लॉकडाऊन एक दिवसांने पुढे गेलाजिल्ह्यात २ जूनच्या मध्यरात्रीपासून लॉकडाऊनची अंमलबजावणी होणार

रत्नागिरीरत्नागिरी जिल्ह्यातील लॉकडाऊन एक दिवसांने पुढे गेला आहे. 3 ते 9 जूनपर्यंत जिल्ह्यात कडक लॉकडाऊन होणार आहे. २ जून रोजी रात्री १२ वाजातपासून ते ९ जून रोजी रात्री १२ वाजेपर्यंत हे लॉकडाऊन असेल. या काळात सर्व प्रकारची दुकानं बंद राहणार आहेत. केवळ दुधाची होम डिलिव्हरी 11 वाजेपर्यंत करता येणार आहे. जिल्ह्याच्या सीमा बंद राहणार असून प्रवेशासाठी आरटीपीसीआर टेस्ट अनिवार्य करण्यात आली आहे. जिल्ह्यात प्रवेशासाठी आता ई पास अनिवार्य करण्यात आला आहे.सर्व प्रकारची खासगी, सरकारी वाहतूक बंद राहणार आहे. अत्यावश्यक सेवेसाठी केवळ एसटी सुरू राहणार आहे. बँक आणि वित्तीय संस्था कामकाज शेतकऱ्यांचा विचार करता सुरू राहणार असून केवळ 10 टक्के उपस्थिती राहणार आहे. बँक, वित्तीय संस्था 2 वाजेपर्यंत सुरू राहतील. वित्तीय संस्थांमध्ये केवळ शेतकऱ्यांशी संबंधित आर्थिक व्यवहार सुरू राहतील. एमआयडीसीमधील अत्यावश्यक सेवेत नसेलेले उद्योग बंद राहणार असून एकूण 30 ते 40 टक्के उद्योग बंद राहणार आहेत. सर्व खासगी कार्यालयं बंद राहतील. शासकीय कार्यालयांमध्ये 15 टक्के उपस्थिती राहील. केवळ अत्यावश्यक सेवेतील सरकारी कार्यालयं 15 टक्के उपस्थितीसह सुरू राहणार आहेत.जिल्ह्यातील पेट्रोल पंप 5 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेसाठी सुरू राहणार; मालवाहतुकीसाठी हायवेवरील पेट्रोल पंप मात्र 24 तास सुरू राहणार आहेत. बियाणं, खते, किटकनाशके यांची दुकानं ठराविक कालावधीमध्ये सुरू राहणार आहेत. हॉटेल्स, रेस्टॉरंट, बार बंद राहणार; होम डिलिव्हरी बंद राहील. हॉटेल्स, रेस्टॉरंटच्या होम डिलिव्हरीबाबत काही दिवसानंतर निर्णय होईल.चिकन, मटन, मच्छिची दुकानं बंद राहतील. मेडिकल दुकानांमध्ये इतर सामानाची विक्री झाल्यास 10 हजारांचा दंड होईल. लग्नाच्या ठिकाणी कॉन्स्टेबल, तलाठी आणि व्हिडीओग्राफर असेल. केवळ 25 जणांची उपस्थिती राहील. अँन्टिजेन टेस्ट अनिवार्य राहील. रेल्वेनं येणाऱ्या प्रवाशांची रेल्वे स्टेशन्सवर कोरोना चाचणी होणार आहे. शासकीय बांधकामं वगळता इतर सर्व प्रकारचे कामकाज बंद राहणार आहे. लसीकरण सुरू राहणार असून त्यामध्ये कोणतीही बाधा येणार नाही.अर्धवट लॉकडाऊन नको, रत्नागिरी व्यापारी संघटना कठोरगेले वर्षभर कमी अधिक प्रमाणामध्ये सुरु असलेले लॉकडाऊन, त्यामुळे व्यापारीवर्ग मोठ्या प्रमाणात अडचणीत आला आहे. उदरनिर्वाहाचे तेवढेच साधन असल्याने आर्थिक परिस्थिती मोठ्या प्रमाणात ढासळत चालली आहे. त्यामुळे काल केल्या गेलेल्या पुन्हा अधिकच्या ८ दिवसाच्या कडक लॉकडाऊनच्या घोषणेमुळे व्यापारी वर्ग संतापून उठला होता. 

रत्नागिरी व्यापारी महासंघाचे तालुकाध्यक्ष निखिल देसाई देसाई यांनी लॉकडाऊन करायचा असेल तर कडक करा अन्यथा सर्व दुकाने सुरु करण्यास परवानगी द्यावी. येत्या २४ तासांमध्ये जर या निर्णयावर फेरविचार केला गेला नाही तर सगळी दुकाने उघडण्यात येतील, असाही इशारा दिला होता. लॉकडाऊन हे फक्त दुकानं किंवा हॉटेल साठी मर्यादित न ठेवता, सर्व शासकीय / खाजगी कार्यालये, बँक, रेल्वे वाहतूक सेवा, औद्योगिक वसाहतीमधील कंपन्या, एस.टी. वाहतूक यासुद्धा पूर्णपणे बंद करण्यात याव्यात, अर्धवट असलेले लॉकडाऊन खपवून घेतले जाणार नाही. त्यामुळे लॉकडाऊन फक्त कागदोपत्री न करता त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. अशी कठोर भूमिका  जिल्ह्यातील व्यापारी संघटनांनी मांडली होती.उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी  जिल्ह्यातील व्यापाऱ्यासोबत चर्चा करण्यासाठी तातडीची बैठक बोलावली, या बैठकीसाठी जिल्हाधिकारी मिश्रा, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग आणि जिल्ह्यातील व्यापारी संघटनेचे एकूण ७० प्रतिनिधी उपस्थित राहिले होते. त्यांनी आपल्या समस्या सामंतांना सांगितल्या. त्यावर अजून थोडी कळ सोसून, व्यापाऱ्यांनी शासनाने आखून दिलेले सर्व नियमांचे पालन करून शासनाला सहकार्य करण्याची विनंती केली आहे. कारण कोरोनाचे रत्नागिरीवर घोंघावणाऱ्या संकटाची भीषणता पाहता सर्वांनी एकमेकांना सहकार्य करूनच या महामारीतून बाहेर पडणे शक्य होणार असल्याचे सांगितले, त्यामुळे इतके महिने जसे सहकार्य केले तसेच सहकार्य पुढील काही दिवस कराल अशी अपेक्षा व्यक्त करत आहे.व्यापाऱ्यांनी भूमिका बदलून शासनाला सहकार्य करण्याचे एक मताने मान्य केले. परंतु, कडक लॉकडाऊन लावण्याआधी एक दिवसाचा अवधी वाढवून मिळावा अशी त्यांनी मागणी केली. व्यापाऱ्यांच्या समस्या आणि त्यांनी केलेल्या विनंतीनुसार अनेक मुद्यांवर चर्चा झाल्यावर काही प्रमाणात तात्पुरते तोडगे सुद्धा मिळाल्याने सर्वांचे एकमत झाले. त्यानुसार रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मिश्रा यांनी पुढील ८ दिवसाच्या कडक संचारबंदीसाठी आखण्यात आलेली नियमावली जाहीर केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी