शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
3
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
4
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
5
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
6
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
7
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
8
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
9
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
10
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
11
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
12
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
13
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
14
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
15
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
16
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
17
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
18
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
19
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
20
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीतील सिव्हीलच्या रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा, रक्तपुरवठा करताना अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 16:57 IST

रत्नागिरी येथील शासकीय जिल्हा रूग्णालयाच्या रक्तपेढीत सध्या रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे गरोदर महिला, बालके, डायलेसीस शस्त्रक्रिया, अपघाती रूग्ण यांना रक्तपुरवठा करण्यात अडचणी येत आहेत. यासाठी सध्या रक्तदात्यांच्या सहकार्याची गरज निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देरत्नागिरीतील सिव्हीलच्या रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा, रक्तपुरवठा करताना अडचणसंकटाच्या वेळी रक्तदात्यांच्या सहकार्यची नितांत गरज

रत्नागिरी : येथील शासकीय जिल्हा रूग्णालयाच्या रक्तपेढीत सध्या रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे गरोदर महिला, बालके, डायलेसीस शस्त्रक्रिया, अपघाती रूग्ण यांना रक्तपुरवठा करण्यात अडचणी येत आहेत. यासाठी सध्या रक्तदात्यांच्या सहकार्याची गरज निर्माण झाली आहे.जिल्हा शासकीय रूग्णालयात विविध आजारांचे रूग्ण तसेच वाढत्या अपघातांच्या संख्येमुळे दरदिवशी सरासरी २० ते २५ रक्तपिशव्यांचा पुरवठा करावा लागतो. महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत शासकीय तसेच खासगी रुग्णालयांत दाखल असणाऱ्या रुग्णांना (विशेषत: हृदयशस्त्रक्रिया, डायलेसीस) नि:शुल्क रक्तपुरवठा करण्यात येतो.रक्ताची वाढती गरज लक्षात घेता यासाठी शिबिरांच्या तसेच ऐच्छिक रक्तदानाच्या माध्यमातून रक्तसंकलित करावे लागते. एप्रिल ते जून या कालावधीत सुट्यांचा कालावधी असला तरी याच कालावधीत विविध साथीच्या आजारांच्या रूग्णांबरोबरच अपघातांची संख्या वाढत असल्याने जिल्हा रूग्णालयाला रक्त कमी पडत असल्याचे चित्र निर्माण होते. मात्र, या रक्तपेढीची टीम आवश्यक असेल तेव्हा शिबिराचे आयोजन करून रक्तदात्यांना आवाहन करते. वार्षिक २००० पिशव्या इतके रक्तसंकलन करणारी जिल्हा रूग्णालयाची रक्तपेढी आता वार्षिक ६००० पिशव्या इतके रक्तसंकलन व तितकाच रक्तपुरवठा करीत आहे.सध्या या रूग्णालयात विविध आजारांची रूग्णसंख्या वाढू लागली आहे. तसेच प्रसुती, डायलेसीस रूग्ण, विविध शस्त्रक्रिया व इतर आजारांचे रूग्ण वाढल्याने या रक्तपेढीला रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. विविध रक्तगटांच्या केवळ १३ पिशव्या सध्या शिल्लक आहेत. गरोदर माता, बालके, डालेसीस शस्त्रक्रिया, अपघाती रूग्ण यांना रक्त पुरवठ्यात अडचणी येत आहेत. ओ पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह, एबी पॉझिटिव्ह या गटांचे रक्त उपलब्ध नाही.यावेळी जाणीव पुढेया रक्तपेढीच्या सहाय्यासाठी सदैव धावून येणारी रत्नागिरीतील जाणीव फाऊंडेशन ही संस्था यावेळीही पुढे आली आहे. लवकरच चवे, जाकादेवी आणि रत्नागिरी येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यासाठी संस्थेचे कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.कोणते गट नाहीतसध्या रक्तपेढीकडे बी पॉझिटिव्ह, ओ पॉझिटिव्ह, एबी पॉझिटिव्ह या गटांचा रक्तसाठा शिल्लक नाही. रक्तपेढीतर्फे दोन ठिकाणी शिबिर घेऊन ३५ बॅगांचे रक्त संकलित करण्यात आले होते. मात्र, त्यापैकी २२ बॅगा संपल्याने आता १३ बॅग्ज शिल्लक आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीhospitalहॉस्पिटलHealthआरोग्य