शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
5
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
6
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
7
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
8
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
9
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
10
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
11
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
12
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
13
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
14
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
15
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
16
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
17
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
18
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
19
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
20
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले

रत्नागिरीतील सिव्हीलच्या रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा, रक्तपुरवठा करताना अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 16:57 IST

रत्नागिरी येथील शासकीय जिल्हा रूग्णालयाच्या रक्तपेढीत सध्या रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे गरोदर महिला, बालके, डायलेसीस शस्त्रक्रिया, अपघाती रूग्ण यांना रक्तपुरवठा करण्यात अडचणी येत आहेत. यासाठी सध्या रक्तदात्यांच्या सहकार्याची गरज निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देरत्नागिरीतील सिव्हीलच्या रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा, रक्तपुरवठा करताना अडचणसंकटाच्या वेळी रक्तदात्यांच्या सहकार्यची नितांत गरज

रत्नागिरी : येथील शासकीय जिल्हा रूग्णालयाच्या रक्तपेढीत सध्या रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे गरोदर महिला, बालके, डायलेसीस शस्त्रक्रिया, अपघाती रूग्ण यांना रक्तपुरवठा करण्यात अडचणी येत आहेत. यासाठी सध्या रक्तदात्यांच्या सहकार्याची गरज निर्माण झाली आहे.जिल्हा शासकीय रूग्णालयात विविध आजारांचे रूग्ण तसेच वाढत्या अपघातांच्या संख्येमुळे दरदिवशी सरासरी २० ते २५ रक्तपिशव्यांचा पुरवठा करावा लागतो. महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत शासकीय तसेच खासगी रुग्णालयांत दाखल असणाऱ्या रुग्णांना (विशेषत: हृदयशस्त्रक्रिया, डायलेसीस) नि:शुल्क रक्तपुरवठा करण्यात येतो.रक्ताची वाढती गरज लक्षात घेता यासाठी शिबिरांच्या तसेच ऐच्छिक रक्तदानाच्या माध्यमातून रक्तसंकलित करावे लागते. एप्रिल ते जून या कालावधीत सुट्यांचा कालावधी असला तरी याच कालावधीत विविध साथीच्या आजारांच्या रूग्णांबरोबरच अपघातांची संख्या वाढत असल्याने जिल्हा रूग्णालयाला रक्त कमी पडत असल्याचे चित्र निर्माण होते. मात्र, या रक्तपेढीची टीम आवश्यक असेल तेव्हा शिबिराचे आयोजन करून रक्तदात्यांना आवाहन करते. वार्षिक २००० पिशव्या इतके रक्तसंकलन करणारी जिल्हा रूग्णालयाची रक्तपेढी आता वार्षिक ६००० पिशव्या इतके रक्तसंकलन व तितकाच रक्तपुरवठा करीत आहे.सध्या या रूग्णालयात विविध आजारांची रूग्णसंख्या वाढू लागली आहे. तसेच प्रसुती, डायलेसीस रूग्ण, विविध शस्त्रक्रिया व इतर आजारांचे रूग्ण वाढल्याने या रक्तपेढीला रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. विविध रक्तगटांच्या केवळ १३ पिशव्या सध्या शिल्लक आहेत. गरोदर माता, बालके, डालेसीस शस्त्रक्रिया, अपघाती रूग्ण यांना रक्त पुरवठ्यात अडचणी येत आहेत. ओ पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह, एबी पॉझिटिव्ह या गटांचे रक्त उपलब्ध नाही.यावेळी जाणीव पुढेया रक्तपेढीच्या सहाय्यासाठी सदैव धावून येणारी रत्नागिरीतील जाणीव फाऊंडेशन ही संस्था यावेळीही पुढे आली आहे. लवकरच चवे, जाकादेवी आणि रत्नागिरी येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यासाठी संस्थेचे कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.कोणते गट नाहीतसध्या रक्तपेढीकडे बी पॉझिटिव्ह, ओ पॉझिटिव्ह, एबी पॉझिटिव्ह या गटांचा रक्तसाठा शिल्लक नाही. रक्तपेढीतर्फे दोन ठिकाणी शिबिर घेऊन ३५ बॅगांचे रक्त संकलित करण्यात आले होते. मात्र, त्यापैकी २२ बॅगा संपल्याने आता १३ बॅग्ज शिल्लक आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीhospitalहॉस्पिटलHealthआरोग्य