शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

रत्नागिरीतील सिव्हीलच्या रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा, रक्तपुरवठा करताना अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 16:57 IST

रत्नागिरी येथील शासकीय जिल्हा रूग्णालयाच्या रक्तपेढीत सध्या रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे गरोदर महिला, बालके, डायलेसीस शस्त्रक्रिया, अपघाती रूग्ण यांना रक्तपुरवठा करण्यात अडचणी येत आहेत. यासाठी सध्या रक्तदात्यांच्या सहकार्याची गरज निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देरत्नागिरीतील सिव्हीलच्या रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा, रक्तपुरवठा करताना अडचणसंकटाच्या वेळी रक्तदात्यांच्या सहकार्यची नितांत गरज

रत्नागिरी : येथील शासकीय जिल्हा रूग्णालयाच्या रक्तपेढीत सध्या रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे गरोदर महिला, बालके, डायलेसीस शस्त्रक्रिया, अपघाती रूग्ण यांना रक्तपुरवठा करण्यात अडचणी येत आहेत. यासाठी सध्या रक्तदात्यांच्या सहकार्याची गरज निर्माण झाली आहे.जिल्हा शासकीय रूग्णालयात विविध आजारांचे रूग्ण तसेच वाढत्या अपघातांच्या संख्येमुळे दरदिवशी सरासरी २० ते २५ रक्तपिशव्यांचा पुरवठा करावा लागतो. महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत शासकीय तसेच खासगी रुग्णालयांत दाखल असणाऱ्या रुग्णांना (विशेषत: हृदयशस्त्रक्रिया, डायलेसीस) नि:शुल्क रक्तपुरवठा करण्यात येतो.रक्ताची वाढती गरज लक्षात घेता यासाठी शिबिरांच्या तसेच ऐच्छिक रक्तदानाच्या माध्यमातून रक्तसंकलित करावे लागते. एप्रिल ते जून या कालावधीत सुट्यांचा कालावधी असला तरी याच कालावधीत विविध साथीच्या आजारांच्या रूग्णांबरोबरच अपघातांची संख्या वाढत असल्याने जिल्हा रूग्णालयाला रक्त कमी पडत असल्याचे चित्र निर्माण होते. मात्र, या रक्तपेढीची टीम आवश्यक असेल तेव्हा शिबिराचे आयोजन करून रक्तदात्यांना आवाहन करते. वार्षिक २००० पिशव्या इतके रक्तसंकलन करणारी जिल्हा रूग्णालयाची रक्तपेढी आता वार्षिक ६००० पिशव्या इतके रक्तसंकलन व तितकाच रक्तपुरवठा करीत आहे.सध्या या रूग्णालयात विविध आजारांची रूग्णसंख्या वाढू लागली आहे. तसेच प्रसुती, डायलेसीस रूग्ण, विविध शस्त्रक्रिया व इतर आजारांचे रूग्ण वाढल्याने या रक्तपेढीला रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. विविध रक्तगटांच्या केवळ १३ पिशव्या सध्या शिल्लक आहेत. गरोदर माता, बालके, डालेसीस शस्त्रक्रिया, अपघाती रूग्ण यांना रक्त पुरवठ्यात अडचणी येत आहेत. ओ पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह, एबी पॉझिटिव्ह या गटांचे रक्त उपलब्ध नाही.यावेळी जाणीव पुढेया रक्तपेढीच्या सहाय्यासाठी सदैव धावून येणारी रत्नागिरीतील जाणीव फाऊंडेशन ही संस्था यावेळीही पुढे आली आहे. लवकरच चवे, जाकादेवी आणि रत्नागिरी येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यासाठी संस्थेचे कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.कोणते गट नाहीतसध्या रक्तपेढीकडे बी पॉझिटिव्ह, ओ पॉझिटिव्ह, एबी पॉझिटिव्ह या गटांचा रक्तसाठा शिल्लक नाही. रक्तपेढीतर्फे दोन ठिकाणी शिबिर घेऊन ३५ बॅगांचे रक्त संकलित करण्यात आले होते. मात्र, त्यापैकी २२ बॅगा संपल्याने आता १३ बॅग्ज शिल्लक आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीhospitalहॉस्पिटलHealthआरोग्य