शहरं
Join us  
Trending Stories
1
योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा...; उद्धवसेना आक्रमक, अनिल परबांचे गंभीर आरोप
2
Conversion Law: राजस्थानात धर्मांतरण कायदा लागू, राज्यपाल हरीभाऊ बागडे यांची मंजुरी, उल्लंघन केल्यास किती शिक्षा होणार? जाणून घ्या
3
टाटा कॅपिटलच्या आयपीओचे शेअर्स मिळाले की नाही? कसं चेक कराल स्टेटस, जीएमपीची स्थिती काय? जाणून घ्या
4
रोहित शर्माने विकत घेतली नवीन आलिशान Tesla Model Y कार, त्याची खासियत काय आणि किंमत किती?
5
श्रीमंतांच्या यादीत मोठी उलथापालथ! एअरटेलचे मित्तल यांची मोठी झेप, शिव नादरांची घसरण, पहिलं कोण?
6
"चाकू हल्ल्यात जेह झालेला जखमी..."; ८ महिन्यांनी सैफने सांगितलं 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?
7
"अजित आगरकरसाठी शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लंडच्या माजी खेळाडूचं विधान
8
“योगेश कदमांनी अधिकाराचा गैरवापर करत गुंडाला अभय दिले, राजीनामा द्यावा”; ठाकरे गटाची मागणी
9
“शेतकऱ्यांना भरीव मदतीची दानत नाही, तीन आठवड्यांचे अधिवेशन घ्यावे”; शरद पवार गटाची मागणी
10
या एका कारणामुळे 'कांतारा चॅप्टर १' बनला ब्लॉकबस्टर; ऋषभ शेट्टीने सांगितलं सिनेमाच्या यशामागचं सीक्रेट
11
इराण युद्ध अमेरिकाच नाही, तर 'या' देशानेही इस्रायलला दिला होता मोठा पाठिंबा!४ महिन्यांनंतर झाला खुलासा
12
संकष्ट चतुर्थी: भारतातील एकमेव १८ हातांच्या गणपतीचे मंदिर पाहिले का? आपल्या महाराष्ट्रातच आहे!
13
भारत-तालिबान मैत्रीनं पाकिस्तानचं टेन्शन वाढणार; अफगाणिस्तान भारतासाठी इतकं महत्त्वाचं का?
14
Cough Syrup : "पप्पा, मला मोबाईल द्या ना...", वेदांशचे शेवटचे शब्द; १२ लाख खर्च करूनही वाचला नाही जीव
15
मृत सासूला चितेवर ठेवताना शरीरावर दिसल्या जखमा; संशय येताच तपास झाला अन् समोर आलं विदारक सत्य!
16
"WhatsApp वर नोट आणि वरिष्ठांची नाव..."; IAS पत्नीने केले १५ कॉल, लेकीलाही पाठवलं पण...
17
Ratan Tata Death Anniversary: असे होते रतन टाटा... ज्या व्यवसायात हात घातला सोनं केलं, १० पॉईंट्समध्ये पाहा त्यांचा प्रवास
18
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: गणपतीसह लक्ष्मी देवीचेही करा पूजन, मंत्राचे जप ठरतील उपयुक्त!
19
शून्य बँक शिल्लक असतानाही होईल UPI पेमेंट? 'भीम ॲप'चं 'हे' खास फीचर जाणून घ्या!
20
भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्र आघाडीवर; ७८५ शासकीय कर्मचारी, खासगी व्यक्तींना अटक; देशभरात २,८७५ ठिकाणी कारवाई

वंदे भारतची कोकणवासियांना उत्सुकता; पण ओडिशातील भीषण अपघाताने मन विषण्ण

By मेहरून नाकाडे | Updated: June 3, 2023 19:22 IST

ओडिशातील दुर्दैवी अपघातामुळे मडगाव-कोकण रेल्वेमार्गावरील पहिल्या वंदे भारत एक्स्प्रेसचा नियोजित उद्घाटन सोहळा रद्द

रत्नागिरी : ओडिशातील दुर्दैवी अपघातामुळे मडगाव - कोकण रेल्वेमार्गावरील पहिल्या वंदे भारत एक्स्प्रेसचा शनिवारी (दि. ३) नियोजित असलेला उद्घाटन सोहळा रद्द झाला आहे. काही दिवसांपूर्वी कोकण रेल्वेमार्गावर या गाडीची चाचणी यशस्वी झाल्यानंतर सर्वांना ही गाडी सुरू होण्याची उत्सुकता लागून राहिली होती; मात्र या भीषण अपघातामुळे सर्वांचंच मन विषण्ण झालं आहे, अशी प्रतिक्रिया या गाडीतून पहिला प्रवास करण्यासाठी विशेष निमंत्रित म्हणून मडगाव येथे उपस्थित असलेले रत्नागिरीचे सेवानिवृत्त प्राध्यापक उदय बोडस यांनी व्यक्त केली आहे. तीन जून रोजी  केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत कोकण रेल्वेमार्गावरची पहिली वंदे भारत एक्स्प्रेस मडगाववरून छत्रपती शिवाजी टर्मिनसला जाण्यासाठी सुटणार होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या गाडीला हिरवा झेंडा दाखवणार होते.  ज्या ठिकाणी ती गाडी थांबणार होती, त्या प्रत्येक स्टेशनवरही गाडीच्या स्वागताची जंगी तयारी झाली होती. या पहिल्या गाडीतून प्रवास करण्यासाठी काही रेल्वे फॅन्स, तसेच पत्रकार मडगावमध्ये दाखल झाले होते. रत्नागिरीतील सेवानिवृत्त प्राध्यापक उदय बोडस हेदेखील विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते. त्यांनी आतापर्यंत कोकण रेल्वेमार्गावरच्या २२ नव्या गाड्यांतून पहिला प्रवास केला आहे.वंदे भारतसारखी आधुनिक रेल्वे कोकण रेल्वेमार्गावर येत असल्याचा जो उत्साह होता, तो शुक्रवारी ओडिशात झालेल्या दुर्दैवी अपघातामुळे एका क्षणात मावळला आहे. आता सगळे कर्तव्य म्हणून काम करत आहेत; पण कोणातच उत्साह दिसत नाही. वंदे भारत एक्स्प्रेस गाडी रिकामीच शुक्रवारी रात्री मुंबईला रवाना झाली.कोकण रेल्वेच्या १९९६ च्या उद्घाटनाच्या प्रवासापासून अलीकडच्या तेजस एक्स्प्रेसपर्यंतच्या प्रत्येक पहिल्या गाडीने प्रा. बोडस यांनी प्रवास केला आहे. जनशताब्दी एक्स्प्रेस एलचएबी डब्यांसह धावू लागली, तेव्हा कोरोना निर्बंधांमुळे मला त्या गाडीतून जाता आलं नाही. त्यानंतर सुरू झालेल्या बुधाना ते मंगळुरू जंक्शन आणि लोकमान्य टिळक टर्मिनस ते कन्याकुमारी या दोन गाड्यांमधून त्यांनी केलेले प्रवास अनुक्रमे २१ आणि २२वे होते.  वंदे भारत एक्स्प्रेसमधला प्रवास २३ वा ठरला असता; मात्र दुर्दैवाने तो योग आला नाही, अशी प्रतिक्रियाही बोडस यांनी व्यक्त केली.दरम्यान, कोकण रेल्वेमार्गावरच्या वंदे भारत एक्स्प्रेसच्या उद्घाटनाची पुढील तारीख निश्चित झाल्यावर जाहीर केली जाईल, असे कोकण रेल्वेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीVande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसOdishaओदिशाAccidentअपघात