शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
11
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
12
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
13
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
14
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
15
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
16
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
17
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
18
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
19
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
20
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिकांना रोजगार हवा, कंत्राटी कामगारांना कायम करा; मंत्री उदय सामंतांची जिंदल कंपनीला तंबी

By शोभना कांबळे | Updated: September 15, 2023 15:19 IST

रत्नागिरी : जिंदल कंपनीच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी मच्छीमारांना कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी. स्थानिकांना रोजगार द्यावा, त्याचबरोबर जे ...

रत्नागिरी : जिंदल कंपनीच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी मच्छीमारांना कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी. स्थानिकांना रोजगार द्यावा, त्याचबरोबर जे कंत्राटी तत्वावर आहेत, त्यांना कायम करावे, मच्छीमारांना जे जे हवे ते प्रथम करुन द्यावे, असे सांगतानाच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी जिंदाल कंपनीच्या स्थानिक अधिकाऱ्यांवर असेल, असा इशाराही पालकमंत्री उदय सामंत यांनी जिंदल पोर्ट कंपनीच्या उपस्थित तीन अधिकाऱ्यांना दिला.

जयगड येथील मच्छीमारांच्या प्रश्नांसंदर्भात पालकमंत्री सामंत यांनी गुरूवारी (१४ सप्टेंबर) जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, प्रादेशिक बंदर अधिकारी संजय उगलमुगले, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिंदाल पोर्ट कंपनीचे अधिकारी सचिन गबाळे, सुदेश मोरे, करुणाकांत दवे आणि मच्छीमार उपस्थित होते.

मंत्री सामंत म्हणाले की, उद्योजक सज्जन जिंदल हे एक चांगले उद्योजक आहेत. त्यांच्याशी माझी चर्चा झाली आहे. मच्छिमारांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी स्वत: पुढाकार घेत सकारात्मक पाऊले टाकली आहेत. त्याशिवाय कंपनीच्या सीएसआरमधून काही गावांमध्ये सुविधा देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे. असे असताना कंपनीचे स्थानिक अधिकारी मात्र, त्यांच्या मनमानीमुळे ते चांगल्या कंपनीला आणि चांगल्या मालक उद्योजकांना बदनाम करत आहेत. मच्छिमारांना त्रास देणारे शुक्ला या अधिकाऱ्याची तात्काळ बदली करावी. त्याशिवाय पुढील चर्चा वा कामकाज सुरु राहणार नाही, असेही ते म्हणाले.

मच्छिमारांवर दाखल झालेल्या खोट्या केसेस काढून टाकण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चर्चा करेन. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची दक्षताही कंपनीच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी घ्यावी. प्रांताधिकारी, बंदरविभाग व पोलिस विभागांनी संयुक्तपणे मच्छिमारी करण्याबाबत पाहणी करावी. स्थानिकांना रोजगार देत असाल, त्यांच्या समस्या सोडवत असाल, कंपनीच्या सीएसआरमधून मच्छीमारांना सानुग्रह अनुदान मिळत असेल, तर निश्चितपणे आम्ही सर्वजण तुमच्या सोबत असू, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंत