शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
4
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
5
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
6
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
7
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
8
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
9
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
10
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
11
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
12
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
13
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
14
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
15
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
16
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
17
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
18
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
19
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
20
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक

कोकण रेल्वे फुल्ल; मुंबईसाठी आरक्षण मिळता मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:39 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोकणात गणेशोत्सव हा सर्वात लोकप्रिय सण असल्याने मुंबईकर चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणात दाखल ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोकणात गणेशोत्सव हा सर्वात लोकप्रिय सण असल्याने मुंबईकर चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणात दाखल होतात. यंदाही कोकण रेल्वेच्या विशेष गाड्यांमधून हजारो मुंबईकर जिल्ह्यात दाखल झाले आहे. परतीसाठीही जादा गाड्या सोडण्यात आल्या असल्या तरीही सध्या २६ सप्टेंबरपर्यंत या सर्व रेल्वे गाड्यांची आरक्षणे फुल्ल झाली आहेत.

होळी आणि गणेशोत्सवासाठी मुंबईकर मोठ्या संख्येने जिल्ह्यात येतात. त्यांच्या आगमनासाठी कोकण रेल्वे मार्गावर अनेक गाड्या सोडल्या जातात. यावर्षीही जिल्ह्यात दाखल होणाऱ्या मुंबईकर गणेशभक्तांची संख्या लक्षात घेऊन कोकण रेल्वे आणि मध्य रेल्वे यांच्या सहकार्याने कोकण रेल्वे मार्गावर सुमारे २५३ पेक्षा फेऱ्या सोडण्यात आल्या होत्या. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सोशल डिस्टन्सिंग राखले जावे, यासाठी या सर्व गाड्यांची आगावू आरक्षण करावी लागत होती. त्यामुळे रत्नागिरीत येणाऱ्या भक्तांना आगावू आरक्षणे करूनच यावे लागले. आता काहींच्या दीड दिवसाचे तर काहींच्या पाच दिवसांच्या गणेशाचे विसर्जन झाले असल्याने पुन्हा चाकरमानी परतू लागले आहेत. यासाठीही कोकण रेल्वेने परतीच्या दहा स्पेशल गाड्या सोडल्या आहेत. त्यांचीही आगावू आरक्षणे करण्यात येत आहे. सध्या या सर्व गाड्यांची आरक्षणे २६ सप्टेंबरपर्यंत पूर्ण झाली आहेत.

.....................

मुंबईकरांना तिकिटाची प्रतीक्षा

-कोरोना काळात खबरदारीची उपाययोजना करून कोकण रेल्वेच्या विशेष गाड्या.

- गणेशोत्सवात सुमारे २५५ विशेष फेऱ्या सोडून मुंबईकर गणेशभक्तांना दिला दिलासा.

-कोकण रेल्वे मार्गावरील सर्वच विशेष गाड्यांचे आगावू आरक्षण असल्याने मुंबईकरांना तातडीचे तिकीट मिळणे अवघड.

.....................

सध्या सुरू फेऱ्या

कोकण रेल्वे मार्गावर गणपतीसाठी कोकणात येणाऱ्यांसाठी सुमारे २५३ फेऱ्या सोडण्यात आल्या. त्यानंतर आता परतीसाठी १० विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत.

................

कोकण मार्ग हाऊसफुल्ल

कोकण रेल्वेचा प्रवास सुखकारक असल्याने वर्षभर कोकण रेल्वे मार्गावरील सर्व गाड्यांना नेहमीच गर्दी होत असते. कोरोना काळात या मार्गावरील दोन पॅसेंजर गाड्या बंद ठेवण्यात आल्या असून सर्व विशेष गाड्या या मार्गावरून धावत असून त्यांचीही आरक्षणे पूर्ण आहेत.

........................

कोरोनाच्या अनुषंगाने खबरदारीचे उपाय

अजूनही कोरोनाचा प्रादुर्र्भाव सुरू असल्याने काेकण रेल्वेकडून खबरदारी.

मास्क बरोबरच युनिव्हर्सल पास असल्यासच रेल्वेत प्रवाशाला परवानगी.

७२ तासांपूर्वी कोरोनाची चाचणी केली असल्यास त्याचे प्रमाणपत्र आवश्यक.

कोरोना प्रतिबंधक लसचे दोन डोस घेतलेले असल्यास प्रवास करण्यास मुभा.