शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

शिवसेना सत्तेसाठी लाचार पक्ष : सुप्रिया सुळे, दापोली येथील सभेमध्ये टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 14:13 IST

शिवसेना सत्तेसाठी लाचार बनली आहे. शिवसेना-सत्तेत असली तरीही भाजपने शिवसेनेला लाथाडले आहे. परंतु, शिवसेना भाजपला विरोध करु शकत नाही. कारण सेनेच्या वाघाचं आता मांजर बनलं असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी दापोली येथील सभेमध्ये केली.

ठळक मुद्देगरज नाही तरीसुध्दा बुलेट ट्रेन करण्याचा घाट : सुळे अच्छे दिन येणार असे सांगितले, भाजप सरकारचे हेच का अच्छे दिन? : सुप्रिया सुळे रामदास कदम यांच्यावर आमदार संजय कदम यांची टीका

दापोली : शिवसेना सत्तेसाठी लाचार बनली आहे. शिवसेना-सत्तेत असली तरीही भाजपने शिवसेनेला लाथाडले आहे. परंतु, शिवसेना भाजपला विरोध करु शकत नाही. कारण सेनेच्या वाघाचं आता मांजर बनलं असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी दापोली येथील सभेमध्ये केली.भाजपकडून शिवसेनेला दुय्यम स्थान दिले जात आहे. सरकारच्या जाहिरातीत पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांचा फोटो दाखवला जातो. मात्र, सत्तेत भागिदार असलेल्या शिवसेनेच्या उध्दव ठाकरे यांचा छोटा फोटोसुध्दा दाखवला जात नाही.

देशातील जनतेकरिता बुलेट ट्रेनची गरज नाही तरीसुध्दा बुलेट ट्रेन करण्याचा घाट घातला जातो. मात्र, या बुलेट ट्रेनमुळे महाराष्ट्र राज्यावर कोट्यवधी रुपयांचे कर्ज होणार आहे. त्याही परिस्थितीत मुंबई-गुजरात बुलेट ट्रेन केली जात आहे.

महाराष्ट्रात २०१९ ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरकार आले. राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाल्यास आपण बुलेट ट्रेन रद्द करु. ग्रामीण जनतेची जीवनदायिनी असलेल्या एस. टी.ला आवश्यक तो निधी देऊन तिची स्थिती सुधारु.

राज्यातील ग्रामीण जनतेला बुलेट ट्रेनची नव्हे एस. टी.ची गरज आहे. बुलेट ट्रेनचा प्रवास श्रीमंत लोकच करतील. मात्र, एस. टी.ने माझ्या राज्यातील गोरगरीब जनता प्रवास करते. एस. टी. हे त्यांच्या दळणवळणाचं व विकासाचं मुख्य साधन आहे. परंतु, भाजप सरकार भांडवलदार गुजराती जनतेला खूष करण्यासाठी बुलेट ट्रेन करु पाहत आहे.

जनतेच्या मुळावर उठलेल्या सरकारला २०१९च्या निवडणुकीत गाडून टाका. या सरकारवर जनतेचा विश्वास राहीला नाही. मुजोर व फसवे सरकार जनतेच्या हितासाठी नव्हे भांडवलदारांच्या हितासाठीच काम करीत आहे. यादरम्यान कधी नव्हे इतक्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या या सरकारच्या काळात वाढल्या आहेत.अच्छे दिन येणार असे सांगितले होते. भाजप सरकारचे हेच का अच्छे दिन? असा सवाल त्यांनी केला. नोटा बंदीने व जीएसटीमुळे जनतेचे रोजगार गेले. अनेकजण बेकार म्हणून पुढे येत आहेत.

देशाच्या पंतप्रधानाला जनतेच्या हिताच्या योजनेकडे पाहायला वेळ नाही. विदेश दौरे करण्यातच पंतप्रधान व्यस्त आहेत. विदेशी दौऱ्यांवर कोट्यवधी रुपये खर्च होत असल्याचे त्या म्हणाल्या.

रामदास कदम यांच्यावर आमदार संजय कदम यांची टीका

यावेळी शिवसेना नेते व पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्यावर आमदार संजय कदम यांनी जोरदार हल्ला चढवत पर्यावरणमंत्री कदम हे लोकांना लुगडं, ढोलक्या वाटण्याचे काम करीत आहेत. मुलाला उमेदवारी मिळावी, आपला मुलगा आमदार व्हावा म्हणून ढोलक्या-टाळ, लुगडं वाटण्यापेक्षा त्यांनी विकासकामे करावीत. रामदास कदम यांनी आपल्या खात्याचे किती रुपये खर्च केले ते जनतेसमोर आणावे, असे आव्हानच संजय कदम यांनी यावेळी बोलताना दिले.

 

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेRatnagiriरत्नागिरी