शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
2
'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
3
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
4
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
5
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
6
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
7
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
8
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
9
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
10
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
11
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
12
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
13
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
14
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
15
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
16
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
17
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
18
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
19
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
20
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा

‘जलयुक्त’च्या ग्रामसभेस अधिकाऱ्यांची पाठ

By admin | Updated: November 19, 2015 00:44 IST

ग्रामसभेचा ठराव वरिष्ठांना कळवणार

चिपळूण : संगमेश्वर तालुक्यातील राजिवली ग्रामपंचायतीची जलयुक्त शिवार योजनेसाठीची विशेष ग्रामसभा कुटगिरी - येडगेवाडी येथे बुधवारी झाली. या ग्रामसभेकडे शासनाच्या खातेप्रमुखांनी पाठ फिरवल्याने नाराजी व्यक्त होत आहे. जलयुक्तसारख्या महत्त्वाच्या योजनेची कामे निवडण्यासाठी ग्रामसभा घेतली असताना पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागातील कोणतेही अधिकारी उपलब्ध होऊ शकले नाहीत. येडगेवाडी ही पाणीटंचाईग्रस्त वाडी असल्याने दरवर्षी या वाडीला पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरु करावा लागतो. एवढे गंभीर प्रश्न असूनही पाणीपुरवठा अथवा पंचायत समितीतील एकही जबाबदार अधिकारी हजर राहू शकला नाही. यावर्षी संगमेश्वर तालुक्यातील १५ गावे ही जलयुक्तमध्ये घेतली गेली आहेत. त्यापैकी ५ गावे अंमलबजावणीसाठी निवडली जाणार आहेत. यातून गंभीर पाणी समस्या असणाऱ्या अथवा शासन सिंचन उपलब्ध करून देण्यास आवश्यकता असणाऱ्या गावांचा प्रथमदर्शी समावेश होऊ शकतो. येडगेवाडीची पाण्याची टंचाई लक्षात घेता ही वाडी पाचपैकी प्रथम क्रमांकामध्ये बसेल, अशी स्थिती आहे. याचे निकष ठरविण्यासाठीच्या सभेला पाणीपुरवठा विभागच गायब होता. आजच्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी कायमस्वरुपी पाणी समस्या सोडवण्यासाठी आम्हाला धरणातून पाणी उचलून द्यावे, त्यामुळे आमचा पाण्याचा प्रश्न निकाली निघेल तर उपस्थित असलेल्या महसूलच्या मंडल अधिकारी, कृषीचे सुस्तरफोड, तर ग्रामसेवक जाधव यांनी ग्रामसभेचा ठराव वरिष्ठ कार्यालयाला कळविला जाईल, असे आश्वासन दिले. (प्रतिनिधी)