शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद
2
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
3
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
4
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
5
'हिंदुस्तान झिदाबाद...' तिरंग्यासाठी लंडनमध्ये पाकिस्तानींशी भिडल्या भारतीय तरुणी, पाहा VIDEO
6
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
7
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
8
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
9
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
10
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
11
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
12
चिपळुणात वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; पूरसदृश स्थितीमुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचना
13
"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण
14
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
15
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
16
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी
17
AI क्राईम प्रिडिक्शन सिस्टम: गुन्हेगारांना पकडण्यासाठी आता 'हा' देश घेणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत
18
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
19
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
20
आयटी कंपनीने ८०% कर्मचाऱ्यांना एकाचवेळी कामावरुन काढलं; कारण वाचून हैराण व्हाल

वृक्ष लागवडीची जय्यत तयारी

By admin | Updated: June 29, 2016 23:54 IST

‘सेल्फी विथ ट्री’ : शासनाची खास वेबसाईट

वृक्ष लागवडीची जय्यत तयारी ‘सेल्फी विथ ट्री’ : शासनाची खास वेबसाईट मेहरुन नाकाडे --रत्नागिरीवन महोत्सव राबवत असताना शासन नवनवीन तंत्रांचा वापर करीत आहे. सध्या सेल्फीचे वेड असल्याने ‘सेल्फी विथ ट्री’ उपक्रम राबवण्यात येणार आहे. त्यासाठी शासनाने ६६६.ेंाँंङ्म१ी२३.ॅङ्म५.्रल्ल हे संकेतस्थळ सुरू केले आहे. १ जुलै रोजी संकेतस्थळ सुरू होणार असून, ३ जुलै रोजी बंद होणार आहे. झाडे लावतानाचा फोटो काढून संकेतस्थळावर पाठवायचा आहे. यातून उत्कृष्ट फोटोची निवड केली जाणार आहे. लकी ड्रॉ पध्दतीने निवडक फोटो काढले जाणार आहेत. शासनाने त्यासाठी अद्याप बक्षीस जाहीर केलेले नाही. बक्षीस लवकरच जाहीर केले जाणार आहे. मात्र, वन विभागाचे वरिष्ठ अधिकारीवगळता अन्य सर्वांना या उपक्रमात सहभागी होता येईल.महाराष्ट्र शासनातर्फे ‘चला तर लावू या जगवू या वृक्ष आणि घडवू या हरित महाराष्ट्र’ या ब्रीद वाक्याखाली वन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यात २ कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात एक लाख ९२ हजार ४७९ वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. लागवडीसाठी खड्डे तयार करण्यात आले असून, रोपवाटिकाही सज्ज झाल्या आहेत. तेथून रोपांचे वितरण सुरू आहे.सामाजिक वनीकरण व वन विभाग यांच्या नेतृत्त्वाखाली विविध शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच खासगी संस्था, कंपन्यांकडून वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. सामाजिक वनीकरण विभागातर्फे १० हजार व वन विभागातर्फे ३६ हजार, तसेच इतर विविध कार्यालये, संस्थांकडून एक लाख ४५ हजार ८०९ इतकी झाडे लावण्यात येणार आहेत. खासगी, पडिक, गावठाण जागेत वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. झाडे लावण्यासाठी खड्डे काढण्यात आले आहेत. प्रत्येक कामाची आॅनलाईन माहिती शासनाकडे कळवण्यात येत आहे. वृक्ष लागवड करण्याबाबत प्रचार व प्रसारासाठी ठिकठिकाणी वृक्षदिंंडी, चर्चासत्र, प्रशिक्षणांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक कामाची माहिती संकलित करण्यात येत आहे. साग, सुरू, चाफा, गावठी आंबा, गुलमोहोर, मेनझियम, शिवण, आवळा, रेन ट्री, कोकम आदी विविध प्रकारची रोपे शासकीय रोपवाटिकांमध्ये उपलब्ध आहेत. कृषी विभागाच्या रोपवाटिकेतून आंबा, काजू, नारळ, चिकू आदी प्रकारची रोपे वितरीत केली जात आहेत. विविध २९ कार्यालयांतर्फे २ हजार ४३८ ठिकाणी १ लाख ४० हजार २०९ हेक्टर क्षेत्रावर एक लाख ९२ हजार ४७९ झाडे लावण्यात येणार आहेत.निवडणुकीच्या वेळी नियंत्रणासाठी ज्याप्रमाणे विशेष समिती कार्यरत असते, त्याप्रमाणे ‘वन महोत्सव २०१६’साठी समिती गठीत करण्यात आली आहे. संपूर्ण राज्यभर एकाच दिवशी २ कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम आयोजित केला आहे. केवळ झाडे लावून हा कार्यक्रम न संपवता लावलेली सर्व झाडे जगवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. दर तीन महिन्यांनी विभागीय आयुक्त लागवडीबाबत आढावा घेणार आहेत. सर्व कार्यालये व स्थानिक संस्थांचे या उपक्रमासाठी सहकार्य लाभत असून, प्रत्येकाने नियोजन केले आहे, त्यामुळे रोपांसाठी मागणी वाढत आहे. नागरिकांनीही या उपक्रमात सहभागी व्हावे.- सी. एल. धुमाळ, अधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग, रत्नागिरी