शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

हेवेदावे बाजूला ठेवून एकत्रित निवडणुकीला सामोरे जाऊया : रवींद्र चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2024 18:23 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क अडरे (चिपळूण) : लोकसभा निवडणुकीत असणाऱ्या मतदाराला आम्ही सर्व एकच आहोत, असा विश्वास द्या. आपापसातील हेवेदावे ...

लाेकमत न्यूज नेटवर्कअडरे (चिपळूण) : लोकसभा निवडणुकीत असणाऱ्या मतदाराला आम्ही सर्व एकच आहोत, असा विश्वास द्या. आपापसातील हेवेदावे बाजूला ठेवून निवडणुकीला सामोरे जाऊया, असा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी चिपळूण येथील महायुतीच्या मेळाव्यात केले.

रवींद्र चव्हाण पुढे म्हणाले की, ही निवडणूक देशासाठी महत्त्वाची असून, देशाचे सक्षमपणे नेतृत्व कोण करू शकतो? हे मतदारांना समजावून सांगा. कोणी भावनिक आवाहन करतील. मात्र, आपण सर्वांनी मोदींविषयी मतदारांमध्ये आत्मविश्वास निर्माण करा, असे सांगितले.

आमदार शेखर निकम म्हणाले की, राज्यघटना बदलण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न असल्याचा अपप्रचार विरोधकांकडून होत आहे. मात्र, गेली दहा वर्षे एकहाती सत्ता असतानाही हा प्रयत्न झाला नाही आणि तसा कोणी प्रयत्नही करणार नाही. यामुळे विरोधकांच्या अपप्रचाराला कोणी बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. भाजप उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस रामदास राणे यांनी सूत्रसंचालन केले.

यावेळी आमदार शेखर निकम, माजी आमदार मधुकर चव्हाण, माजी आमदार डॉ. विनय नातू, भाजप जिल्हा उपाध्यक्ष अतुल काळसेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस जयंद्रथ खताते, भाजप उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे, भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा चित्रा चव्हाण आदी उपस्थित होते.

टॅग्स :ratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्ग