शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

‘कोकण सारथी’ सागरी नौका भ्रमण मोहिमेचा शुभारंभ, ‘प्लास्टिक मुक्तीचा’ संदेश देण्यात येणार

By मेहरून नाकाडे | Updated: November 15, 2022 18:32 IST

मोहिमेत रत्नागिरी, कोल्हापूर, सावंतवाडी, मुंबई, पुणे, नागपूर येथील नौसेना, स्थलसेना, वायूसेना मधील ६० छात्र सहभागी झाले आहेत.

रत्नागिरी : महाराष्ट्र दोन नेव्हल एनसीसी रत्नागिरी विभागातर्फे ‘कोकण सारथी’ सागरी नौका भ्रमण मोहिमेचा शुभारंभ आज, मंगळवारी भगवती बंदर येथून झाला. महाराष्ट्र राज्य एन.सी.सी.चे संचालक मेजर जनरल वाय. पी. खंडुरी यांनी सागरी मोहिमेला झेंडा दाखविला व सहभागी सर्व छात्रांना मोहिमेसाठी शुभेच्छा दिल्या. मोहिमेत रत्नागिरी, कोल्हापूर, सावंतवाडी, मुंबई, पुणे, नागपूर येथील नौसेना, स्थलसेना, वायूसेना मधील ६० छात्र सहभागी झाले आहेत.आज, मंगळवारी (दि.१५) मोहिमेचा शुभारंभ झाला असून २४ नोव्हेंबर रोजी सांगता होणार आहे. या मोहिमेतंर्गत ‘प्लास्टिक मुक्त’ समुद्र किनाऱ्यांबाबत पथनाट्याव्दारे संदेश देण्यात येणार आहे. या सागरी नौका भ्रमण मोहिमेत एन.सी.सी अधिकारी, २५ मुली व ३५ मुलगे मिळून एकूण ६० छात्र सहभागी झाले आहेत. नौका भ्रमण मोहिमेत २७ फूट सेलिंग व्हेलर तीन बोटी, शिडाच्या नौका, व छात्र सैनिकांच्या सुरक्षततेच्या दृष्टीकोनातून एक मोठी मच्छिमार नौका व दोन मध्यम यांत्रिक बोट सहभागी झाली आहे. सागरी नौका भ्रमण मोहिमेच्या शुभारंभ कार्यक्रमात मुंबईचे संचालक ब्रिगेडियर सुबोजित लहीरी, ब्रिगेडीयर समीर साळुंखे, कमांडिंग ऑफीसर के. राजेश कुमार उपस्थित होते.सकाळी भगवती बंदर येथून निघालेली सागरी नौका भ्रमण मोहिमेचा प्रवास वरवडे पर्यंत होणार आहे. त्यानंतर वरवडे ते जयगड, जयगड ते तवसाळ व परत, जयगड ते बोऱ्या व परत, जयगड ते दाभोळ, दाभोळ ते धोपावे व परत, दाभोळ ते अंजनवेल-वेलदूर व परत, दाभोळ ते जयगड, जयगड ते काळबादेवी, काळबादेवी ते रत्नागिरीत मोहिमेची सांगता होणार आहे.या मोहिमेतंर्गत छात्र सैनिक बंदरांना भेटी देत असताना, सागराच्या पाण्याशी झुंज देत, लाटांचा सामना करीत दर्यावर्दी जीवनाचा अनुभव घेतानाच बंदरानजीक लोकवस्तीत पथनाट्याच्या माध्यमातून प्लास्टिक मुक्ती व समुद्र किनारे स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करणार आहेत. छात्र सैनिकांना पाण्यातील साहसी व धाडसीवृत्तीला चालना देणे त्यासाठी विश्वास, शक्ती, मानसिकवृत्ती बळकट करणे, दर्यावर्दी जीवनाचा अनुभव प्राप्त करणे हा या मोहिमेमागचा उद्देश्य आहे.शिडाच्या बोटीतील केवळ कॅनव्हासच्या शिडाच्या (सेल) माध्यमातून १७७ नॉटिकल मैल व ३३२ किलोमीटर प्रवास केला जाणार आहे. या बोटीला कोणतेही यांत्रीक साधन नसताना केवळ शिडाच्या माध्यमातून भरती, ओहोटी वाऱ्याचा वेग व पाण्याचा प्रवाह याचा अभ्यास करून बोटीच्या माध्यमातून पाण्यावरील धाडसी साहस छात्र सैनिक करून दाखवणार असल्याने मोहिमेचे सर्वांनाच कौतुक आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी