शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘रो रो सेवे’तून कोकण रेल्वेला मिळाले ३३ कोटींचे उत्पन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2024 18:05 IST

प्रदूषणमुक्त, इंधन, वेळेची बचत करणारी जलद सेवा; मालवाहतूकदारांकडून अधिक पसंती

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर मालवाहतूक करणाऱ्या ट्रकची वाहतूक करणारी रो रो सेवा आर्थिक उत्पन्नाचा कणा ठरत आहे. गेल्या वर्षभरात या सेवेतून कोकण रेल्वे प्रशासनाला तब्बल ३२ कोटी ९८ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवून दिले आहे. २६ जानेवारी १९९९ सालापासून सुरू असलेली ही सेवा कोकण रेल्वेच्या उत्पन्नात लक्षणीय भर टाकत आहे.बीआरएन वॅगनवर ट्रक्सचा ‘रोल-ऑन रोल-ऑफ’ करण्याचा कोकण रेल्वेचा अनोखा प्रयोग यशस्वी ठरला आहे. या व्यवस्थेत ट्रक बीआरएन वॅगन्सवर लूपच्या टोकापर्यंत असलेल्या रॅम्पद्वारे वर चढविले जातात. केले जातात. या ट्रकना पुढे जाण्याच्या दृष्टीनेही योग्यरीत्या सुविधा दिली जाते. बीआरएन वॅगन्सवर चढविण्यापूर्वी, ट्रकचे वजन केले जाते. एवढेच नव्हे तर ट्रकचालक आणि क्लीनर त्यांच्या ट्रकच्या केबिनमध्ये झोपून प्रवास करू शकतात.

रो रो सेवा अर्थात रोल ऑन-रोल ऑफ सेवेमुळे मालवाहतुकीच्या क्षेत्रात कोकण रेल्वेने अभिनव यशस्वी उपक्रम उभारून उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण केला आहे. अनेक ट्रकची वाहतूक साखळीपद्धतीने एकाच वेळी होत असल्याने कोकण रेल्वेची ही कामगिरी लोकप्रिय झाली आहे. यात ३ रँकद्वारे सेवा दिली जात असून, एका रँकमध्ये ५० ट्रक सहजगत्या राहू शकतील, अशी व्यवस्था असते. मात्र, त्यासाठी ट्रकची उंची रस्त्यापासून जास्तीत जास्त ३.४ मीटर असल्याचीही खात्री केली जाते. त्यानंतरच वाहतूक करण्यासाठी परवानगी दिली जाते.अवघ्या १२ तासांत सुमारे १५० ट्रकचालक आणि त्याच्या सहकाऱ्यासह अवघ्या १२ तासांत इच्छित स्थळी पोहोचतात. गेल्या २५ वर्षांपासून सुरू असलेली रो रो सेवेमुळे गेल्या ३ वर्षांत कोकण रेल्वेला जवळपास २०० कोटींपेक्षा अधिक उत्पन्न मिळवून दिले आहे. गेल्या आर्थिक वर्षात कोकण रेल्वेला ३२ कोटी ९८ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

जकात वाचतेसध्या कोकण रेल्वेची रो रो सेवा कोलाड (मुंबईपासून १४५ किलोमीटर) ते वेर्णा (मडगावपासून १२ किलोमीटर), वेर्णा ते सुरतकल (मंगळूरपासून २० किलाेमीटर) आणि कोलाड ते सुरतकल अशी होत आहे. या सेवेवर जकात किंवा टाेल द्यावा लागत नाही. तसेच अपघाताचाही धोका नाही.

प्रदूषणमुक्त सेवारो रो सेवेत सर्व ट्रक रस्त्यावर धावत नसल्याने ही सेवा जलद आणि प्रदूषणमुक्त आहे. तसेच प्रवासादरम्यान ट्रकचीही कोणती हानी किंवा नुकसान होत नाही. इंधनाबरोबरच वेळेची बचत, दूर पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या चालकांसाठी सुखकारक प्रवास या सर्व कारणांमुळे मालवाहतूकदारांच्या नफ्यातही वाढ होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीKonkan Railwayकोकण रेल्वे