शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
2
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
3
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
4
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
5
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
6
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
7
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
8
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
9
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
10
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
11
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
12
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
13
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
14
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
15
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
16
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
17
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
18
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
19
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
20
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी

विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर कोकण रेल्वेची कारवाई, वसूल केला 'इतक्या' कोटीचा दंड

By शोभना कांबळे | Updated: January 15, 2024 18:07 IST

दोषी आढळलेल्या प्रवाशांवर कारवाई करण्यात येणार

रत्नागिरी : कोकण रेल्वेने प्रवास करताना विना तिकीट प्रवास करणाऱ्या ७,०१३ प्रवाशांवर कोकण रेल्वे प्रशासनाने कारवाई करत महिनाभरात तब्बल १ कोटी ९५ लाख ६४ हजार ९२६ रुपयांचा दंड वसूल केला आहे. पाच महिन्यात २७,८३८ फुकट्या प्रवाशांवर कारवाई करून ४ कोटी ८७ लाख ८५ हजार १५२ रुपयांचा दंड वसूल केला आहे.गाडीला गर्दी असल्याची संधी साधून काही प्रवासी विना तिकीट गाडीत घुसतात. त्यामुळे रीतसर तिकीट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर अन्याय होतो. त्याचबरोबर रेल्वे प्रशासनाचे करोडो रुपयांचे नुकसान होते. त्यामुळे कोकण रेल्वे प्रशासनाने विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यासाठी आॅगस्ट २०२३ महिन्यापासून विशेष मोहीम हाती घेतली आहे. प्रत्येक महिन्याला कोकण रेल्वे प्रशासनाची ही कारवाई सुरू असते. डिसेंबर २०२३ या महिन्यात राबविलेल्या तिकीट तपासणी मोहिमेत विना तिकीट प्रवास करणाऱ्या ६,६७५ प्रवाशांकडून १ कोटी ९५ लाख ६४ हजार ९२६ रूपयांचा दंड वसूल केला आहे.ऑगस्ट ते डिसेंबर २०२३ या पाच महिन्यात करण्यात आलेल्या तिकीट तपासणीत २७,८३८ विनातिकीट प्रवासी आढळले. त्यांच्याकडून ४ कोटी ८७ लाख ८५ हजार १५२ रुपयांचा दंड४ कोटी ८७ लाख ८५ हजार १५२ रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. यापुढेही तिकीट तपासणी मोहीम नियमित सुरू रहाणार आहे. यात दोषी आढळलेल्या प्रवाशांवर कारवाई करण्यात येणारआहे.कोकण रेल्वे आॅगस्ट २०२३ पासून सातत्याने तिकीट तपासणी मोहीम राबवत आहे. यापुढेही कोकण रेल्वे प्रशासनाकडून ही धडक कारवाई सुरूच राहणार आहे. अभिमानाने प्रवास करा, सन्मानाने प्रवास करा, तिकीट खरेदी करा आणि अभिमानाने प्रवास करा, असे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनाने केले आहे.

तिकीट तपासणीची मोहीम कोकण रेल्वेच्या संपूर्ण मार्गावर नियमित सुरू राहणार आहे. प्रवाशांनी योग्य व वैध तिकीटासह प्रवास करावा दंड टाळावा.- सचिन देसाई, जनसंपर्क अधिकारी, कोकण रेल्वे

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीKonkan Railwayकोकण रेल्वेticketतिकिटpassengerप्रवासी