शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
3
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
4
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
5
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
6
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
7
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
8
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
9
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
10
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
11
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
12
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
13
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
14
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
15
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
16
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
17
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
18
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
19
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
20
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 

रत्नागिरी जिल्ह्यात परतीच्या पावसाने लाखो रूपयांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 13:34 IST

आॅक्टोबरच्या पहिल्या दिवसापासून दर दिवशी सायंकाळी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडू लागला आहे. त्यामुळे जिल्ह्यात घरे, गोठे यांच्या पडझडीबरोबर मंडणगड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर या तालुक्यांमध्ये घरांवर तसेच पाळीव जनावरांवर वीज पडण्याच्या घटना घडल्या आहेत. यात लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देमेघगर्जनेसह मुसळधार पाऊसजिल्ह्यात घरे, गोठे यांच्या पडझडी मंडणगड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर तालुक्यांमध्ये वीज पडण्याच्या घटनाजिल्ह्यात लाखो रूपयांचे नुकसान

रत्नागिरी, दि. ४ : आॅक्टोबरच्या पहिल्या दिवसापासून दर दिवशी सायंकाळी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडू लागला आहे. त्यामुळे जिल्ह्यात घरे, गोठे यांच्या पडझडीबरोबर मंडणगड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर या तालुक्यांमध्ये घरांवर तसेच पाळीव जनावरांवर वीज पडण्याच्या घटना घडल्या आहेत. यात लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.

मंडणगड तालुक्यात पणदेरी येथील शांताराम शिवगण यांच्या घरावर वीज पडून नुकसान झाले. चिपळूण तालुक्यात तीन घरांची अशंत: पडझड झाली. तसेच गुढे येथील शिवाजी पानवकर आणि मजरेकोंडर येथील वसंत नवरस यांच्या घरांवर वीज पडून नुकसान झाले. संगमेश्वर तालुक्यातील कोसुंब येथील शिवाजी जाधव यांची तीन गुरे विजेचा शॉक लागून दगावली. पर्शराम येथील भिवा कारंडे यांच्या घरावर वीज पडल्याने नुकसान झाले. शंकर खेडेकर यांच्या घरावरही वीज कोसळली.तालुक्यातील १३ घरांची पडझड झाल्याने नुकसान झाले. लांजा तालुक्यातील तळवडे येथे गाईवर तर वाडगाव येथे बैलावर वीज पडल्याने ही ही जनावरे मृत झाली आहेत. राजापूर तालुक्यातील माडबन येथील सुर्यकांत मांजरेकर, नवनाथ वाघमारे यांच्या घरावर वीज पडून नुकसान झाले आहे.