शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

कोकण रेल्वे फुल्ल; मुंबईसाठी आरक्षण मिळता मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:39 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोकणात गणेशोत्सव हा सर्वात लोकप्रिय सण असल्याने मुंबईकर चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणात दाखल ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोकणात गणेशोत्सव हा सर्वात लोकप्रिय सण असल्याने मुंबईकर चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणात दाखल होतात. यंदाही कोकण रेल्वेच्या विशेष गाड्यांमधून हजारो मुंबईकर जिल्ह्यात दाखल झाले आहे. परतीसाठीही जादा गाड्या सोडण्यात आल्या असल्या तरीही सध्या २६ सप्टेंबरपर्यंत या सर्व रेल्वे गाड्यांची आरक्षणे फुल्ल झाली आहेत.

होळी आणि गणेशोत्सवासाठी मुंबईकर मोठ्या संख्येने जिल्ह्यात येतात. त्यांच्या आगमनासाठी कोकण रेल्वे मार्गावर अनेक गाड्या सोडल्या जातात. यावर्षीही जिल्ह्यात दाखल होणाऱ्या मुंबईकर गणेशभक्तांची संख्या लक्षात घेऊन कोकण रेल्वे आणि मध्य रेल्वे यांच्या सहकार्याने कोकण रेल्वे मार्गावर सुमारे २५३ पेक्षा फेऱ्या सोडण्यात आल्या होत्या. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सोशल डिस्टन्सिंग राखले जावे, यासाठी या सर्व गाड्यांची आगावू आरक्षण करावी लागत होती. त्यामुळे रत्नागिरीत येणाऱ्या भक्तांना आगावू आरक्षणे करूनच यावे लागले. आता काहींच्या दीड दिवसाचे तर काहींच्या पाच दिवसांच्या गणेशाचे विसर्जन झाले असल्याने पुन्हा चाकरमानी परतू लागले आहेत. यासाठीही कोकण रेल्वेने परतीच्या दहा स्पेशल गाड्या सोडल्या आहेत. त्यांचीही आगावू आरक्षणे करण्यात येत आहे. सध्या या सर्व गाड्यांची आरक्षणे २६ सप्टेंबरपर्यंत पूर्ण झाली आहेत.

.....................

मुंबईकरांना तिकिटाची प्रतीक्षा

-कोरोना काळात खबरदारीची उपाययोजना करून कोकण रेल्वेच्या विशेष गाड्या.

- गणेशोत्सवात सुमारे २५५ विशेष फेऱ्या सोडून मुंबईकर गणेशभक्तांना दिला दिलासा.

-कोकण रेल्वे मार्गावरील सर्वच विशेष गाड्यांचे आगावू आरक्षण असल्याने मुंबईकरांना तातडीचे तिकीट मिळणे अवघड.

.....................

सध्या सुरू फेऱ्या

कोकण रेल्वे मार्गावर गणपतीसाठी कोकणात येणाऱ्यांसाठी सुमारे २५३ फेऱ्या सोडण्यात आल्या. त्यानंतर आता परतीसाठी १० विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत.

................

कोकण मार्ग हाऊसफुल्ल

कोकण रेल्वेचा प्रवास सुखकारक असल्याने वर्षभर कोकण रेल्वे मार्गावरील सर्व गाड्यांना नेहमीच गर्दी होत असते. कोरोना काळात या मार्गावरील दोन पॅसेंजर गाड्या बंद ठेवण्यात आल्या असून सर्व विशेष गाड्या या मार्गावरून धावत असून त्यांचीही आरक्षणे पूर्ण आहेत.

........................

कोरोनाच्या अनुषंगाने खबरदारीचे उपाय

अजूनही कोरोनाचा प्रादुर्र्भाव सुरू असल्याने काेकण रेल्वेकडून खबरदारी.

मास्क बरोबरच युनिव्हर्सल पास असल्यासच रेल्वेत प्रवाशाला परवानगी.

७२ तासांपूर्वी कोरोनाची चाचणी केली असल्यास त्याचे प्रमाणपत्र आवश्यक.

कोरोना प्रतिबंधक लसचे दोन डोस घेतलेले असल्यास प्रवास करण्यास मुभा.