शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

जेएनयु प्रकरणामुळे डाव्यांचा दहशतवादी चेहरा समोर : माधव भंडारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 17:23 IST

दिल्ली येथील जेएनयु विद्यार्थी मारहाण प्रकरणामुळे डाव्यांचा दहशतवादी चेहरासमोर आला असल्याचा आरोप भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी केला आहे. डाव्यांनीच हे दहशतवादी कृत्य केले आहे, या प्रकरणाशी भाजपचा कोणताही हात नाही, असे विधान भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी केले. दापोलीत राष्ट्रप्रेमी संघटनेच्यावतीने नागरिकत्व सुधारणा कायद्याला समर्थन देण्यासाठी माधव भंडारी यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी त्यांनी दिल्लीतील मारहाणीप्रकरणी भूमिका मांडली.

ठळक मुद्दे डाव्यांचा दहशतवादी चेहरा समोर : माधव भंडारी दिल्लीतील विद्यार्थी मारहाणप्रकरणी जोरदार टीका

दापोली : दिल्ली येथील जेएनयु विद्यार्थी मारहाण प्रकरणामुळे डाव्यांचा दहशतवादी चेहरासमोर आला असल्याचा आरोप भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी केला आहे. डाव्यांनीच हे दहशतवादी कृत्य केले आहे, या प्रकरणाशी भाजपचा कोणताही हात नाही, असे विधान भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी केले.

दापोलीत राष्ट्रप्रेमी संघटनेच्यावतीने नागरिकत्व सुधारणा कायद्याला समर्थन देण्यासाठी माधव भंडारी यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी त्यांनी दिल्लीतील मारहाणीप्रकरणी भूमिका मांडली.दिल्ली येथील जेएनयु प्रकरणात भाजपच्या विद्यार्थी संघटनेचा कोणताही हात नसून, यामागे डाव्या पक्षांचा हात आहे. प्रकरणातून डाव्या विद्यार्थी संघटनांनी दहशतवादी कृत्य केले आहे, डाव्या संघटनांना देशामध्ये दहशत आणि रक्तपात घडवून आणायचं आहे. त्यामुळेच अशा प्रकारचे दहशतवादी कृत्य देशातील विविध भागात केले जात आहे. डाव्या संघटनांचा हा चेहरा जनतेसमोर आला आहे. त्यांचे हे कृत्य मानवतेला काळिमा फासणारे आहे, या कृत्याचे आपण समर्थन करणार नाही, केंद्रामध्ये भाजपचे सरकार आहे, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना कठोरात कठोर शासन होईल, असे त्यांनी सांगितले.

जेएनयु प्रकरणात हस्तक्षेप केला असता तर विरोधकांनी आमच्यावर टीका केली असती, आता या प्रकरणात अनेक विद्यार्थ्यांना मारहाण झाली असून, बुरखाधारी लोकांनी मारहाण केली आहे. त्यामुळे हल्लेखोर कोण होते हे कळू शकले नसले नाही. परंतु लवकरच त्यांचा चेहरा समोर येईल व त्यांना कठोर शासन होईल, असेही माधव भंडारी म्हणाले.नागरिकत्व सुधारणा कायद्याला देशात सर्वत्र विरोध होत असताना भाजपकडून नागरिकत्व सुधारणा कायदा कसा योग्य आहे, याबद्दल ठिकाणी सभा घेऊन जनतेला समजून सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे. माधव भंडारी यांनी सीएए, एनआरसी यावर प्रबोधन केले. माधव भंडारी यांच्या जाहीर सभेला दापोली तालुक्यातील सर्वच जाती, धर्मातील लोकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला होता.शंकांचे निरसन नाहीचएनआरसी व एसएससी कायदा काय आहे, याचे फायदे काय आहेत, याबद्दल माधव भंडारी यांनी लोकांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मुस्लिम बांधवांनी सीएए व एनआरसी याबद्दल अनेक शंका उपस्थित केल्या. मात्र, त्यांच्या शंकांचे निरसन करता आले नाही. 

टॅग्स :jnu attackजेएनयूBJPभाजपाRatnagiriरत्नागिरी