शहरं
Join us  
Trending Stories
1
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
2
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
3
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
4
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
5
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
6
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
7
ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
8
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
9
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष
10
Decision Making: निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती होते? सद्गुरु सांगतात, 'या' पाच मार्गाने घ्या मनाचा कौल!
11
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...
12
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
13
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
14
दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
15
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
16
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग
17
Delhi Red Fort Blast : दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र आणि दिनेश कनेक्शन; कोण आहेत 'ही' दोन नावं?
18
"बाय बाय मुंबई, मी लवकरच...", प्राजक्ता माळी अचानक चालली तरी कुठे?, चाहते पडले चिंतेत
19
अमेरिकेतून भारतासाठी आली आनंदाची बातमी! 'या' कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
20
कालभैरव जयंती २०२५: कालभैरवाच्या कृपेने 'या' ८ राशींच्या आयुष्यात घडणार अविस्मरणीय घटना!

रत्नागिरीत पर्यटनासाठी आवश्यक असलेले इन्फ्रास्ट्रक्चर कमी, पर्यटन मंत्र्यांनी व्यक्त केली खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2023 11:44 IST

एमटीडीसीच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

रत्नागिरी : जिल्ह्यात जोपर्यंत वीज, रस्ते, सुरक्षेची व्यवस्था केली जात नाही, तोपर्यंत पर्यटनाच्या ठिकाणी पर्यटक जात नाहीत. जिल्ह्यात पर्यटनासाठी आवश्यक असलेले इन्फ्रास्ट्रक्चर कमी आहे, अशी खंत राज्याचे पर्यटन, कौशल्य, रोजगार उद्योजकता व नावीन्यता, महिला व बालविकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी रत्नागिरीतील पत्रकार परिषदेत व्यक्त केली.स्वा. सावरकर विचार जागरण सप्ताहाची रविवारी (२८ मे) सांगता करण्यात आली. जागरण सप्ताहाच्या सांगता समारंभासाठी मंत्री लाेढा रत्नागिरीत आले आहेत. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन, केदार साठे उपस्थित हाेते. जिल्ह्यात एखादे पर्यटन स्थळ किंवा मंदिर विकसित केल्यास तेथे जाण्यासाठी रस्ताच नसेल तर कोण जाणार, असा प्रश्नही मंत्री लाेढा यांनी उपस्थित केला. जिल्ह्यातील पर्यटनस्थळे विकसित झालीच पाहिजेत. शिवाय त्यांचे सुशोभीकरणही आवश्यक आहे. पर्यटनाबाबत अनेक प्रश्न आहेत. ते आपण एका वर्षात सोडवू शकत नाही. मात्र, ते सोडविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करीत असल्याचे मंत्री लोढा यांनी सांगितले.

प्रत्येक जिल्ह्यात पर्यटन विकासासाठी टूर एजंट, ट्रॅव्हल्स एजंट, पर्यटनातील तज्ज्ञ मंडळी अशा २० जणांची एक समिती स्थापन करण्यात आली आहे. तसेच येत्या सहा महिन्यांत पर्यटन विकास मंडळातील कर्मचारी व अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पर्यटनाबाबतच्या अनेक बाबी जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन यांनी लक्षात आणून दिल्या. त्याबाबत योग्य मार्ग काढणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

एमटीडीसीच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्षजिल्ह्यात एमटीडीसीच्या नऊ जागा आहेत. त्यामध्ये तीन जागांचा भाडेकरार संपला तरीही अधिकाऱ्यांनी लक्ष दिलेले नाही. अधिकाऱ्यांची चूक झाली असून, ही चूक का झाली याबाबत कल्पना नसल्याचे मंत्री लाेढा म्हणाले. जिल्हाधिकारी याकडे आता लक्ष देत असल्याचे त्यांनी सांगितले. एमटीडीसीचे रिसॉर्ट येत्या वर्षभरात विकसित करणार असून, जिल्ह्यात ‘टँकसिटी’ तयार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

औद्याेगिक प्रशिक्षण संस्थांचे नूतनीकरणजिल्ह्यात नऊ औद्याेगिक प्रशिक्षण संस्था आहेत. त्यांचे नूतनीकरण करण्यात येणार असून, त्याबाबतचा आढावा घेण्यात आला आहे. तसेच अंगणवाड्यांसाठी इमारती कमी आहेत. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या रिकाम्या इमारती अंगणवाड्यांना देण्यात याव्यात, अशी विनंती जिल्हाधिकारी यांनी केल्याचे पर्यटन मंत्री लोढा यांनी सांगितले. त्यावर विचार केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीtourismपर्यटन