शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

रत्नागिरीनजीकच्या मिरजोळे गावात भूस्खलन, शेतजमिनीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 4:32 PM

रत्नागिरी शहराजवळच्या मिरजोळे मधलीवाडी परिसरातील खालचा पाट भागात शेताच्या पट्ट्यात पुन्हा एकदा अतिवृष्टीमुळे मोठे भूस्खलन होण्यास सुरूवात झाली आहे. यापूर्वी २००६ साली याच ठिकाणी मोठे भूस्खलन झाले होते. कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या भूस्खलनामुळे शेतजमिनीचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देरत्नागिरीनजीकच्या मिरजोळे गावात भूस्खलनअतिवृष्टीमुळे शेतजमिनीचे नुकसान

रत्नागिरी : शहराजवळच्या मिरजोळे मधलीवाडी परिसरातील खालचा पाट भागात शेताच्या पट्ट्यात पुन्हा एकदा अतिवृष्टीमुळे मोठे भूस्खलन होण्यास सुरूवात झाली आहे. यापूर्वी २००६ साली याच ठिकाणी मोठे भूस्खलन झाले होते. कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या भूस्खलनामुळे शेतजमिनीचे नुकसान झाले आहे.

मिरजोळे मधलीवाडी परिसरातील खालचापाट येथे भूस्खनाचे प्रकार सुरूच आहेत. २००६ मध्ये अतिवृष्टीमुळे भूस्खलन होऊन सुमारे ४-५ एकर जमीन एकाचवेळी खचली होती. त्यामुळे येथील शेती, बागायती देखील उद्ध्वस्त झाली आहे. भूस्खलनाच्या धोक्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी शेतीच करणे सोडून दिले आहे.

तत्कालीन प्रांताधिकारी फरोग मुकादम यांनी त्यावेळी तातडीने या भागाची पाहणी केली होती. भूवैज्ञानिक स्तरावरूनही या प्रकारची दखल घेण्यात आली होती. रिंग लॅण्ड स्लाईड प्रकार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर झालेल्या नुकसानाचा अहवाल तयार करून उपाययोजनेसाठी पाठवण्यात आला होता.सातत्याने पाठपुरावा करून त्याठिकाणी आपत्कालीन उपयोजना झाली काँक्रीटचा धूपप्रतिबंधक बंधारा आणि नदीवर छोटा बंधारा (धरण) बांधण्यात आले. त्यावर सुमारे १५ ते २० लाख खर्च झालेत. मात्र, पुन्हा एकदा भूस्खलनाचा प्रकार घडला आहे.

अतिवृष्टीमुळे सुमारे १०० फूट लांब आणि १५ ते २० फूट उंच जमीन खचली आहे. त्यामुळे शेतकरी भयभीत झालेत. याठिकाणी दत्ताराम गावकर, राजाराम गावडे, गंगाराम गावकर, भास्कर चव्हाण, रमेश भाटकर, आणि आता भाऊ भाटवडेकर यांची शेतजमीन खचून नुकसान झाले आहे.

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018Ratnagiriरत्नागिरी