शहरं
Join us  
Trending Stories
1
'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान
2
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नव्या वळणावर; पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी होणार?
3
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
4
रूपाली चाकणकर, रोहिणी खडसेंकडून कस्पटे कुटुबीयांची भेट अन् दोघीत शाब्दिक चकमक
5
Matthew Forde: गोलंदाजाची आक्रमक फलंदाजी, अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावलं, डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी
6
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
7
पोलिस महानिरीक्षक सुपेकर यांच्यामुळेच हगवणे कुटुंबीयांची हिंमत वाढली; अंजली दमानिया यांचा दावा
8
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
9
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
10
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी
11
शालार्थ आयडी घोटाळा : छत्रपती संभाजीनगर बोर्डाच्या सचिव वैशाली जामदार यांना अटक
12
नागपुरात वासनांधाने ओलांडली विकृतीची सीमा, घोड्यासोबत अनैसर्गिक कृत्य
13
'मला पाडण्यासाठी भाजपने प्रयत्न केले', धर्मरावबाबा आत्राम यांचा राष्ट्रवादीच्या मेळाव्यातच आरोप
14
“ते हत्यार शोधून…” वैष्णवी हगवणे प्रकरणात वकिलांकडून मोठी अपडेट
15
'...तर आयफोनवर 25 टक्के टॅरिफ लागेल', भारतातील आयफोन निर्मितीत ट्रम्प यांचा खोडा, टिम कुक यांना इशारा
16
नागपूर शहरातील सराफा आणि हवाला व्यावसायिकांवर ईडीचे छापे, लखोटियांना घेतलं ताब्यात
17
Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणेचा सासरा आणि दीर दोघांना २८ मे पर्यंत पोलीस कोठडी
18
Virat Kohli: विश्वविक्रमापासून विराट कोहली फक्त ६३ धावा दूर; इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार!
19
भयानक वादळ, पाकिस्तानने एअरस्पेस नाकारली, मग हवाई दलाने सांभाळला मोर्चा, वाचवले २२७ प्रवाशांचे प्राण 
20
छत्तीसगडच्या सीमेवर चार माओवाद्यांचा खात्मा गडचिराेली पाेलिसांची कारवाई, जंगलात काढली रात्र

दापाेलीमध्ये लवकरच कुणबी भवन उभारू : सुनील तटकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:33 IST

दापाेली : कुणबी समाजोन्नती संघ कुणबी भवन मुंबई, विद्यार्थी वसतिगृह मुलुंडकरिता महाविकास आघाडी सरकारकडून अर्थसंकल्पीय अधिवेशनात पाच कोटी रुपये ...

दापाेली : कुणबी समाजोन्नती संघ कुणबी भवन मुंबई, विद्यार्थी वसतिगृह मुलुंडकरिता महाविकास आघाडी सरकारकडून अर्थसंकल्पीय अधिवेशनात पाच कोटी रुपये देण्यात आले आहेत. वसतिगृहाचा विषय महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मार्गी लागला आहे. आता दापाेलीमध्ये कुणबी भवन उभारून समाजाची गेली अनेक वर्षांची मागणी पूर्ण करू, असे खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले.

कुणबी समाजोन्नती संघ कुणबी भवन मुंबईच्या मुलुंड येथील विद्यार्थी वसतिगृहाकरिता महाविकास आघाडी सरकारकडून पाच कोटी रुपये मिळवून दिल्याबद्दल खासदार सुनील तटकरे यांचा शनिवारी दापोली येथे कुणबी समाजोन्नती संघातर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार तटकरे बाेलत हाेते. यावेळी माजी आमदार संजय कदम, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, नगरसेवक खालिद रखांगे, जिल्हा परिषद सदस्य मोहन मुळे, जिल्हा परिषद सदस्य नेहा जाधव, पंचायत समिती सभापती योगिता बांद्रे, कुणबी समाजाचे नेते शंकर कांगणे, संदीप राजपुरे, रमेश पांगत उपस्थित होते.

कुणबी समाज उन्नती संघाची गेल्या ४० वर्षांची मागणी होती. ही मागणी खासदार सुनील तटकरे यांच्या माध्यमातून पूर्णत्वास गेल्याचे कुणबी समाजाचे नेते शंकर कांगणे यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे कुणबी समाजातर्फे पाच मागण्या त्यांच्याकडे ठेवण्यात आल्या होत्या. त्यापैकी दोन मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत, उर्वरित मागण्याही पूर्ण हाेतील, असा विश्वास शंकर कांगणे यांनी व्यक्त केला.

यावेळी संदीप राजपुरे म्हणाले की, कुणबी समाजाने आजपर्यंत दिलेला शब्द नेहमीच पाळला आहे; परंतु या समाजाच्या पदरी निराशेशिवाय काहीही पडले नाही. यापुढे या समाजाचे हक्क घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे त्यांनी सांगितले. रमेश पांगत यांनी सांगितले की, दापोली तालुक्यातील कुणबी समाजाला हक्काचे समाजमंदिर मेळावा अशी भूमिका अनेक वर्षे मांडली जात आहे; परंतु याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यापुढे समाजाच्या हितासाठी यापुढे राजकारणापलिकडे जाऊन मैत्री करण्याची गरज आहे. यापुढे जो पक्ष आमच्या हिताचे काम करेल अशाच पक्षाला भविष्यात समाज मदत करेल, असे यावेळी ठामपणे सांगितले.

-------------------------

कुणबी समाजाला प्रतिनिधीत्व मिळालेच पाहिजे

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कधी काळी कुणबी समाजाचे नऊ आमदार होते; परंतु आता मात्र जिल्ह्यांमध्ये एकही आमदार नाही, ६५ टक्के असलेल्या या कुणबी समाजाला रत्नागिरी जिल्ह्यातून प्रतिनिधीत्व मिळावा, अशी भूमिका वेगवेगळ्या पक्षांकडे मांडण्यात आली. परंतु, समाजाला प्रतिनिधित्व मिळाले नाही. यापुढे समाजाचा वाटा मिळालाच पाहिजे अशी आग्रही भूमिका भविष्यात असणार आहे, असे यावेळी ठामपणे सांगण्यात आले.