शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
2
Satish Shah Death: 'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेते सतीश शाह यांचं निधन, ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
मुंबईत शिंदेसेना फक्त ६५ ते ७० जागाच लढवणार?; भाजपानं कंबर कसली, 'अबकी बार १५० पार'चा नारा
4
कोहली बनला लिमिटेड ओव्हर्सचा 'किंग', सचिन तेंडुलकरचा १८,४३६ धावांचा विक्रम मोडला!
5
कोण आहे सतीश शाह यांची पत्नी? दोघांना नव्हते मूल; जोडीदाराच्या निधनाने बसला धक्का
6
सामनावीर अन् मालिकावीर! रोहित शर्मा दुहेरी सन्मानावर म्हणाला- "मालिका हरलो असलो तरीही..."
7
Virat Kohli: 'रन मशीन' विराटची गगनभरारी! संगकाराला पछाडलं, आता फक्त सचिन तेंडुलकर पुढे
8
IND vs AUS: रोहितच्या सेंच्युरीसह किंग कोहलीची फिफ्टी; ऑस्ट्रेलिया विरुद्ध अखेरच्या वनडेत अविस्मरणीय शो!
9
मंगळ गोचर २०२५: २७ ऑक्टोबर रोजी मंगळ गोचर; पुढचे दोन महिने 'या' ५ राशींसाठी असणार खास!
10
देशभरात इन्व्हेस्टमेंट स्कॅमचे जाळे; सहा महिन्यांत 30 हजार लोकांची फसवणूक, ₹1500 कोटी लुटले
11
पश्चिम सीमेवर भारताचे तिन्ही सैन्य दल पाकिस्तानची झोप उडवणार; NOTAM जारी, १२ दिवस काय घडणार?
12
LIC वर अदानी समूहात गुंतवणुकीसाठी सरकारी दबाव? वॉशिंग्टन पोस्टच्या दाव्याचे कंपनीने केले खंडन
13
Shocking: पोट दुखतंय म्हणून मुलाला दवाखान्यात नेलं; मेडिकल रिपोर्ट पाहून आई-वडील हादरले!
14
Rohit Sharma Century: रोहितचा मोठा धमाका! सिडनीच्या मैदानात साजरं केलं शतकांचं 'अर्धशतक'
15
VIDEO: तरूणी बनली 'स्पायडर वूमन'! कशाचाही आधार न घेता झपाझप भिंतींवर चढली अन्...
16
ठाणे: पाच पिढ्यांची साक्षीदार ‘विठाबाई’! महाराष्ट्रातील ज्येष्ठ आजीबाईचे ११४व्या वर्षी निधन
17
SBI ठरली 'वर्ल्ड्स बेस्ट कन्झुमर बँक'; दोन मोठ्या पुरस्कांनी सन्मान, पाहा कोणी दिला?
18
मोठी बातमी! मोदींच्या हत्येचा कट रशियाने उधळला? अमेरिकेचा एजंट ढाक्यामध्ये मारला गेला, चर्चांना उधाण...
19
'या' देशाचा झेंडा आहे जगातील सगळ्यात जुना ध्वज! गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवलं गेलंय नाव
20
छत्तीसगडमध्ये पुन्हा नक्षल हिंसाचार; बीजापूरमध्ये दोन ग्रामस्थांची निर्घृण हत्या, परिसरात दहशत

जेएनयु प्रकरणामुळे डाव्यांचा दहशतवादी चेहरा समोर : माधव भंडारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 17:23 IST

दिल्ली येथील जेएनयु विद्यार्थी मारहाण प्रकरणामुळे डाव्यांचा दहशतवादी चेहरासमोर आला असल्याचा आरोप भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी केला आहे. डाव्यांनीच हे दहशतवादी कृत्य केले आहे, या प्रकरणाशी भाजपचा कोणताही हात नाही, असे विधान भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी केले. दापोलीत राष्ट्रप्रेमी संघटनेच्यावतीने नागरिकत्व सुधारणा कायद्याला समर्थन देण्यासाठी माधव भंडारी यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी त्यांनी दिल्लीतील मारहाणीप्रकरणी भूमिका मांडली.

ठळक मुद्दे डाव्यांचा दहशतवादी चेहरा समोर : माधव भंडारी दिल्लीतील विद्यार्थी मारहाणप्रकरणी जोरदार टीका

दापोली : दिल्ली येथील जेएनयु विद्यार्थी मारहाण प्रकरणामुळे डाव्यांचा दहशतवादी चेहरासमोर आला असल्याचा आरोप भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी केला आहे. डाव्यांनीच हे दहशतवादी कृत्य केले आहे, या प्रकरणाशी भाजपचा कोणताही हात नाही, असे विधान भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी केले.

दापोलीत राष्ट्रप्रेमी संघटनेच्यावतीने नागरिकत्व सुधारणा कायद्याला समर्थन देण्यासाठी माधव भंडारी यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी त्यांनी दिल्लीतील मारहाणीप्रकरणी भूमिका मांडली.दिल्ली येथील जेएनयु प्रकरणात भाजपच्या विद्यार्थी संघटनेचा कोणताही हात नसून, यामागे डाव्या पक्षांचा हात आहे. प्रकरणातून डाव्या विद्यार्थी संघटनांनी दहशतवादी कृत्य केले आहे, डाव्या संघटनांना देशामध्ये दहशत आणि रक्तपात घडवून आणायचं आहे. त्यामुळेच अशा प्रकारचे दहशतवादी कृत्य देशातील विविध भागात केले जात आहे. डाव्या संघटनांचा हा चेहरा जनतेसमोर आला आहे. त्यांचे हे कृत्य मानवतेला काळिमा फासणारे आहे, या कृत्याचे आपण समर्थन करणार नाही, केंद्रामध्ये भाजपचे सरकार आहे, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना कठोरात कठोर शासन होईल, असे त्यांनी सांगितले.

जेएनयु प्रकरणात हस्तक्षेप केला असता तर विरोधकांनी आमच्यावर टीका केली असती, आता या प्रकरणात अनेक विद्यार्थ्यांना मारहाण झाली असून, बुरखाधारी लोकांनी मारहाण केली आहे. त्यामुळे हल्लेखोर कोण होते हे कळू शकले नसले नाही. परंतु लवकरच त्यांचा चेहरा समोर येईल व त्यांना कठोर शासन होईल, असेही माधव भंडारी म्हणाले.नागरिकत्व सुधारणा कायद्याला देशात सर्वत्र विरोध होत असताना भाजपकडून नागरिकत्व सुधारणा कायदा कसा योग्य आहे, याबद्दल ठिकाणी सभा घेऊन जनतेला समजून सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे. माधव भंडारी यांनी सीएए, एनआरसी यावर प्रबोधन केले. माधव भंडारी यांच्या जाहीर सभेला दापोली तालुक्यातील सर्वच जाती, धर्मातील लोकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला होता.शंकांचे निरसन नाहीचएनआरसी व एसएससी कायदा काय आहे, याचे फायदे काय आहेत, याबद्दल माधव भंडारी यांनी लोकांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मुस्लिम बांधवांनी सीएए व एनआरसी याबद्दल अनेक शंका उपस्थित केल्या. मात्र, त्यांच्या शंकांचे निरसन करता आले नाही. 

टॅग्स :jnu attackजेएनयूBJPभाजपाRatnagiriरत्नागिरी