शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
3
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
4
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
5
धक्कादायक..! नात्यातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
6
शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज, शेतकऱ्यांना माेठा दिलासा! सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय
7
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
8
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग
9
७ राज्यांत पेच; भाजपच्या अध्यक्ष निवडीला विलंब, २९ राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका झाल्या पूर्ण!
10
सरकारी कार्यालयांच्या वेळा वेगवेगळ्या; मुंबईत गर्दी कमी करण्यासाठी नवीन उपाय!
11
डिजिटल अरेस्टच्या गुन्ह्यात देशात पहिल्यांदाच शिक्षा; पश्चिम बंगालमध्ये ९ जणांना जन्मठेप, उत्तर प्रदेशात ७ वर्षांची शिक्षा
12
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
13
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
14
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
15
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
16
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
17
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
18
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
19
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
20
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!

अल्पसंख्याक व प्राैढ शिक्षण संचालनालयातर्फे साक्षरता दिन सप्ताह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:38 IST

रत्नागिरी : समाजातील प्रत्येक वर्गाच्या लोकांना राष्ट्रासाठी आणि मानवी विकासासाठी त्यांच्या हक्कांबद्दल माहिती असणे महत्त्वाचे आहे. या ज्ञानासाठीच शिक्षण ...

रत्नागिरी : समाजातील प्रत्येक वर्गाच्या लोकांना राष्ट्रासाठी आणि मानवी विकासासाठी त्यांच्या हक्कांबद्दल माहिती असणे महत्त्वाचे आहे. या ज्ञानासाठीच शिक्षण दिले जाते. लोकांना शिक्षणाकडे प्रेरित करण्याच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस दरवर्षी ८ सप्टेंबर रोजी जगभरात साजरा केला जातो. या उद्देशाने अल्पसंख्यांक व प्रौढ शिक्षण संचालनालयाने चालू वर्षी साक्षरता दिनापासून आठवडाभरात राज्यात विविध उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार साक्षरता दिन साजरा करण्याची घोषणा २६ ऑक्टोबर १९६६ रोजी करण्यात आली होती; परंतु त्याची कल्पना सर्वप्रथम इराणच्या तेहरान येथे झालेल्या शिक्षण मंत्र्यांच्या जागतिक परिषदेच्या वेळी आली. ही परिषद १९६५ साली आयोजित करण्यात आली होती, ज्यात निरक्षरता संपवण्यासाठी जगभरात जागरूकता मोहीम चालवण्यावर चर्चा झाली. त्यानुसार जगातील सर्व देशांमध्ये समाजातील प्रत्येक घटकापर्यंत शिक्षणाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने या दिवसाची सुरुवात झाली. समाजात शिक्षणाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने जागतिक साक्षरता दिवस भारतातही साजरा केला जातो. भारताचे सर्व शिक्षा अभियान हे या दिशेने कौतुकास्पद पाऊल आहे.

दरवर्षी साक्षरता दिनानिमित्त एक विशेष थीम असते. जगभरात मागील वर्षीपासून कोरोना असल्याने, यावेळी कोरोनासंदर्भातच २०२१ ची आंतरराष्ट्रीय जागतिक साक्षरता दिवसाची थीम ही ‘मानवी-केंद्रित पुनर्प्राप्तीसाठी साक्षरता: डिजिटल विभाजन संकुचित करणे ( ‘Literacy for a human-centred recovery: Narrowing the digital divide) ही आहे. भारत किंवा जगातील दारिद्र्य निर्मूलन करणे, बालमृत्यू कमी करणे, लोकसंख्या वाढ नियंत्रित करणे, लिंग समानता साध्य करणे इत्यादी वाढणे खूप महत्त्वाचे आहे. निरंतर शिक्षण प्राप्त करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि कुटुंब, समाज आणि देशाप्रती त्यांची जबाबदारी समजून घेण्यासाठी साक्षरता दिवस साजरा केला जातो.

साक्षरता दिनापासून आठवडाभरात विविध उपक्रम राबविण्याबाबत अल्पसंख्यांक व प्रौढ शिक्षण संचालनालयाचे उपसंचालक राजेश क्षीरसागर यांनी चालू वर्षी साक्षरता दिनापासून आठवडाभरात निबंध, वक्तृत्व, घोषवाक्य, चित्रकला, रांगोळी, भित्तीपत्रक स्पर्धा ऑनलाइन घेण्याबाबत सर्व जिल्हा शिक्षणाधिकारी यांना सुचित केले आहे. त्यानुसार त्यासंबंधी कार्यवाही सुरू झाली आहे.

.............

कोटसाठी

आंतरराष्ट्रीय समुदायासाठी प्रौढ शिक्षण आणि साक्षरतेच्या दराकडे लक्ष वेधण्यासाठी हा दिवस खास साजरा केला जातो. साक्षरता हा मानवी हक्क आहे. हे केवळ वैयक्तिक सक्षमीकरणाचे साधन नाही तर मानवी आणि सामाजिक विकासाचे एक प्रमुख साधन आहे. दारिद्र्य निर्मूलन, लोकसंख्या वाढ थांबवणे, बालमृत्यू कमी करणे, लैंगिक समानता प्राप्त करणे तसेच विकास, शांतता आणि लोकशाही राखण्यासाठी साक्षरता महत्त्वाची भूमिका बजावते.

-राजेश क्षीरसागर, उपसंचालक, अल्पसंख्यांक व प्रौढ शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य.

..............

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या (NSO) आकडेवारीवर आधारित अहवालानुसार, भारतातील साक्षरता दर ७७.७ टक्के आहे. ग्रामीण भागातील साक्षरता दर ७३.५ टक्के आहे तर शहरी भागातील ८७.७ टक्के आहे. भारताचा साक्षरता दर जागतिक साक्षरतेच्या दरापेक्षा कमी आहे. २०११ मध्ये भारताचा एकूण साक्षरता दर ७४.४ टक्के होता. १९४७ मध्ये केवळ १८ टक्के होता. त्याच वेळी, केरळ देशातील सर्वाधिक साक्षरतेचे राज्य असून, तेथे ९३ टक्के लोकसंख्या साक्षर आहे. सर्वात कमी साक्षरता असलेले राज्य बिहार असून, तिथे ६३.८२ टक्के लोकसंख्या साक्षर आहे. उत्तर प्रदेश कमी साक्षर असलेल्या पाच राज्यांच्या श्रेणीत आहे. गेल्यावर्षी नवसाक्षर भारत योजना राबवण्याची घोषणा केंद्र सरकारने केली होती; परंतु कोरोनामुळे ही योजना अद्यापही सुरू झालेली नाही.