शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
2
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
3
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
4
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
5
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
6
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
7
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
8
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
9
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
10
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
11
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
12
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
13
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
14
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
15
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
16
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
17
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
18
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
19
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
20
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!

कोकणाला एज्युकेशन हब बनवणार : उदय सामंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 18:29 IST

Uday Samant Education Sector Ratnagiri समुद्रकिनारा ही जशी कोकणाची ओळख आहे, तसेच एज्युकेशन हब ही कोकणाची ओळख व्हावी, यादृष्टीने आपण काम सुरू केले आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.

ठळक मुद्देकोकणाला एज्युकेशन हब बनवणार : उदय सामंतनाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे केंद्र येत्या जूनपासून रत्नागिरीत

रत्नागिरी : समुद्रकिनारा ही जशी कोकणाची ओळख आहे, तसेच एज्युकेशन हब ही कोकणाची ओळख व्हावी, यादृष्टीने आपण काम सुरू केले आहे. त्याचा एक भाग म्हणून नागपूरच्या संस्कृत विद्यापीठाचे तसेच नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे केंद्र येत्या जूनपासून रत्नागिरीत सुरू होत आहे.

सिंधुदुर्गमध्ये आयुर्वेदिक संशोधन केंद्र सुरू होत आहे. २५ कोटी रुपये खर्चून रत्नागिरीतील शासकीय तंत्रनिकेतन अद्ययावत केले जाणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.आपल्या रत्नागिरी दौऱ्याप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्याआधी सकाळपासून त्यांनी विविध खात्यांच्या कामाचा आढावा घेतला.नागपूरच्या रामटेक येथील कवी कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाची चार उपकेंद्रे राज्यात सुरू करण्यावर आधीपासून चर्चा होती. मात्र, त्यात कोणताही निर्णय झाला नव्हता. आता रत्नागिरी, पुणे, औरंगाबाद आणि नांदेड अशा चार ठिकाणी या विश्वविद्यालयाची उपकेंद्रे होणार आहेत. त्यातील रत्नागिरीचे उपकेंद्र येत्या जून महिन्यापासून सुरू होणार आहे.

या उपकेंद्रासाठी बस आगारासमोरील इमारतीमध्ये २० हजार चौरस फूट जागा देण्यात आली आहे, असे ते म्हणाले. या विद्यापीठाचे पहिलेच उपकेंद्र रत्नागिरीत होत असल्याचेही ते आवर्जून म्हणाले.यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची केंद्रे या ना त्या महाविद्यालयाच्या समन्वयाने सुरू आहेत. मात्र, आता त्यांना आयटीआयनजीक दोन एकर जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. तेथे हे केंद्र होईल. भारतीय प्रशासनिक सेवेचे (आयएएस) स्पर्धा परीक्षा केंद्रही रत्नागिरीत होत असून, मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्रात हा प्रकल्प राबवला जाणार आहे. या उपकेंद्रातच लोकमान्य टिळक अध्यासन केंद्र होणार असून, त्यासाठी ५० लाखांची तरतूद सरकारने केली आहे.सागरी विद्यापीठाबाबत द्विसदस्यीय समिती अभ्यास करत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आडाळे औद्योगिक वसाहतीत ५० एकर क्षेत्रांवर देशातील पहिले आयुर्वेदिक संशोधन केंद्र सुरू केले जाणार आहे. एकूणच कोकण यातून एज्युकेशन हब होईल, असे ते म्हणाले.काय होणार संस्कृत उपकेंद्रातया उपकेंद्रात संशोधनावर अधिक भर दिला जाईल. बोली भाषांसह प्राचीन भाषांचे संशोधन करणे हा त्यामागचा उद्देश आहे.जगातले पहिले...यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या रत्नागिरीतील उपकेंद्रात छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय ग्रंथालय आणि संशोधन केंद्र उभारले जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलची उपलब्ध असलेली सर्व प्रकारची पुस्तके उपलब्ध करून देणारे हे जगातील पहिले ग्रंथालय असेल, असेही ते म्हणाले.

महाराजांचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येकाला रत्नागिरीत यावेच लागेल, असे हे केंद्र असेल. त्यासाठी १५ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, तो मुक्त विद्यापीठ करणार असल्याची माहिती मंत्री सामंत यांनी यावेळी दिली.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतEducation Sectorशिक्षण क्षेत्रRatnagiriरत्नागिरी